शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
4
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
5
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
6
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
7
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
8
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
9
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
10
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
11
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
12
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
13
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
14
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
15
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
16
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
17
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
18
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
19
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
20
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS

अवैध वाळू उपशामुळे पूर्णा नदीचे अस्तित्व धोक्यात

By | Updated: December 2, 2020 04:11 IST

चिंचोली लिंबाजी : परिसरातून गेलेल्या पूर्णा नदीपात्रातून शासकीय परवानगी नसताना नदीपात्रातील आठही वाळूघाटांतून अवैध वाळूउपसा सुरू आहे. अनियंत्रित ...

चिंचोली लिंबाजी : परिसरातून गेलेल्या पूर्णा नदीपात्रातून शासकीय परवानगी नसताना नदीपात्रातील आठही वाळूघाटांतून अवैध वाळूउपसा सुरू आहे. अनियंत्रित वाळू उपशामुळे नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. नियंत्रण ठेवणारे महसूल व पोलीस विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने पर्यावरण धोक्यात आले आहे. पाच वर्षांपासून राजरोसपणे शासनाच्या गौण खनिज मालमतेची लूट होत असताना मात्र संबंधित यंत्रणेने ''''आपण सगळे मिळून खाऊ'''' ची भूमिका घेतल्याचे चित्र आहे.

चिंचोली लिंबाजीसह करंजखेड, नागापूर, सावरगाव, पिशोर, नाचनवेल या भागांसह सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, आमठाना, देऊळगाव बाजार या भागात पूर्णा नदीतील वाळूला अधिक मागणी आहे. ही वाळू चांगल्या दर्जाची असल्याने तिला भावही चांगला मिळत असल्याने वाळूमाफियांचा डोळा पूर्णा नदीपात्रातील वाळूच्या उपशावर असतो. पूर्णा नदीकाठी वाकी, चिंचोली लिंबाजी, बरकतपूर, रायगाव, वाकद, शेलगाव, दिगाव, खेडी हे वाळूचे अधिकृत पट्टे आहेत. सरकारी नोंदीनुसार कुठल्याच वाळूपट्टयातून उपसा करण्याची परवानगी नाही, पण प्रत्यक्षात परिस्थिती नेमकी उलट असून सर्रासपणे महसूल आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून परिसरात वाळूचा अवैध उपसा सुरू आहे.

----------------------------------------

नागरिकांना होतो त्रास

पूर्णा नदीपात्रातील वाकद, शेलगाव वगळता सहाही वाळू घाटात व रस्त्यांवर रात्रभर अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरांच्या रांगा दिसून येतात. रात्रभर सुरू असलेल्या या अवैध वाहतुकीमुळे नागरिकांची अक्षरशः झोप उडाली आहे. मात्र, जबाबदार महसूल व पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. किंबहुना अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

------------------------------------

सर्वकाही अलबेल असल्याचे चित्र

सूर्य मावळल्यानंतर बरकतीला येणाऱ्या या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल हाेते. वाळूचोरी रोखण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक केली असली तरी ते आपल्या कुंपणाबाहेर जात नसल्याने वाळूचोरांचे चांगलेच फावते. बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्र दिवसेंदिवस रुंद होत असून अनेकांच्या शेतजमिनीही वाहून गेल्या आहेत. यास काही प्रमाणास नदीकाठचे शेतकरीसुद्धा जबाबदार आहेत. पूर्वी नदीकाठचे शेतकरी नदीतून होणाऱ्या अवैध वाळू उपशाला विरोध करायचे. त्यामुळे शेतकरी आणि वाळू माफियांत वाद होत. मात्र, नदीकाठच्या शेतकाऱ्यांनीच वाळूविक्री सुरू केल्याने सर्व काही आलबेल सुरू आहे.

---------------------------

- वाकी वाळूपट्ट्यातील उपशामुळे नदीपात्र असे उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे.

- दिगाव वाळूपट्ट्यात उतरण्यासाठी असा रस्ता तयार करण्यात आला आहे.