शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

२५ कोटींचे महत्त्वपूर्ण प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:32 IST

अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी जाहीर केलेल्या २५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केल्याने आता यासाठीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. यात शहरात महत्त्वपूर्ण बाबींना प्राधान्य देण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी जाहीर केलेल्या २५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केल्याने आता यासाठीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. यात शहरात महत्त्वपूर्ण बाबींना प्राधान्य देण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी सांगितले.ते म्हणाले, हिंगोली शहराची सांस्कृतिक चळवळीची परंपरा आहे. मात्र त्या तोडीचे नाट्यगृह, कल्याण मंडपम्वगळता सभागृहही नाही. त्यामुळे एनटीसी भागात भव्य नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. याच ठिकाणी जलतरणिकेचाही प्रस्ताव असून शहरवासियांना खºया अर्थाने आल्हाद देणारे उद्यान उभारण्यात येणार आहे. या तिन्ही बाबींना १0 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्याचबरोबर एकेकाळी शहराचे वैभव राहिलेल्या शिवाजीराव देशमुख सभागृहाचे ३ कोटींचे काम होणार आहे. नगरपालिकेची स्वतंत्र व सुसज्ज इमारतही आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे जागेची मागणी केलेली आहे. तर यात ४ कोटींचा प्रस्तावही दिला आहे. हिंदूंच्या स्मशानभूमिचे सुशोभिकरण करण्याचा ३ कोटींचा प्रस्ताव आहे. याशिवाय मंगळवारा भागात शेतकी भवनासाठी १ कोटींचा प्रस्ताव आहे. तर शहरातील नांदेड नाका ते अंबिका टॉकिजपर्यंत रस्त्यावर दुभाजक व सुशोभिकरणास दीड कोटींचा प्रस्तावही दिला आहे. इतरही काही बाबी या २५ कोटींत आहेत. याशिवाय जलेश्वर तलाव व सिरेहक शाह तलाव सुशोभिकरण व विकासासाठी १४ कोटींचा प्रस्तावही मंजुरीसाठी प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले.