शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘पुरे हिंदुस्थान में औरंगाबाद शहर को सलाम करता हूँ...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 14:44 IST

स्मरण : शायरांनी पेश केलेल्या प्रत्येक शेरला कुठे प्रतिसाद द्यावा, कशी दाद द्यावी, कुठे नको, याची औरंगाबादकरांची जाण पाहूण राहत इंदौरी भारावून गेले होते.

ठळक मुद्देप्रख्यात शायर राहत इंदौरी यांचे औरंगाबादवर विशेष प्रेमअनेकदा दिल्या भेटीही; शहरवासियांनीही केला सन्मान

औरंगाबाद : औरंगाबादकरांची उर्दू भाषेची जाण व त्यांचे शायरीवरील उत्कट प्रेम पाहून प्रख्यात शायर राहत इंदौरी यांनी येथील एका मुशायऱ्यात त्यांच्या विशेष अंदाजात ‘पुरे हिंदुस्थान में औरंगाबाद को सलाम करता हूँ...’ असा संवाद साधताच, उपस्थित हजारो रसिकजनांनी त्यांना ‘जनाब, बहोत खुब’ म्हणत टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.  

देशाचे जानेमाने शायर राहत इंदौरी यांच्या निधनाचे वृत्त शहरात धडकले अन्  त्यांच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली.  त्यांच्या औरंगाबाद भेटीच्या  आठवणी  अनेकांनी जागविल्या. मौलाना आझाद महाविद्यालयातील प्रा. सिद्दीकी झकियोद्दीन ऊर्फ मशू हे सचिव असलेल्या उम्मीद कल्चरल फाऊंडेशनने ६९ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने २६ जानेवारी २०१८ रोजी अखिल भारतीय स्तरावरील मुशायरा शहरात आयोजित केला होता. लोकमत वृत्तपत्र समूह या मुशायऱ्याचा मीडिया पार्टनर होता.  मौलाना आझाद महाविद्यालयालगतच्या नवल टाटा स्टेडियममध्ये हा मुशायरा पार पडला होता.  प्रा. मशू म्हणाले, देशभरातून १५ नामचीन शायर या मुशायऱ्यात सहभागी झाले होते; परंतु राहत इंदौरी यांना मिळालेला प्रतिसाद उत्स्फूर्त होता. 

शायरांनी पेश केलेल्या प्रत्येक शेरला कुठे प्रतिसाद द्यावा, कशी दाद द्यावी, कुठे नको, याची औरंगाबादकरांची जाण पाहूण राहत इंदौरी भारावून गेले होते. तेव्हा त्यांनी शायरीच्या दिवाण्या औरंगाबादकरांना उद्देशून ‘पुरे हिंदुस्थान में औरंगाबाद को सलाम करता हूँ...’ असे उद्गार काढले होते. या मुशायऱ्यात शिरकत केलेल्या मान्यवरांचे स्वागत लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, फाऊंडेशनचे अध्यक्ष मंजूर खान यांनी केले होते. यासह अनेक आठवणी प्रा. मशू यांनी सांगितल्या. सात महिन्यांपूर्वीच ११ जानेवारीला राहत इंदौरी औरंगाबादेत आले होते. कौमी एकतेवरील एक सुरेख संदेश यावेळी मुशायऱ्यातून त्यांनी दिला होता. त्यांना मंचावर शायरीसाठी निमंत्रित करताच औरंगाबादकरांनी उभे राहून टाळ्यांचा मोठा गजर केला होता. तेव्हा या सन्मानाला उत्तर देताना ते म्हणाले की, ‘बीमार हूँ. बेकार नहीं. आधी सदी से एक तिहाई दुनिया में मैं शायरी सुना रहा हूँ, लेकीन ऐसी कामयाबी नहीं देखी. त्यानंतर आपल्या विशेष अंदाजात त्यांनी, ‘अपना आवारा सर झुकाने को तेरी दहलिज देख लेता हूँ,और फिर कुछ दिखाई दे न देकाम की चीज देख लेता हूँ...’   पुढे ते म्हणतात, ‘तेरी परछाई मेरे घर से नहीं जाती है, तू कही हो मेरे अंदर से नहीं जाती है, आसमां मैंने तुझे सर पे उठा रखा है, ये है तोहमत जो मेरे सर से नहीं जाती है,

दु:ख तो ये है कि अभी अपनी सफहें तिरछी है,ये खराबी मेरे लश्कर से नहीं जाती है...’  हा शेर त्यांनी पेश केला होता. याला जोडत ते पुढे सादर करतात...

‘मैं जब मर जाऊं तो मेरी अलग पहचान लिख देना, लहूसे मेरी पेशानी पर हिंदुस्थान लिख देना,

उठा शमशीर, दिखा अपना हुनर, क्या लेगा,ये रही जान, ये गर्दन है, ये सर है, क्या लेगा,

सिर्फ एक शेर उड़ा देगा परखच्चे तेरे, तू समझता है कि शायर है ये, कर क्या लेगा...’या आशयगर्भ; परंतु विद्यमान स्थितीवर प्रखर भाष्य करणारी शायरी त्यांनी सादर केली होती. 

2009 मध्येही राहत इंदौरी एका मुशायऱ्यानिमित्त शहरात आले तेव्हा लोकमतला त्यांनी विशेष मुलाखत दिली होती. यासह अन्य एक-दोन वेळा औरंगाबादेत आलेल्या राहत इंदौरी यांचा औरंगाबादकरांवर विशेष लोभ होता. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यू