शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

प्रधानमंत्री मोदीजी म्हणाले, 'महत्वाचे मंत्रीपद दिले आहे, कष्ट करावे लागतील"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 20:55 IST

राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने औरंगाबाद शहराला पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळाले.

ठळक मुद्देमी डॉक्टर आहे, तुम्हाला निराश करणार नाहीडॉ. कराड यांनी सांगितले पीएमओमधून फोन आल्यानंतर काय घडले

औरंगाबाद : ''राज्यातून केंद्रीय मंत्री कोण होणार या चर्चेतही माझे नाव नव्हते अन अचानक मला पीएमओमधून फोन आला. दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) , भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा ( J.P. Nadda ) यांची भेट झाली आणि त्यानंतर शपथविधी झाला,'' असा थक्क करणारा प्रवास उलगड होते केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड( Bhagwat Karad ). त्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांनी एका बैठकीदरम्यान  'महत्वाच्या खात्याचे मंत्रीपद दिले आहे, कष्ट करावे लागतील' असे म्हटले. त्यावर मी डॉक्टर आहे, तुम्हाला निराश करणार नाही असा शब्द दिल्याचेही डॉ. कराड यांनी सांगितले. ते लोकमतचे एडिटर-इन -चीफ राजेंद्र दर्डा ( Rajendra Darda ) यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते. ( "Important ministerial posts have been given, we have to work hard"; Dr. Karad told what happened after the phone call from the PMO )   

राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने औरंगाबाद शहराला पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळाले. भाजपकडून राज्यातून मंत्रीमंडळात कोण स्थान पटकावणार याची जोरदार चर्चा मंत्रीमंडळ विस्ताराच्या पूर्वी सुरु होती. परंतु, यात डॉ. कराड यांचे नाव नव्हते. सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवत डॉ. कराड यांची प्रधानमंत्र्यांनी अर्थ राज्यमंत्री पदी निवड केली. यामुळे सर्वांना डॉ. कराड यांची मंत्रीपदी निवड कशी झाली ? त्या दोन दिवसात काय घडले याची उत्सुकता आजही आहे. यावर आणि औरंगाबाद तसेच महाराष्ट्रासाठीच्या व्हिजनवर लोकमतचे एडिटर-इन -चीफ राजेंद्र दर्डा यांनी डॉ. कराड यांना बोलते केले. 

डॉ. कराड यांनी यावेळी त्यांचा राजकारणात प्रवास लोकमतचे एडिटर-इन -चीफ राजेंद्र दर्डा यांच्यामुळे झाल्याचे नमूद करत मंत्रीपद मिळण्याच्या आधी काय घडले हे उलगडले. ते म्हणाले, ''केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारावर सर्वत्र जोरदार चर्चा सुरु होती. मी औरंगाबादमध्येच होतो, अचानक पीएमओमधून फोन आला. तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत दिल्लीला येयचे आहे. का बोलवले असेल हे मी समजलो. मात्र, पुढचे काही तास तर मंत्रीपदी निवड झाल्यावर विश्वासच बसत नव्हता. मी तो नंबर खरेच पीएमओचा आहे का हे तपासून खात्री केली. त्यानंतर पुणे येथून दिल्ल्लीला गेलो आणि दुसऱ्यादिवशी संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. माझ्यासोबत इतर खासदारही होते. मोदीजी यांनी तुमची मंत्रीपदी निवड झाल्याचे सांगितले. त्यानंतर शपथविधी झाला' डॉ. भागवत कराड सांगत असलेला हा रोमांचक प्रवास औरंगाबादमधील प्रतिष्ठित नागरिक थक्क होऊन ऐकत होते. मंत्रिपदाचा शपथविधी झाल्यानंतर एका बैठकीत प्रधानमंत्री मोदी यांनी, मोठे आणि महत्वाचे मंत्रीपद दिले आहे, कष्ट करावे लागतील असे सांगितले. यावर मी डॉक्टर आहे, कष्ट करण्याची मला सवय आहे. तुम्हाला निराश करणार नाही, असा शब्द दिल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. 

औरंगाबादचा करणार कायापालटरेल्वे, पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्रातील औरंगाबादचे सामर्थ्य वाढविण्यासाठी दीर्घकालीन लाभ योजना लवकरच राबविण्यात येणार असल्याचे यावेळी मंत्री डॉ. कराड यांनी सांगितले. शहरात बँकेच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारे मसुरी सारखे केंद्रीय केंद्र सुरु करण्याचा संपल्प त्यांनी बोलून दाखवला. शहराची कनेक्टीव्हिटी वाढवणे, नवीन उद्योग शहरात आणणे, अजिंठा-वेरूळ-दौलताबाद या समृद्ध पर्यटन क्षेत्राचा येत्या काळात चेहरा बदलण्याची योजना तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतRajendra Dardaराजेंद्र दर्डाLokmatलोकमतAurangabadऔरंगाबादBJPभाजपा