शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

बिल भरावेच लागेल, फुकट वीज दिली तर महावितरण बंद पडेल, खाजगी कंपन्या येतील : नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 19:20 IST

Nitin Raut : विजेचा वापर करत असाल तर बिलसुद्धा भरावेच लागेल.

औरंगाबाद : वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना कोळसा आणि बँकेचे घेतलेले पैसे भरायचे आहेत. या पुढे वीज कोणालाही फुकट देणार नाही. वीज वापरायची असेल तर बिल भरावेच लागेल, अशी स्पष्ट भूमिका उर्जामंत्री नितीन राऊत ( Nitin Raut ) यांनी घेतली. तसेच फुकट वीज दिली तर महावितरण (Mahavitaran ) बंद पडेल, यात खाजगी कंपन्या येतील, असा इशाराही राऊत यांनी आज दिला. 

उर्जामंत्री नितीन राऊतऔरंगाबादमध्ये आयोजित महावितरणाच्या बैठकीसाठी आज शहरात आले होते. दरम्यान, शेतकरी वीज बिलावरून भाजप आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब यांनी ऊर्जामंत्री राऊत यांची भेट घेतली. भाजप आमदारांनी शेतकऱ्यांकडून थकीत बिल वसुली सक्तीने करू नये, वीज बिलात सूट द्यावी, अशी मागणी केली. यावर राऊत यांनी वीज बिल भरावेच लागेल, अशी भूमिका घेतली. विजेचा वापर करत असाल तर बिलसुद्धा भरावेच लागेल. वीज कुणालाच फुकट मिळणार नाही. कारण, महावितरण फुकटात वीज विकत घेत नाही. कोणत्याही कंपन्या महावितरणला वीज फुकट देत नाहीत. वीज निर्मिती करण्यास खर्च लागतो. यामुळे बिल भरावेच लागेल असे राऊत यांनी स्पष्ट केले.

वीज निर्मितीसाठी पैसे लागतात वीज निर्मिती करण्यासाठी कंपनांना कोळसा लागतो.त्यांनी बँकांचे कर्ज घेतलेले असते. तर वीज विकत घेण्यासाठी महावितरणला देखील पैसे लागतात. वेळ पडल्यास कर्जही घ्यावे लागते. जर वीज बिल भरले नाही तर महावितरणकडे पैसे नसतील, महावितरण बंद पडेल. यानंतर यात खाजगी कंपन्या येतील, असा इशारा यावेळी उर्जामंत्री राऊत यांनी दिला. 

मोर्चा काढू शेतकऱ्यांना थकीत वीज बिल भरायला लावणे चुकीचे आहे. ओल्या दुष्काळात शेतकऱ्यांनी वीज वापरली नाही, यामुळे शेतकरी चालू बिल भरायला तयार आहेत. दररोज ८ तास देखील वीज मिळत नाही मग कसे भरायचे बिल. शेतकऱ्यांचा छळ सुरू आहे. जर रोहित्र बंद केले तर याविरोधात मोर्चा काढावा लागेल, असा इशारा आमदार प्रशांत बंब यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतmahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबाद