शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

नामांकित महाविद्यालयांचे शिष्यवृत्तीसाठी दुर्लक्ष; शैक्षणिक वर्ष संपत आले, हजारो अर्ज प्रलंबित

By विजय सरवदे | Updated: March 27, 2024 14:02 IST

आर्थिकदृष्ट्या अनुसूचित जातीच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.

छत्रपती संभाजीनगर : भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना वेळेवर दिली जात नाही, अशी आवई उठविली जाते. परंतु, महाविद्यालये व विद्यार्थ्यांकडून हे अर्ज दाखल करण्यास हलगर्जीपणा केला जात आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालयांचे शिष्यवृत्ती अर्जाकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे. चालू शैक्षणिक वर्ष संपत आले तरीही जिल्ह्यातील सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहेत. यासाठी आता ३१ मार्चपर्यंत अखेरची मुदतवाढ देण्यात आली आहे.

आर्थिकदृष्ट्या अनुसूचित जातीच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. गेल्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील सुमारे २९ हजार विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली होती. चालू शैक्षणिक वर्षात ११ ऑक्टोबरपासून ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी समाज कल्याण विभागाने ‘महाडीबीटी पोर्टल’ सुरू केले. विद्यार्थ्यांनी पोर्टलवर भरलेल्या अर्जांची पडताळणी करून महाविद्यालयांनी ते समाज कल्याण विभागाकडे फॉरवर्ड करायचे असतात; पण प्रामुख्याने काही नामांकित महाविद्यालयांना त्यासाठी वेळ मिळत नसल्याचे प्रलंबित अर्जांच्या आकडेवारीवरून दिसत आहे.

सद्य:स्थितीत विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाइन अर्जांपैकी २० हजार ८७४ अर्ज महाविद्यालयांकडून समाज कल्याण विभागाकडे फॉरवर्ड झाले. प्राप्त अर्जांपैकी २० हजार ८७१ अर्ज समाज कल्याण विभागाने मंजूर केले आहेत. गत वर्षाच्या तुलनेत जवळपास ८ हजार अर्ज अजूनही अप्राप्त आहेत. विद्यार्थी व महाविद्यालयांना या दोघांसाठीही आता ३१ मार्च ही अंतिम मुदत आहे.

महाविद्यालय जबाबदारसमाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी. जी. वाबळे यांनी महाविद्यालयांना इशारा दिला आहे की, शिष्यवृत्तीपासून एकही विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याची सर्व जबाबदारी महाविद्यालयांची असेल. यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेऊन त्याची छाननी करावी व परिपूर्ण अर्ज ३१ मार्चपूर्वी समाज कल्याण विभागाच्या लॉगिनवर फॉरवर्ड करावेत.

- २९,६५३ विद्यार्थ्यांना गत वर्षी शिष्यवृत्तीचे वाटप- २०,८७४ विद्यार्थ्यांचे अर्ज आतापर्यंत समाज कल्याणला प्राप्त- ४,१८६ अर्ज महाविद्यालयांच्या लॉगिनवर पडून- ४००० विद्यार्थ्यांनी अजूनही अर्जच भरलेले नाहीत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रScholarshipशिष्यवृत्ती