शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

आमदार व्हायचे असेल, तर माझ्यासोबत महिना-दोन महिने फिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 20:14 IST

जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राच्या वाटपप्रसंगी अफलातून सल्ला

ठळक मुद्देकार्यकर्ता हा भुईमुगाच्या वेलाप्रमाणे असला पाहिजे.वेल उपटला, तर  त्याच्यासोबत खळखळ वाजणाऱ्या पाच-पन्नास शेंगा (कार्यकर्ते) निघतात.

औरंगाबाद : कोणाला आमदार व्हायचे असेल, तर माझ्यासोबत महिना-दोन महिने फिरा, तर आमदार व्हाल. फक्त शिरीषजी तुम्ही सोडून. पदवीधरचे गणित वेगळे असते, आमदार होण्याचे असे सोपे सूत्र केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी  शनिवारी येथे कार्यकर्त्यांना सांगितले. 

भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान व  सत्कार हर्सूल परिसरातील लॉनवर शनिवारी करण्यात आला. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय औताडे,  माजी मंत्री नामदेव गाडेकर,  जि.प. उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, प्रवीण घुगे, शिरीष बोराळकर, इद्रिस मुलतानी,  डॉ. दिनेश परदेशी, दिलीप बनकर, सविता कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दानवे म्हणाले, जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत पक्ष मजबूत आहे. उर्वरित ठिकाणी काम करण्याची गरज आहे. पदाधिकाऱ्यांनी आधी ग्रामपंचायत निवडणुकींची तयारी करावी. दुसऱ्या टप्प्यात पदवीधर निवडणूक असणार आहे. त्याचीही तयारी करायची आहे, अशा सूचनाही त्यांनी उपस्थितांना केल्या. 

आपल्या खुसखुशीत शैलीत दानवे म्हणाले, भाजप  सक्षम कार्यकऱ्यांना नेता बनविणारा पक्ष आहे. कार्यकर्ता हा भुईमुगाच्या वेलाप्रमाणे असला पाहिजे. वेल उपटला, तर  त्याच्यासोबत खळखळ वाजणाऱ्या पाच-पन्नास शेंगा (कार्यकर्ते) निघतात. नाही तर गाजरासारखा असल्यास उपटल्यास एकटाच असतो. त्यामुळे तुम्हाला भुईमुगाच्या वेलासारखे व्हायचे की, गाजरासाखे हे एकदा ठरावा, असा मापदंड त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना दिला. भाजपत सामूहिक नेतृत्व निर्माण करण्याची पद्धत आहे. एका अध्यक्षाला सलग दोन वेळेनंतर तिसऱ्यांदा अध्यक्षपद भूषविता येत नाही. त्यामुळे भाजपत सामान्य व काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळतो.  पक्षात मोठ्या पदावर जाऊन काम करण्याची संधी मिळते. दुसरीकडे काँग्रेस पक्षात सोनिया गांधी, राहुल गांधी म्हणतात, अध्यक्ष बदला; पण बदलण्याचा निर्णय घेत नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करीत पक्ष आणि जनतेसाठी वाहून घेण्याचे आवाहनही दानवे यांनी केले.

आ. हरिभाऊ बागडे म्हणाले, कोरोनाला रोखण्यात राज्य  सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे  कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यातून अस्तित्व निर्माण करून गावागावांत लोकांचा विश्वास संपादन केला पाहिजे.  जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी प्रस्ताविक केले. यात त्यांनी कोरोनाच्या काळात जिल्ह्यात केवळ भाजपने लोकांच्या हिताची कामे केली.  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी मिरविण्याचे काम केल्याची टीका औताडे यांनी केली.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद