शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

दिव्यांगांप्रती उदासीनता; मंजूर पावणेचार कोटी, पण खर्च केले केवळ ६६ लाख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 16:34 IST

जिल्हा परिषदेत नाचताहेत नुसते कागदी घोडे, दिव्यांगांच्या घरकुल योजनेलाही ‘घरघर’

- बापू सोळुंके

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या एकूण उपकराच्या ५ टक्के रक्कम दिव्यांग व्यक्तींच्या योजनांवर खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र, जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या उदासिनतेमुळे हा निधी खर्च झालाच नसल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे दोन वर्षाचे सुमारे पावणेचार कोटी रुपये पडून आहेत.

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविल्या जातात. शासनाच्या योजनांसह जिल्हा परिषदेच्या उपकरातूनही योजना राबविणे बंधनकारक आहे. असे असताना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून दिव्यांगांसाठी २०२०-२१ आणि २०२१-२२ या दोन आर्थिक वर्षांसाठी ४ कोटी ३३ लाख रुपये मंजूर करण्यात आले. २०२०-२१साठी दिव्यांगांना त्यांचे जीवन सुसह्य करणारी साधने व तंत्रज्ञान खरेदीसाठी अर्थसहाय्य पुरविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. अस्थिव्यंग व्यक्तींना स्वयंचलित तीनचाकी सायकल (स्कुटर विथ ॲडाप्शल) देण्याचे निश्चित करण्यात आले होते. यासाठी गतवर्षी ७० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. निराधार आणि अतितीव्र अपंग व्यक्तींना विनाअट निर्वाह भत्ता देण्यासाठी १७ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. या दोन्ही योजनांवर समाजकल्याण विभागाने एक रुपयाही खर्च केला नसल्याचे दिसून आले.

अपंग कल्याणार्थ सामूहिक लाभाच्या योजनेंतर्गत पायाभूत सोयींसाठी ८४ लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. दिव्यांगांसाठी डे केअर सेंटर्सची स्थापना करण्याचा निर्णय झाला होता. जिल्हास्तरीय डे केअर सेंटरसाठी १९ लाख ५० हजारांचा निधी मंजूर असताना ७ लाख ५५ हजार रुपये खर्च केल्याचे दाखविण्यात आले. जन्मलेल्या बालकांमध्ये अपंगत्वाची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास अशा बालकांवर तातडीने उपचाराच्या दृष्टीने तालुकास्तरावर सुविधा केंद्र स्थापन करण्यासाठी ६० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. जिल्ह्यातील सहा तालुक्यांच्या ठिकाणी ही केंद्र स्थापन केली जाणार होती. मात्र, हा निर्णयही कागदावरच असल्याचे दिसून येते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद