शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आमदार व्हायचे असेल, तर माझ्यासोबत महिना-दोन महिने फिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 20:14 IST

जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राच्या वाटपप्रसंगी अफलातून सल्ला

ठळक मुद्देकार्यकर्ता हा भुईमुगाच्या वेलाप्रमाणे असला पाहिजे.वेल उपटला, तर  त्याच्यासोबत खळखळ वाजणाऱ्या पाच-पन्नास शेंगा (कार्यकर्ते) निघतात.

औरंगाबाद : कोणाला आमदार व्हायचे असेल, तर माझ्यासोबत महिना-दोन महिने फिरा, तर आमदार व्हाल. फक्त शिरीषजी तुम्ही सोडून. पदवीधरचे गणित वेगळे असते, आमदार होण्याचे असे सोपे सूत्र केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी  शनिवारी येथे कार्यकर्त्यांना सांगितले. 

भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान व  सत्कार हर्सूल परिसरातील लॉनवर शनिवारी करण्यात आला. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय औताडे,  माजी मंत्री नामदेव गाडेकर,  जि.प. उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, प्रवीण घुगे, शिरीष बोराळकर, इद्रिस मुलतानी,  डॉ. दिनेश परदेशी, दिलीप बनकर, सविता कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दानवे म्हणाले, जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत पक्ष मजबूत आहे. उर्वरित ठिकाणी काम करण्याची गरज आहे. पदाधिकाऱ्यांनी आधी ग्रामपंचायत निवडणुकींची तयारी करावी. दुसऱ्या टप्प्यात पदवीधर निवडणूक असणार आहे. त्याचीही तयारी करायची आहे, अशा सूचनाही त्यांनी उपस्थितांना केल्या. 

आपल्या खुसखुशीत शैलीत दानवे म्हणाले, भाजप  सक्षम कार्यकऱ्यांना नेता बनविणारा पक्ष आहे. कार्यकर्ता हा भुईमुगाच्या वेलाप्रमाणे असला पाहिजे. वेल उपटला, तर  त्याच्यासोबत खळखळ वाजणाऱ्या पाच-पन्नास शेंगा (कार्यकर्ते) निघतात. नाही तर गाजरासारखा असल्यास उपटल्यास एकटाच असतो. त्यामुळे तुम्हाला भुईमुगाच्या वेलासारखे व्हायचे की, गाजरासाखे हे एकदा ठरावा, असा मापदंड त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना दिला. भाजपत सामूहिक नेतृत्व निर्माण करण्याची पद्धत आहे. एका अध्यक्षाला सलग दोन वेळेनंतर तिसऱ्यांदा अध्यक्षपद भूषविता येत नाही. त्यामुळे भाजपत सामान्य व काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळतो.  पक्षात मोठ्या पदावर जाऊन काम करण्याची संधी मिळते. दुसरीकडे काँग्रेस पक्षात सोनिया गांधी, राहुल गांधी म्हणतात, अध्यक्ष बदला; पण बदलण्याचा निर्णय घेत नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करीत पक्ष आणि जनतेसाठी वाहून घेण्याचे आवाहनही दानवे यांनी केले.

आ. हरिभाऊ बागडे म्हणाले, कोरोनाला रोखण्यात राज्य  सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे  कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यातून अस्तित्व निर्माण करून गावागावांत लोकांचा विश्वास संपादन केला पाहिजे.  जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी प्रस्ताविक केले. यात त्यांनी कोरोनाच्या काळात जिल्ह्यात केवळ भाजपने लोकांच्या हिताची कामे केली.  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी मिरविण्याचे काम केल्याची टीका औताडे यांनी केली.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद