शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
5
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
6
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
7
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
8
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
9
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
10
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
11
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
12
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
13
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
14
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
15
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
16
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
17
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
18
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
19
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
20
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना

ओला-कोरडा दुष्काळ सर्वात मोठे आव्हान!

By गजानन दिवाण | Updated: August 24, 2019 12:56 IST

वातावरणातील बदलाचा हा धोका भविष्यात टाळायचा असेल तर विविध माध्यमांतून होणारे प्रदूषण टाळायला हवे, असा सल्ला पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे.  

ठळक मुद्देवातावरणातील बदलाचा धोका भविष्यात टाळायचा असेल तर विविध माध्यमांतून होणारे प्रदूषण टाळायला हवे, असा सल्ला पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे.   संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, वातावरणातील बदलाचा आरोग्यावर सर्वाधिक परिणाम लहान मुले आणि गरोदर मातांवर होतो. २२.५ दशलक्ष लोकांना दरवर्षी जगभरात वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या आजारांना सामोरे जावे लागते.

गजानन दिवाण

औरंगाबाद - थैमान घालणाऱ्या पावसाने यंदा देशभरात हजारापेक्षा जास्त बळी घेतले. हजारो लोकांना बेघर केले. कोट्यवधींचे नुकसान केले. ओल्या दुष्काळाचा हा कहर सुरू असतानाच महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भासारख्या भागात पाण्यासाठी टँकर मागवावे लागले. वातावरणातील बदलाचा हा धोका भविष्यात टाळायचा असेल तर विविध माध्यमांतून होणारे प्रदूषण टाळायला हवे, असा सल्ला पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे.  

वातावरणातील बदलाचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम तपासण्यासाठी नियामक मंडळ आणि कार्यदलाची स्थापना करण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्राने एक सकारात्मक पाऊल टाकले आहे. या पार्श्वभूमीवर वातावरणातील बदलाचा मानवी आरोग्यावरील परिणामाचा शोध घेतला असता भविष्यकाळ अतिशय कठीण असल्याचे स्पष्ट झाले. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, वातावरणातील बदलाचा आरोग्यावर सर्वाधिक परिणाम लहान मुले आणि गरोदर मातांवर होतो.  इंटरगव्हर्नमेंट ऑफ पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी)च्या अहवालानुसार, १९७९ ते २००४ या काळात जगभरात नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या मृत्यूंपैकी ९५ टक्के मृत्यू हे विकसनशील देशांत झाले. त्यातही भारत आणि चीनचे प्रमाण सर्वाधिक होते. 

नॅशनल हेल्थ पोर्टलनुसार, जगभरात सद्य:स्थितीत दहापैकी चार लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. स्वच्छ पाण्याच्या टंचाईमुळे अतिसाराचा धोका वाढतो. यामुळे दरवर्षी जवळपास २२ लाख लोकांचा मृत्यू होतो. भारताचाच विचार केल्यास अलीकडेच्या काळात मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, हृदयाचे आजार, श्वसनाचे आजार, मूत्रपिंडासंदर्भातील आजारांनी आपला देश त्रस्त आहे. डास, पिसूच्या माध्यमातून हे आजार पसरतात. दिवसेंदिवस या आजारांचा धोका वाढतोच आहे. २०५० पर्यंत १.५ डिग्री सेल्सिअस तापमानवाढ झाल्यास जवळपास ३५० दशलक्ष लोकांना प्राणघातक उष्णतेचा त्रास होऊ शकतो, असा इशारा नॅशनल हेल्थ पोर्टलने दिला आहे. २२.५ दशलक्ष लोकांना दरवर्षी जगभरात वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या आजारांना सामोरे जावे लागते. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, दरवर्षी ही संख्या वाढतच जाणार आहे. २,५०,००० वाढीव मृत्यू वातावरणातील बदलामुळे भारतात दरवर्षी २०३० ते २०५० या कालखंडात होतील. याची कारणे कुपोषण, मलेरिया, अतिसार आणि अति उष्णता असतील. ७० लाख मृत्यू दरवर्षी जगभरात हवामान बदलासाठी जबाबदार असलेल्या वायू प्रदूषणातून होतात. २२.५  दशलक्ष लोक दरवर्षी जगभरात नैसर्गिक आपत्तीमुळे स्थलांतरित होतात. भविष्यात ही आकडेवारी आणखी वाढण्याचा धोका आहे.

(स्रोत - नॅशनल हेल्थ पोर्टल) 

हवेतील प्रदूषण कमी करणे हाच उपाय

वातावरण बदलाचा मानवी आरोग्यावरील परिणाम दिवसेंदिवस वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. कुपोषण, दरवर्षी समोर येणारे अपरिचित आजार, टोकाची थंडी वा उष्णता हा वातावरण बदलाचाच परिणाम आहे. हवेतील प्रदूषण कमी केले तर आमच्या फुफ्फुसावर त्याचा सकारात्मक परिणाम लगेच जाणवतो. यामुळे वातावरण बदलाचा धोका टाळण्यासदेखील मदत होते. 

- तरुण गोपालकृष्णन, सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट, नवी दिल्ली. वातावरण बदलाचा परिणाम- उष्माघात

- उष्णतेचा ताण- अतिसार- मूत्रपिंडाचे आजार- मज्जासंस्थेच्या कामाची गती कमी होणे- श्वसन, दमा, ह्वदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार 

टॅग्स :environmentपर्यावरणdroughtदुष्काळHealthआरोग्यfloodपूरMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणीTemperatureतापमान