औरंगाबाद : सहकारी संस्थांच्या निवडणुकीत विरोधी गटातील मतदारांना हेतूत: अपात्र ठरविल्यास आता तीन वर्षांचा कारावास भोगावा लागणार आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकांतील गैरप्रकारांना यामुळे आळा बसणार आहे. सहकार कायदा बदलल्यानंतर सहकारी संस्थांसाठी राज्य निवडणूक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया प्राधिकरणाने सुरूकेली आहे. सध्या ‘ब’,‘क’ आणि ‘ड’ वर्गातील संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून, डिसेंबरअखेर ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मुदतीचे गुपित राहणार नाही संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर निवडणुका लांबाव्यात, यासाठी काही संस्थाचालक अनेक खेळी करीत असतात. संस्थेची मुदत संपल्याबाबत अनेकदा गोपनीयता बाळगली जाते. आता मात्र ते शक्य होणार नाही. संचालक मंडळाची मुदत संपताच प्राधिकरणाला निवडणूक घेण्याबाबत तातडीने कळवावे लागेल. निवडणूक घेण्याचे प्रस्ताव दाबून ठेवणाऱ्या संस्थांचे संचालक मंडळ बरखास्त करून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
‘त्या’ मतदारांना अपात्र ठरविल्यास कारावास
By admin | Updated: December 24, 2015 00:01 IST