शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

'गार्बेज ट्रान्स्फर'ने दुर्गंधीच्या यातना; औरंगाबादमधील या रस्त्याने गेलात तर उलटीच होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2022 20:24 IST

मनपाकडून वेळेवर काम होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना दुर्गंधीच्या यातना सहन कराव्या लागत आहेत.

औरंगाबाद : शहरातील ११५ वॉर्डांमधील कचरा संकलन ३५० रिक्षांच्या माध्यमातून करण्यात येते. प्रत्येक रिक्षातील कचरा मोठ्या वाहनांमध्ये नेऊन टाकण्यात येतो. त्यासाठी शहरात ठिकठिकाणी उघड्यावर ही प्रक्रिया करण्यात येते. त्यामुळे आसपासच्या नागरिकांना, वाहनधारकांना पादचाऱ्यांना दुर्गंधीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. सिल्लेखाना, मिलकॉर्नर, सलीम अली सरोवर रोडने नागरिक पायी जात असतील तर त्यांना उलटी होऊ शकते. मनपा मागील चार वर्षांपासून बंदिस्त ट्रान्स्फर स्टेशन उभारत आहे, हे विशेष.

शहरातील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने २०१८ मध्ये मनपाला १४८ कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. त्यानुसार चिकलठाणा, पडेगाव येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आले. अंदाजपत्रकात सहा ठिकाणी कचरा संकलन केंद्र उभारण्याचे ठरले. त्यातील रमानगर, सलीम अली सरोवर येथील फक्त काम सुरू आहे. शिवाजीनगर येथील कामाला सुरुवातच झाली नाही. जे काम सुरू केले ते सुद्धा अत्यंत संथ गतीने आहे. आतापर्यंत एकही कचरा संकलन केंद्र उभारण्यात मनपाला यश आले नाही. विशेष बाब म्हणजे या कामासाठी पंधराव्या वित्त आयोगातून १० कोटी रुपये शासनाकडून देण्यात आले आहेत. त्यानंतरही मनपाकडून वेळेवर काम होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना दुर्गंधीच्या यातना सहन कराव्या लागत आहेत.

सध्या मिलकॉर्नर, सिल्लेखाना, सलीम अली सरोवर, जकात नाका, एन-१२, चिकलठाणा, शिवाजीनगर, सिग्मा रुग्णालय, कांचनवाडी येथे उघड्यावर रिक्षातील कचरा मोठ्या वाहनांमध्ये जमा करण्यात येतो. ज्या ठिकाणी हा कचरा जमा करण्यात येतो, त्याठिकाणी प्रचंड दुर्गंधी सुटलेली असते. पादचारी, वाहनधारक, परिसरातील नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागतो. सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत कचरा संकलनाचे काम सुरू असते. मात्र, दिवसभर या ठिकाणी दुर्गंधी असतेच. मिलकॉर्नर येथील मुख्य रस्त्यावर एखादा पादचारी जात असेल तर त्याला दुर्गंधीमुळे उलट्या आल्याशिवाय राहणार नाहीत.

जागा शोधणे सुरूट्रान्स्फर स्टेशन उभारण्यासाठी जागा शोधावी, असे वॉर्ड अधिकाऱ्यांना सांगितले आहे. जागा मिळाल्यावर बंदिस्त स्टेशन उभारले जातील. रस्त्यावर जिथे कचरा संकलन सुरू आहे, तेथे दुर्गंधी येऊ नये म्हणून पावडर टाकण्यात येईल.- सोमनाथ जाधव, उपायुक्त, मनपा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका