शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

निवडणुकीच्या रणधुमाळीत दुष्काळाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:31 IST

निवडणुकीच्या रणधुमाळीत विभागातील भीषण दुष्काळाचा धुराळा उडाला आहे. टंचाईच्या झळांकडे राजकीय नेत्यांसह प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याची ओरड सुरू झाली आहे.

ठळक मुद्दे२९० लघु प्रकल्प कोरडे : टंचाईच्या झळा, चारा छावणीत पावणेचार लाख जनावरे

औरंगाबाद : निवडणुकीच्या रणधुमाळीत विभागातील भीषण दुष्काळाचा धुराळा उडाला आहे. टंचाईच्या झळांकडे राजकीय नेत्यांसह प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याची ओरड सुरू झाली आहे. विभागातील जलसाठ्यांतील पिण्याचे पाणी जोत्याखाली गेले असून, ४ टक्के पाणी सर्व प्रकल्पांत शिल्लक राहिले आहे. ३५ लाख नागरिकांना २,२०० हून अधिक टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. विभागाची ही भीषणता राजकीय धावपळ आणि प्रशासनाच्या कोंडीत अडकली आहे.मराठवाड्यात सर्व मिळून ६७ लाख जनावरे आहेत. त्यात ३६ लाख २५ हजार ४९० मोठी, ११ लाख ३६ हजार लहान जनावरे, शेळ्या, मेंढ्यांची संख्या १९ लाख ४५ हजार ७२८ आहे. विभागात दररोज २६ हजार ३३० टन चारा लागतो. औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत सुरू करण्यात आलेल्या ६०५ चारा छावण्यांमध्ये जनावरांची संख्या आता ३ लाख ७५ हजार ६५७ झाली आहे. यंदा दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात जानेवारी महिन्यापासूनच चाराटंचाई होती. सर्वाधिक चाराटंचाई बीड जिल्ह्यात असून, ५६२ चारा छावण्यांत ३ लाख १९ हजार ९७२ मोठी, तर २८ हजार ७२ मोठी जनावरे आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ छावण्यांत २३ हजार ६४८ मोठी, तर २ हजार ८९२ लहान, अशी एकूण २६ हजार ५४० जनावरे आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात चारा छावण्या उशिराने सुरू झाल्या असून, एका छावणीमध्ये ८६४ मोठी, तर २०९ लहान, अशी १ हजार ३ जणावरांच्या चारा- पाण्याची सोय करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात ८७२, उस्मानाबाद जिल्ह्यात ६१, तर औरंगाबाद जिल्ह्यात एका चारा छावणीला मंजुरी देण्यात आली आहे.एका महिन्यात १६ प्रकल्प झाले कोरडेमराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ३० कोरडे पडले आहेत. ३१ प्रकल्प जोत्याखाली आहेत, तर ११ प्रकल्पांत २५ टक्के पाणी आहे. ७४९ लघु प्रकल्पांपैकी २९० कोरडे पडले आहेत. १ महिन्यात १६ प्रकल्प कोरडे पडले आहेत. गेल्या महिन्यात २६४ प्रकल्प कोरडे होते. ३०७ प्रकल्प जोत्याखाली असून, ११३ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. विभागातील एकूण ८७२ प्रकल्पांत ४ टक्के पाणी शिल्लक आहे.

टॅग्स :Marathwadaमराठवाडा