शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

विद्यापीठात आंदोलन कराल, तर होणार कारवाई; प्रशासन करतेय सरसकट गुन्हे दाखल

By राम शिनगारे | Updated: August 31, 2024 14:15 IST

विद्यापीठात आंदोलन केल्यानंतर प्रशासन विद्यार्थी संघटनांवर सरसकट करतेय गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील काही महिन्यांपासून विद्यार्थी संघटनांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केल्यानंतर सहभागी विद्यार्थी, पदाधिकाऱ्यांवर गंभीर कलमान्वये गुन्हे नोंदवले आहेत. या प्रकारामुळे अनेक विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात आले आहे. याविरोधात आता संघटना एकवटू लागल्या आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)ने राज्यपाल, उच्चशिक्षण मंत्र्यांना पत्राद्वारे विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी शुक्रवारी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे पुरोगामी चळवळीचे केंद्र आहे. याठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर सतत आंदोलन होत असतात. मात्र, कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पदभार घेतल्यानंतर विद्यापीठात आंदोलन, सभा, निदर्शने घ्यायची असतील तर प्रशासनाची परवानगी बंधनकारक केली आहे. विद्यार्थी संघटनांनी आंदोलनासाठी परवानगी मागितल्यानंतर ती नाकारण्यात येते. त्यामुळे संघटना ठरविल्याप्रमाणे आंदोलन करतात. त्यानंतर प्रभारी कुलसचिव, सुरक्षा अधिकारी संबंधित विद्यार्थ्यांच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हे नोंदवत आहेत.

या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात आल्यामुळे रिपाइंचे शहराध्यक्ष नागराज गायकवाड यांनी राज्यपाल व उच्च शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठवले. त्या पत्रामध्ये म्हटले आहे की, आंदोलन करणे हा अधिकार असताना त्याचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. गुन्हे नोंदवून विद्यार्थ्यांचे गुन्हेगारीकरण केले जात आहे. याच विद्यापीठातून अनेक ऐतिहासिक आंदाेलनांचा जन्म झालेला आहे. मात्र, प्रशासनाची सध्याची भूमिका पाहता पुन्हा एकदा मराठवाड्यात निजामी राजवट लागू केली की काय? असा प्रश्न उपस्थित झाल्याचेही पत्रात म्हटले आहे.

काेणत्या वेळी किती गुन्हे दाखलविद्यापीठ प्रशासनाने आंदोलन केल्यामुळे १५ फेब्रुवारी रोजी १६ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले. २७ फेब्रुवारी रोजी १४, १७ ऑगस्टला एक, २२ ऑगस्टला १४ आणि २७ ऑगस्ट रोजी १० विद्यार्थी व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

प्राध्यापकांना वेगळा न्यायविद्यार्थी आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर सरसकट गुन्हे नोंदविण्यात येत असतानाच काही दिवसांपूर्वीच विविध प्राध्यापक संघटनांनी विद्यापीठावर विराट मोर्चा काढला होता. तसेच विद्यापीठात मागील २२ दिवसांपासून रोजंदारी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या प्राध्यापक, कर्मचाऱ्यांवर विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही, हे विशेष.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र