शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

३०-३० घोटाळ्याबाबत वर्षभरापूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याने फोन केला होता,पण....अंबादास दानवे

By बापू सोळुंके | Updated: January 17, 2023 16:48 IST

माझे स्वत:चे घर नाही, मी आजही वडिलांच्या घरात राहतो. दोनपट, चारपट परतावा देणाऱ्या फसव्या योजनांवर माझा विश्वास नाही.

औरंगाबाद : दोनपट, चारपट परतावा देणाऱ्या योजनांवर आपला विश्वास नाही, यामुळे या ३०-३० घोटाळ्यांशी आपला संबंध नाही. मी पैसेवाला माणूस नाही, माझे स्वत:चे घर नाही, मी आजही वडिलांच्या घरात राहतो, असा खुलासा ३०-३० घोटाळ्यांत नाव आल्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला. वर्षभरापूर्वी पोलिसांचा आपल्याला याप्रकरणात फोन आला होता. तेव्हा त्या अधिकाऱ्यांना, माझ्या घरी यावे अथवा मी तुमच्याकडे येतो, असे सांगितले होते, यानंतर पोलिस माझ्याकडे आले नाहीत आणि मी त्यांच्याकडे गेलो, असेही त्यांनी नमूद केले.

औरंगाबादेतील कोट्यवधींच्या ३०-३० घोटाळ्यात विरोधी पक्षनेते आ. दानवे यांचे नाव असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमावर सोमवारी झळकल्या. या पार्श्वभूमीवर दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, माझी सांपत्तिक स्थिती सर्वांना माहिती आहे. माझे स्वत:चे घर नाही, मी आजही वडिलांच्या घरात राहतो. दोनपट, चारपट परतावा देणाऱ्या फसव्या योजनांवर माझा विश्वास नाही. यामुळे अशा योजनांमध्ये पैसे गुंतविण्याचा प्रश्नच नाही.

या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार संतोष राठोड यास तुम्ही ओळखता का, या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी, औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला आपण ओळखतो, असे सांगितले. ३०-३० घोटाळ्यांचे प्रकरण संपले आहे. याप्रकरणात आपल्याला वर्षभरापूर्वी पोलिस अधिकाऱ्यांचा फोन आला होता. राठोडकडून जप्त केलेल्या डायरीत गुंतवणूकदारांच्या नावांच्या यादीत आपले नाव असल्याचे आणि त्यासमोर एक आकडा असल्याचे समजले होते. तेव्हा त्या पोलिस अधिकाऱ्यांना काही माहिती हवी असेल, तर माझ्या घरी या अथवा मी तुमच्या कार्यालयात येतो, असे सांगितले होते. यानंतर ते अधिकारी माझ्याकडे आले नाहीत आणि मीही त्यांच्याकडे गेलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तुमच्यावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे का, या प्रश्नाच्या उत्तरात दानवे म्हणाले की, जो जास्त बोलतो, त्याला ‘ईडी’ची कारवाई करून गप्प करण्याचा प्रयत्न होतो, असे आपण पाहातो आहोत.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद