शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

मृतदेहापेक्षा जिवंत माणसांचीच भीती वाटते साहेब; ते करतात महिन्याला २० पोस्टमॉर्टेम

By संतोष हिरेमठ | Updated: January 16, 2024 14:41 IST

मृत्यूचे कारण उलगडतात, अनेकदा न्यायालयात साक्ष, आरोपीला शिक्षा

छत्रपती संभाजीनगर : एखाद्याच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यासाठी शवविच्छेदन महत्त्वाचे ठरते. त्यातूनच मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्याला शिक्षा होण्यासही मदत होते. हेच काम गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) न्यायवैद्यकशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डाॅ. कपिलेश्वर चौधरी करीत आहेत. महिन्याला संवेदनशील अशा प्रकरणातील २० ते ४० मृतदेहांचे ते शवविच्छेदन करतात.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या, आत्महत्या केलेल्या आणि खून झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेले जातात. शवविच्छेदन करणाऱ्या डाॅक्टरांना न्यायालयात साक्ष देण्यासाठीही अनेकदा जावे लागते. त्यांच्या साक्षीमुळे आरोपीला शिक्षादेखील होती. अशा परिस्थितीत या डाॅक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. या सगळ्या परिस्थितीला सामोरे जात डाॅ. चौधरी हे आपले काम करीत आहेत.

पहिले शवविच्छेदन करताना काय वाटले?डाॅ. चौधरी म्हणाले, २००५ मध्ये जयताने (ता. साक्री, जि. धुळे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होतो. तेव्हा पहिले शवविच्छेदन केले होते. ते आजही आठवते. रस्ते अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे शवविच्छेदन केले होते. अनेक विचार त्यावेळी आले होते.

मृतदेहाची भीती वाटत नाही का?डाॅ. चौधरी म्हणाले, पहिले शवविच्छेदन करताना थोडी भीती वाटली होती. परंतु आता कसलीही भीती वाटत नाही.

आतापर्यंत किती शवविच्छेदन केले?२००५ पासून आतापर्यंत ३ हजारांवर शवविच्छेदन केले आहे. धुळे येथे न्यायवैद्यकशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक ते विभागप्रमुख म्हणून २०११ ते २०१९ पर्यंत काम केले आहे. २०१९ पासून घाटीतील न्यायवैद्यकशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे, असे डाॅ. कपिलेश्वर चौधरी यांनी सांगितले.

नोकरीची सुरुवात याच कामापासून झाली का?प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून सुरुवात झाली. तेव्हाच पहिले शवविच्छेदन केले होते. त्यानंतर २००८ ते २०११ दरम्यान एमडी फाॅरेन्सिक मेडिसिन पूर्ण केले, असे डाॅ. चौधरी म्हणाले.

तुमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत नाही का?डाॅ. चौधरी म्हणाले, शवविच्छेदन करताना आरोग्याची काळजी घ्यावीच लागते. विविध संसर्गासह टीबीचा धोका असतो. त्यामुळे हँडग्लोज, मास्कचा वापर केला जातो. तसेच रिकाम्या पोटी म्हणजे जेवण न करता शवविच्छेदन करणे टाळतो.

काम करताना काही अडचणी आहेत का?मयताच्या अनेक नातेवाइकांना कायदेशीर बाबींचे ज्ञान नसते. विनाकारण वेगवेगळ्या शंका घेतल्या जातात. गरजेचे नसताना इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केली जाते. कायदेशीर बाबी समजावून सांगताना दमछाक होते. अनेकदा साक्ष देण्यासाठी कोर्टात जावे लागते. अशावेळी सुरक्षेचा प्रश्न सतावतो, असे डाॅ. कपिलेश्वर चौधरी म्हणाले.

समाजात हे काम सांगताना त्रास होतो का?डाॅ. चौधरी म्हणाले, डाॅक्टर म्हटले की औषधोपचार करणारे असाच समज लोकांचा असतो. त्यामुळे अनेक जण औषधोपचाराचा सल्ला मागतात. तेव्हा न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे डाॅक्टर असल्याचे सांगितल्यानंतर त्यांचा हिरमोड होतो.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबादDeathमृत्यूMedicalवैद्यकीय