शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

आमचे सरकार आल्यास एमएसपी कायदा बनवू, जातीनिहाय जनगणना करू: अलका लांबा

By स. सो. खंडाळकर | Updated: March 13, 2024 16:02 IST

महागाई व बेरोजगारीही कमी करण्याचेही दिले आश्वासन

छत्रपती संभाजीनगर : आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांसाठी एमएसपी कायदा लागू करू, जातीनिहाय जनगणना करू तसेच महागाई व बेरोजगारीही कमी करू, असे आश्वासन अ. भा. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी मंगळवारी येथे दिले.

त्या गांधी भवनात महिला मेळाव्यात व नंतर पत्रकारांशी बोलत होत्या. त्यांच्यासमवेत प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे होत्या. राष्ट्रीय अध्यक्षा झाल्यानंतर २२ राज्यांचा व ३० शहरांचा दौरा करून त्या छत्रपती संभाजीनगरात आल्या होत्या. येथूनच त्या दुपारी धुळ्याकडे रवाना झाल्या. आज, बुधवार, दि. १३ मार्च रोजी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा धुळ्यात- महाराष्ट्रात प्रवेश करीत आहेत. या यात्रेचे त्या तिथे स्वागत करतील.

दहा वर्षे झाली सत्ता भोगताय, मग आताच सीएए लागू करण्याची गरज का पडली?, मतांच्या ध्रुवीकरणासाठी व ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा हा डाव असल्याचा आरोप लांबा यांनी केला. वीस लाख लोक देश सोडून गेले त्याचे काय असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी प्रश्न उपस्थित केले की, लोकसभेत चारशे जागा यांना कशाला पाहिजेत? संविधान बदलण्यासाठी? यासाठी पाशवी बहुमत हवे असेल तर काँग्रेस तसे होऊ देणार नाही.

भाजप सरकारच्या महिला आरक्षण धोरणावर अलका लांबा यांनी टीका केली. केवळ गाजावाजा करून महिला आरक्षण विधेयक मंजूर करून घेतले. परंतु, हा एक चुनावी जुमला होता, हे आता लक्षात येतंय. काँग्रेसचे सरकार आल्यास महिला आरक्षण तत्काळ लागू केले जाईल व ओबीसी महिलांनाही आरक्षण दिले जाईल. देशातील यापुढील सरकार इंडिया आघाडीचे राहणार असून, असा ठाम विश्वास लांबा यांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेस, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसुफ, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा दीपाली मिसाळ, विद्या पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :congressकाँग्रेसAurangabadऔरंगाबाद