शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

देवमूर्ती घडवणारा वाट पाहतोय दैव बदलण्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 20:13 IST

भारतीय समाजरचनेत गावगाड्यातील बारा बलुतेदारांपैकी एक असलेला पाथरवट (वडार) समाज पूर्वीपासूनच दगडांपासून लेणी, शिल्प, देवांच्या मूर्ती, दगडी मंदिरे, तसेच घरगुती वापराच्या पाटा, वरवंटा, खलबत्ते, इत्यादी साहित्य, कलाकृती बनवून जीवन जगत असे.

ठळक मुद्देपारंपरिक साधनांची जागा इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी घेतल्यामुळे या समाजावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली.बहुतांश भटका असलेल्या या समाजाला जीवन जगण्यासाठी मोलमजुरी करावी लागत आहे.

- ज्ञानेश्वर चोपडे

आळंद (औरंगाबाद )  : दगडांवर छन्नी-हातोड्याचा घाव घालत देवमूर्ती निर्माण करणाऱ्या पाथरवट समाजाची सध्या दुर्दशा झाली आहे. पूर्वी बारा बलुतेदारांमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेला हा समाज दगडांपासून घडविलेले साहित्य विकून उदरनिर्वाह चालवायचा. मात्र, आताच्या काळात घरगुती वापरामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने या समाजाला रोजीरोटीसाठी दाही दिशा भटकावे लागत आहे. करोडो लोक ज्यांच्यासमोर रोज नतमस्तक होतात, अशा देवाच्या मूर्तींना घडविणारा हा समाज सध्या अस्तित्वासाठी धडपडतोय.

भारतीय समाजरचनेत गावगाड्यातील बारा बलुतेदारांपैकी एक असलेला पाथरवट (वडार) समाज पूर्वीपासूनच दगडांपासून लेणी, शिल्प, देवांच्या मूर्ती, दगडी मंदिरे, तसेच घरगुती वापराच्या पाटा, वरवंटा, खलबत्ते, इत्यादी साहित्य, कलाकृती बनवून जीवन जगत असे. विशेष म्हणजे त्यांच्याशिवाय गाव अधुरे राहत होते. मात्र कालौघात पारंपरिक साधनांची जागा इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी घेतल्यामुळे या समाजावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे बहुतांश भटका असलेल्या या समाजाला जीवन जगण्यासाठी मोलमजुरी करावी लागत आहे.

शासनाकडून मदतीची अपेक्षापाथरवट समाजाचा पारंपरिक धंदा बंद पडण्याच्या मार्गावर असून बहुतांश उत्कृष्ट कारागीर बेरोजगार झाले आहेत. छन्नी-हातोड्यांनी दगडांवर घाव घालून रट्टलेले हात पोटापाण्यासाठी मोलमजुरी करून जीवन जगत आहेत. जे लोक पारंपरिक व्यवसायाला चिकटून बसले आहेत, त्यांची परिस्थिती बिकट आहे. शासनाने या कलाकारांच्या कलेची कदर करून त्यांना मदत करावी. अन्यथा ही कला कालौघात नष्ट होईल. या कारागिरांना शासकीय अनुदान व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळाल्यास त्यांच्या कलेला वाव मिळून समाजाची प्रगती होईल.

पाटा, वरवंट्याला मिळत नाहीत ग्राहकसध्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे जग असून वेगवान व कोणत्याही कष्टाविना गृहिणी मिक्सरवर घरातील मसाले वाटून घेतात. पाटा, वरवंट्यावरील चव ही कितीही चांगली असली, तरी कष्ट घेण्याची तयारी नवीन पिढीमध्ये नसल्याने पाथरवटांच्या पाटा, वरवंट्याला मागणी घटली आहे. एव्हाना ती नसल्यातच जमा आहे. यामुळे या समाजावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

कष्टाचे कामपाथरवट समाज मोठमोठ्या दगडांवर घाव घालून आपल्या कलेचा वापर करून मूर्ती, पाटा, वरंवटा घडवितात. मात्र आता खाणीतून दगड आणणेही महाग झाले आहे. तसेच दगडांवर  कित्येक तास हातोड्याचे घाव घालून या वस्तू घडविण्यासाठी मोठी मेहनत करावी लागते. त्यामानाने या वस्तूंना मागणी तर नाहीच. मात्र जे ग्राहक मिळतात तेही अत्यंत कमी किमतीत या वस्तू मागतात. यामुळे पाथरवट समाज अडचणीत सापडला आहे.

आमच्या कलेची शासन दरबारी नोंद नसल्याने ही कला लुप्त होत चालली आहे. शासनाने आमच्या कारागिरांची नोंद घेऊन आम्हाला शासकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.  - शेषराव धोत्रे, कारागीर. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक