शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

औरंगाबादेत दोन वर्षांनंतर प्रथमच कोरोना लसीकरण बंद; मनपाने केली ७५ हजार लसींची मागणी

By मुजीब देवणीकर | Updated: January 3, 2023 14:48 IST

किमान ३५ लाख रुपयांच्या लसी लोकांनी न घेतल्यामुळे वाया गेल्या.

औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे दोन महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा पडून होता. १४ हजार लसींचा साठा ३१ डिसेंबर रोजी कालबाह्य झाला. त्यामुळे सोमवारपासून लसीकरण मोहीम बंद पडली. दोन वर्षांत १८ लाख ७६ हजार १६८ जणांचे लसीकरण मनपाकडून करण्यात आले. आता लसीकरणासाठी पुन्हा ७५ हजार लसींची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. यात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, कार्बोव्हॅक्स लसींचा समावेश आहे.

शहरात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली होती. मनपाच्या सर्व आरोग्य केंद्रात ही सुविधा सुरू होती. राज्य सरकारकडून वेळाेवेळी महापालिकेला लसींचा साठा देण्यात येत होता. १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट १० लाख ५५ हजार ६५४ ठेवण्यात आले होते. त्यापैकी ९ लाख १३ हजार ८२३ जणांनी पहिला डोस घेतला, तर ७ लाख २१ हजार ६१४ जणांनी दुसरा डोस घेतला. बूस्टर डोस घेण्याचे प्रमाण मात्र त्या तुलनेत अत्यंत कमी आहे. १ लाख ३ हजार ४१६ जणांनीच तिसरा डोस घेतला. त्यामुळे पहिला डोस घेणारे १ लाख ४१ हजार ८३१ आणि दुसरा डोस घेणारे ३ लाख ३४ हजार ४० शिल्लक आहेत. जानेवारीत कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे मनपाने शासनाकडे कोविशिल्डच्या ५० हजार, कोव्हॅक्सिनच्या १५ हजार आणि कार्बोव्हॅक्सच्या १० हजार लसी पहिल्या टप्प्यात मागवल्या आहेत.

३५ लाखांच्या लस वायामुदत संपल्यामुळे कोरोनाच्या १४ हजार लसींचा साठा कालबाह्य ठरला. पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोविशिल्डची एक लस ७०० रुपये, तर काेव्हॅक्सिनची १५०० रुपयांपर्यंत खासगी रुग्णालयात देण्यात आली होती. २४४ रुपयांना शासनाने ती कंपनीकडून खरेदी केली. त्यानुसार किमान ३५ लाख रुपयांच्या लसी लोकांनी न घेतल्यामुळे वाया गेल्या.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या