शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नामांकित महाविद्यालयांचे शिष्यवृत्तीसाठी दुर्लक्ष; शैक्षणिक वर्ष संपत आले, हजारो अर्ज प्रलंबित

By विजय सरवदे | Updated: March 27, 2024 14:02 IST

आर्थिकदृष्ट्या अनुसूचित जातीच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.

छत्रपती संभाजीनगर : भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना वेळेवर दिली जात नाही, अशी आवई उठविली जाते. परंतु, महाविद्यालये व विद्यार्थ्यांकडून हे अर्ज दाखल करण्यास हलगर्जीपणा केला जात आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालयांचे शिष्यवृत्ती अर्जाकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे. चालू शैक्षणिक वर्ष संपत आले तरीही जिल्ह्यातील सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहेत. यासाठी आता ३१ मार्चपर्यंत अखेरची मुदतवाढ देण्यात आली आहे.

आर्थिकदृष्ट्या अनुसूचित जातीच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. गेल्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील सुमारे २९ हजार विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली होती. चालू शैक्षणिक वर्षात ११ ऑक्टोबरपासून ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी समाज कल्याण विभागाने ‘महाडीबीटी पोर्टल’ सुरू केले. विद्यार्थ्यांनी पोर्टलवर भरलेल्या अर्जांची पडताळणी करून महाविद्यालयांनी ते समाज कल्याण विभागाकडे फॉरवर्ड करायचे असतात; पण प्रामुख्याने काही नामांकित महाविद्यालयांना त्यासाठी वेळ मिळत नसल्याचे प्रलंबित अर्जांच्या आकडेवारीवरून दिसत आहे.

सद्य:स्थितीत विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाइन अर्जांपैकी २० हजार ८७४ अर्ज महाविद्यालयांकडून समाज कल्याण विभागाकडे फॉरवर्ड झाले. प्राप्त अर्जांपैकी २० हजार ८७१ अर्ज समाज कल्याण विभागाने मंजूर केले आहेत. गत वर्षाच्या तुलनेत जवळपास ८ हजार अर्ज अजूनही अप्राप्त आहेत. विद्यार्थी व महाविद्यालयांना या दोघांसाठीही आता ३१ मार्च ही अंतिम मुदत आहे.

महाविद्यालय जबाबदारसमाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी. जी. वाबळे यांनी महाविद्यालयांना इशारा दिला आहे की, शिष्यवृत्तीपासून एकही विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याची सर्व जबाबदारी महाविद्यालयांची असेल. यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेऊन त्याची छाननी करावी व परिपूर्ण अर्ज ३१ मार्चपूर्वी समाज कल्याण विभागाच्या लॉगिनवर फॉरवर्ड करावेत.

- २९,६५३ विद्यार्थ्यांना गत वर्षी शिष्यवृत्तीचे वाटप- २०,८७४ विद्यार्थ्यांचे अर्ज आतापर्यंत समाज कल्याणला प्राप्त- ४,१८६ अर्ज महाविद्यालयांच्या लॉगिनवर पडून- ४००० विद्यार्थ्यांनी अजूनही अर्जच भरलेले नाहीत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रScholarshipशिष्यवृत्ती