शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

३०-३० घोटाळ्याबाबत वर्षभरापूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याने फोन केला होता,पण....अंबादास दानवे

By बापू सोळुंके | Updated: January 17, 2023 16:48 IST

माझे स्वत:चे घर नाही, मी आजही वडिलांच्या घरात राहतो. दोनपट, चारपट परतावा देणाऱ्या फसव्या योजनांवर माझा विश्वास नाही.

औरंगाबाद : दोनपट, चारपट परतावा देणाऱ्या योजनांवर आपला विश्वास नाही, यामुळे या ३०-३० घोटाळ्यांशी आपला संबंध नाही. मी पैसेवाला माणूस नाही, माझे स्वत:चे घर नाही, मी आजही वडिलांच्या घरात राहतो, असा खुलासा ३०-३० घोटाळ्यांत नाव आल्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला. वर्षभरापूर्वी पोलिसांचा आपल्याला याप्रकरणात फोन आला होता. तेव्हा त्या अधिकाऱ्यांना, माझ्या घरी यावे अथवा मी तुमच्याकडे येतो, असे सांगितले होते, यानंतर पोलिस माझ्याकडे आले नाहीत आणि मी त्यांच्याकडे गेलो, असेही त्यांनी नमूद केले.

औरंगाबादेतील कोट्यवधींच्या ३०-३० घोटाळ्यात विरोधी पक्षनेते आ. दानवे यांचे नाव असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमावर सोमवारी झळकल्या. या पार्श्वभूमीवर दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, माझी सांपत्तिक स्थिती सर्वांना माहिती आहे. माझे स्वत:चे घर नाही, मी आजही वडिलांच्या घरात राहतो. दोनपट, चारपट परतावा देणाऱ्या फसव्या योजनांवर माझा विश्वास नाही. यामुळे अशा योजनांमध्ये पैसे गुंतविण्याचा प्रश्नच नाही.

या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार संतोष राठोड यास तुम्ही ओळखता का, या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी, औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला आपण ओळखतो, असे सांगितले. ३०-३० घोटाळ्यांचे प्रकरण संपले आहे. याप्रकरणात आपल्याला वर्षभरापूर्वी पोलिस अधिकाऱ्यांचा फोन आला होता. राठोडकडून जप्त केलेल्या डायरीत गुंतवणूकदारांच्या नावांच्या यादीत आपले नाव असल्याचे आणि त्यासमोर एक आकडा असल्याचे समजले होते. तेव्हा त्या पोलिस अधिकाऱ्यांना काही माहिती हवी असेल, तर माझ्या घरी या अथवा मी तुमच्या कार्यालयात येतो, असे सांगितले होते. यानंतर ते अधिकारी माझ्याकडे आले नाहीत आणि मीही त्यांच्याकडे गेलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तुमच्यावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे का, या प्रश्नाच्या उत्तरात दानवे म्हणाले की, जो जास्त बोलतो, त्याला ‘ईडी’ची कारवाई करून गप्प करण्याचा प्रयत्न होतो, असे आपण पाहातो आहोत.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद