शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

बिल भरावेच लागेल, फुकट वीज दिली तर महावितरण बंद पडेल, खाजगी कंपन्या येतील : नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 19:20 IST

Nitin Raut : विजेचा वापर करत असाल तर बिलसुद्धा भरावेच लागेल.

औरंगाबाद : वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना कोळसा आणि बँकेचे घेतलेले पैसे भरायचे आहेत. या पुढे वीज कोणालाही फुकट देणार नाही. वीज वापरायची असेल तर बिल भरावेच लागेल, अशी स्पष्ट भूमिका उर्जामंत्री नितीन राऊत ( Nitin Raut ) यांनी घेतली. तसेच फुकट वीज दिली तर महावितरण (Mahavitaran ) बंद पडेल, यात खाजगी कंपन्या येतील, असा इशाराही राऊत यांनी आज दिला. 

उर्जामंत्री नितीन राऊतऔरंगाबादमध्ये आयोजित महावितरणाच्या बैठकीसाठी आज शहरात आले होते. दरम्यान, शेतकरी वीज बिलावरून भाजप आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब यांनी ऊर्जामंत्री राऊत यांची भेट घेतली. भाजप आमदारांनी शेतकऱ्यांकडून थकीत बिल वसुली सक्तीने करू नये, वीज बिलात सूट द्यावी, अशी मागणी केली. यावर राऊत यांनी वीज बिल भरावेच लागेल, अशी भूमिका घेतली. विजेचा वापर करत असाल तर बिलसुद्धा भरावेच लागेल. वीज कुणालाच फुकट मिळणार नाही. कारण, महावितरण फुकटात वीज विकत घेत नाही. कोणत्याही कंपन्या महावितरणला वीज फुकट देत नाहीत. वीज निर्मिती करण्यास खर्च लागतो. यामुळे बिल भरावेच लागेल असे राऊत यांनी स्पष्ट केले.

वीज निर्मितीसाठी पैसे लागतात वीज निर्मिती करण्यासाठी कंपनांना कोळसा लागतो.त्यांनी बँकांचे कर्ज घेतलेले असते. तर वीज विकत घेण्यासाठी महावितरणला देखील पैसे लागतात. वेळ पडल्यास कर्जही घ्यावे लागते. जर वीज बिल भरले नाही तर महावितरणकडे पैसे नसतील, महावितरण बंद पडेल. यानंतर यात खाजगी कंपन्या येतील, असा इशारा यावेळी उर्जामंत्री राऊत यांनी दिला. 

मोर्चा काढू शेतकऱ्यांना थकीत वीज बिल भरायला लावणे चुकीचे आहे. ओल्या दुष्काळात शेतकऱ्यांनी वीज वापरली नाही, यामुळे शेतकरी चालू बिल भरायला तयार आहेत. दररोज ८ तास देखील वीज मिळत नाही मग कसे भरायचे बिल. शेतकऱ्यांचा छळ सुरू आहे. जर रोहित्र बंद केले तर याविरोधात मोर्चा काढावा लागेल, असा इशारा आमदार प्रशांत बंब यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतmahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबाद