शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
4
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
5
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
6
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
8
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
9
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
10
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
11
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
12
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
13
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
14
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
15
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
16
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
17
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
18
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
19
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
20
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक

निवडणुकीच्या रणधुमाळीत दुष्काळाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:31 IST

निवडणुकीच्या रणधुमाळीत विभागातील भीषण दुष्काळाचा धुराळा उडाला आहे. टंचाईच्या झळांकडे राजकीय नेत्यांसह प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याची ओरड सुरू झाली आहे.

ठळक मुद्दे२९० लघु प्रकल्प कोरडे : टंचाईच्या झळा, चारा छावणीत पावणेचार लाख जनावरे

औरंगाबाद : निवडणुकीच्या रणधुमाळीत विभागातील भीषण दुष्काळाचा धुराळा उडाला आहे. टंचाईच्या झळांकडे राजकीय नेत्यांसह प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याची ओरड सुरू झाली आहे. विभागातील जलसाठ्यांतील पिण्याचे पाणी जोत्याखाली गेले असून, ४ टक्के पाणी सर्व प्रकल्पांत शिल्लक राहिले आहे. ३५ लाख नागरिकांना २,२०० हून अधिक टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. विभागाची ही भीषणता राजकीय धावपळ आणि प्रशासनाच्या कोंडीत अडकली आहे.मराठवाड्यात सर्व मिळून ६७ लाख जनावरे आहेत. त्यात ३६ लाख २५ हजार ४९० मोठी, ११ लाख ३६ हजार लहान जनावरे, शेळ्या, मेंढ्यांची संख्या १९ लाख ४५ हजार ७२८ आहे. विभागात दररोज २६ हजार ३३० टन चारा लागतो. औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत सुरू करण्यात आलेल्या ६०५ चारा छावण्यांमध्ये जनावरांची संख्या आता ३ लाख ७५ हजार ६५७ झाली आहे. यंदा दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात जानेवारी महिन्यापासूनच चाराटंचाई होती. सर्वाधिक चाराटंचाई बीड जिल्ह्यात असून, ५६२ चारा छावण्यांत ३ लाख १९ हजार ९७२ मोठी, तर २८ हजार ७२ मोठी जनावरे आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ छावण्यांत २३ हजार ६४८ मोठी, तर २ हजार ८९२ लहान, अशी एकूण २६ हजार ५४० जनावरे आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात चारा छावण्या उशिराने सुरू झाल्या असून, एका छावणीमध्ये ८६४ मोठी, तर २०९ लहान, अशी १ हजार ३ जणावरांच्या चारा- पाण्याची सोय करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात ८७२, उस्मानाबाद जिल्ह्यात ६१, तर औरंगाबाद जिल्ह्यात एका चारा छावणीला मंजुरी देण्यात आली आहे.एका महिन्यात १६ प्रकल्प झाले कोरडेमराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ३० कोरडे पडले आहेत. ३१ प्रकल्प जोत्याखाली आहेत, तर ११ प्रकल्पांत २५ टक्के पाणी आहे. ७४९ लघु प्रकल्पांपैकी २९० कोरडे पडले आहेत. १ महिन्यात १६ प्रकल्प कोरडे पडले आहेत. गेल्या महिन्यात २६४ प्रकल्प कोरडे होते. ३०७ प्रकल्प जोत्याखाली असून, ११३ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. विभागातील एकूण ८७२ प्रकल्पांत ४ टक्के पाणी शिल्लक आहे.

टॅग्स :Marathwadaमराठवाडा