शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात आंदोलन कराल, तर होणार कारवाई; प्रशासन करतेय सरसकट गुन्हे दाखल

By राम शिनगारे | Updated: August 31, 2024 14:15 IST

विद्यापीठात आंदोलन केल्यानंतर प्रशासन विद्यार्थी संघटनांवर सरसकट करतेय गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील काही महिन्यांपासून विद्यार्थी संघटनांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केल्यानंतर सहभागी विद्यार्थी, पदाधिकाऱ्यांवर गंभीर कलमान्वये गुन्हे नोंदवले आहेत. या प्रकारामुळे अनेक विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात आले आहे. याविरोधात आता संघटना एकवटू लागल्या आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)ने राज्यपाल, उच्चशिक्षण मंत्र्यांना पत्राद्वारे विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी शुक्रवारी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे पुरोगामी चळवळीचे केंद्र आहे. याठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर सतत आंदोलन होत असतात. मात्र, कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पदभार घेतल्यानंतर विद्यापीठात आंदोलन, सभा, निदर्शने घ्यायची असतील तर प्रशासनाची परवानगी बंधनकारक केली आहे. विद्यार्थी संघटनांनी आंदोलनासाठी परवानगी मागितल्यानंतर ती नाकारण्यात येते. त्यामुळे संघटना ठरविल्याप्रमाणे आंदोलन करतात. त्यानंतर प्रभारी कुलसचिव, सुरक्षा अधिकारी संबंधित विद्यार्थ्यांच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हे नोंदवत आहेत.

या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात आल्यामुळे रिपाइंचे शहराध्यक्ष नागराज गायकवाड यांनी राज्यपाल व उच्च शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठवले. त्या पत्रामध्ये म्हटले आहे की, आंदोलन करणे हा अधिकार असताना त्याचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. गुन्हे नोंदवून विद्यार्थ्यांचे गुन्हेगारीकरण केले जात आहे. याच विद्यापीठातून अनेक ऐतिहासिक आंदाेलनांचा जन्म झालेला आहे. मात्र, प्रशासनाची सध्याची भूमिका पाहता पुन्हा एकदा मराठवाड्यात निजामी राजवट लागू केली की काय? असा प्रश्न उपस्थित झाल्याचेही पत्रात म्हटले आहे.

काेणत्या वेळी किती गुन्हे दाखलविद्यापीठ प्रशासनाने आंदोलन केल्यामुळे १५ फेब्रुवारी रोजी १६ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले. २७ फेब्रुवारी रोजी १४, १७ ऑगस्टला एक, २२ ऑगस्टला १४ आणि २७ ऑगस्ट रोजी १० विद्यार्थी व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

प्राध्यापकांना वेगळा न्यायविद्यार्थी आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर सरसकट गुन्हे नोंदविण्यात येत असतानाच काही दिवसांपूर्वीच विविध प्राध्यापक संघटनांनी विद्यापीठावर विराट मोर्चा काढला होता. तसेच विद्यापीठात मागील २२ दिवसांपासून रोजंदारी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या प्राध्यापक, कर्मचाऱ्यांवर विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही, हे विशेष.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र