शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

पाणी हवे तर नळ अधिकृत करून घ्या; अनधिकृत नळांवर कारवाईचे निर्देश

By मुजीब देवणीकर | Updated: May 30, 2024 20:11 IST

नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जीव्हीपीआर कंपनीमार्फत शहरात जलवाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत.

छत्रपती संभाजीनगर : शहरात पाण्यासाठी प्रचंड ओरड सुरू आहे. प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांना पाणी मिळत नाही. अनधिकृत नळांची संख्या १ लाखाहून अधिक आहे. नागरिकांना पाणी हवे असेल तर त्यांनी नळ अधिकृत करून घ्यावेत, अन्यथा अनधिकृत नळांवर कारवाई करावी, असे आदेश मंगळवारी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले.

प्रशासकांनी सकाळी पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली. आतापर्यंत किती अनधिकृत नळ कनेक्शन कट केले, अशी विचारणा त्यांनी केली. अनधिकृत नळ कनेक्शनसाठी स्वतंत्र पथक तयार केले असून, त्यामार्फत विविध वसाहतींमध्ये कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी बऱ्याच वाढल्या आहेत. जलवाहिनीतील गळती शोधण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. जलवाहिनीत कॅमेरे सोडून लिकेज शोधले जाऊ शकतील, अशा एखाद्या खासगी एजन्सीची नियुक्त करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

हर्सूल तलावाच्या मृत साठ्यातून पाण्याचा उपसा सुरू आहे. तलावातील पाण्याच्या नोंदी दरमहा कराव्यात, जेणेकरून पुढील वर्षी पाण्याचे नियोजन करता येईल. टँकरद्वारे एक लाख नागरिकांची तहान भागविली जात आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. त्यावर प्रशासकांनी शहर परिसरातील विंधन विहिरी, विहिरींचे जिओ टँगिंग करण्याची सूचना केली. बैठकीला शहर अभियंता ए. बी. देशमुख, कार्यकारी अभियंता ए. बी. काझी, के. एम. फालक यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांसह लाइनमनची उपस्थिती होती.

जीव्हीपीआर कंपनीबाबत तक्रारीनवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जीव्हीपीआर कंपनीमार्फत शहरात जलवाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत. महापालिका अधिकाऱ्यांनी सुचविलेली कामे कंपनीकडून केली जात नाहीत, असे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. त्यावर कंपनीला अधिकृतपणे पत्र द्या, कंपनीने काम न केल्यास मनपाने करावे, नंतर कंपनीच्या बिलातून ही रक्कम वसूल करावी. जलवाहिन्या टाकताना योग्य प्रमाणात खोलीकरण केले जात नाही, असे प्रकार समोर येत आहेत. निकृष्ट काम केल्यास कंपनीचे बिल दिले जाणार नाही, असा इशाराही प्रशासकांनी दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका