शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
3
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
4
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
5
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
6
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
7
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
8
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
9
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
10
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
11
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
12
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
13
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
14
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
15
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
16
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
17
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
18
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
19
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
20
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
Daily Top 2Weekly Top 5

'...तर लोक तुम्हाला हंड्याने मारतील', इम्तियाज जलील यांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 16:39 IST

Imtiaz Jaleel: "तुम्ही अनेक वर्षे शिवसेनेसोबत महापालिकेत सत्ता भोगली, तेव्हा पाण्याचा प्रश्न मिटवला नाही."

औरंगाबाद:औरंगाबादमध्ये सध्या पाण्याचा मुद्दा गंभीर बनला आहे. या पाणी प्रश्नावरुन येत्या 23 मे रोजी भाजपने आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. दरम्यान, यावरुन एमआयएमचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. 

'भाजपने नौटंकी बंद करावी'आज जलील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी औरंगाबदच्या पाणी प्रश्नावर भाष्य केलं. ''शहराचा पाणी प्रश्न खूप गंभीर झाला आहे. त्यावर बोलण्याची गरज आहे, ही मोर्चाची नौटंकी बंद करा. शहराचा पाणी प्रश्न अधिकाऱ्यांसोबत बसून सोडवण्याची गरज आहे. पण, भाजप त्याच्याशी काही देणं-घेणं नाही. त्यांना यातही राजकारण करायचं आहे,'' असं जलील म्हणाले.

'लोकं तुम्हाला हांड्याने मारतील'ते पुढे म्हणाले की, "इतके वर्षे तुम्ही शिवसेनेसोबत महापालिकेत सत्ता भोगली, तेव्हा पाण्याचा प्रश्न मिटवला नाही. तेव्हा तुम्ही शिवसेनेसोबत लुटून खाल्ले, आता नौटंकी सुरू आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देतो की, तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा. लोक तुम्हाला हंड्याने मारतील," असंही जलील म्हणाले.

'पाणी पट्टी व्याजासह परत करा'यावेळी जलील यांनी पाणीपट्टीचे पैसे परत करण्याची मागणी केली. "नागरीकांना पाणी पुरवठा न करता आजपर्यंत वसूल केलेली कोट्यावधीची पाणी पट्टीची रक्कम व्याजासह परत करावी. भाजप शिवसेनेसोबत महापालिकेत सत्तेत होती, मग त्यावेळेस हा प्रश्न का सोडवला नाही? तेव्हा पाणी पट्टी का माफ करण्यात आली नाही? जिल्हा प्रशासनाने तेव्हा पासून आजपर्यंत पाणी पट्टी वसुल न करता नागरीकांना पाणी पुरवठा होणेकरिता विविध उपाययोजना राबविणे गरजेचे होते, असे इम्तियाज जलील म्हणाले.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबाद