शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या रणधुमाळीत दुष्काळाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:31 IST

निवडणुकीच्या रणधुमाळीत विभागातील भीषण दुष्काळाचा धुराळा उडाला आहे. टंचाईच्या झळांकडे राजकीय नेत्यांसह प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याची ओरड सुरू झाली आहे.

ठळक मुद्दे२९० लघु प्रकल्प कोरडे : टंचाईच्या झळा, चारा छावणीत पावणेचार लाख जनावरे

औरंगाबाद : निवडणुकीच्या रणधुमाळीत विभागातील भीषण दुष्काळाचा धुराळा उडाला आहे. टंचाईच्या झळांकडे राजकीय नेत्यांसह प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याची ओरड सुरू झाली आहे. विभागातील जलसाठ्यांतील पिण्याचे पाणी जोत्याखाली गेले असून, ४ टक्के पाणी सर्व प्रकल्पांत शिल्लक राहिले आहे. ३५ लाख नागरिकांना २,२०० हून अधिक टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. विभागाची ही भीषणता राजकीय धावपळ आणि प्रशासनाच्या कोंडीत अडकली आहे.मराठवाड्यात सर्व मिळून ६७ लाख जनावरे आहेत. त्यात ३६ लाख २५ हजार ४९० मोठी, ११ लाख ३६ हजार लहान जनावरे, शेळ्या, मेंढ्यांची संख्या १९ लाख ४५ हजार ७२८ आहे. विभागात दररोज २६ हजार ३३० टन चारा लागतो. औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत सुरू करण्यात आलेल्या ६०५ चारा छावण्यांमध्ये जनावरांची संख्या आता ३ लाख ७५ हजार ६५७ झाली आहे. यंदा दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात जानेवारी महिन्यापासूनच चाराटंचाई होती. सर्वाधिक चाराटंचाई बीड जिल्ह्यात असून, ५६२ चारा छावण्यांत ३ लाख १९ हजार ९७२ मोठी, तर २८ हजार ७२ मोठी जनावरे आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ छावण्यांत २३ हजार ६४८ मोठी, तर २ हजार ८९२ लहान, अशी एकूण २६ हजार ५४० जनावरे आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात चारा छावण्या उशिराने सुरू झाल्या असून, एका छावणीमध्ये ८६४ मोठी, तर २०९ लहान, अशी १ हजार ३ जणावरांच्या चारा- पाण्याची सोय करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात ८७२, उस्मानाबाद जिल्ह्यात ६१, तर औरंगाबाद जिल्ह्यात एका चारा छावणीला मंजुरी देण्यात आली आहे.एका महिन्यात १६ प्रकल्प झाले कोरडेमराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ३० कोरडे पडले आहेत. ३१ प्रकल्प जोत्याखाली आहेत, तर ११ प्रकल्पांत २५ टक्के पाणी आहे. ७४९ लघु प्रकल्पांपैकी २९० कोरडे पडले आहेत. १ महिन्यात १६ प्रकल्प कोरडे पडले आहेत. गेल्या महिन्यात २६४ प्रकल्प कोरडे होते. ३०७ प्रकल्प जोत्याखाली असून, ११३ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. विभागातील एकूण ८७२ प्रकल्पांत ४ टक्के पाणी शिल्लक आहे.

टॅग्स :Marathwadaमराठवाडा