शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

'करिअर करण्यासाठी राजकारणात आलो नाही'; राजू शेट्टी यांनी नाकारली चंद्रशेखर रावांची ऑफर!

By स. सो. खंडाळकर | Updated: February 14, 2023 12:48 IST

‘आमचं अस्तित्व संपवायचं नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणून लढायचंय...’

औरंगाबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव यांनी दिलेली ऑफर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी नम्रपणे नाकारली. आम्हाला आमच्या संघटनेचं अस्तित्व संपवायचं नाही. करिअर करण्यासाठी मी राजकारणात आलो नाही तर शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणून त्यासाठी लढा द्यायचा आहे, अशी आपली भूमिका स्पष्टपणाने ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी मांडली. पैठण येथे सोमवारी दिवसभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर ते ‘लोकमत’च्या प्रतिनिधीशी मोबाइलवरच बोलले.

राव माझे जुने मित्र.....त्यांनी सांगितले की, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव काही दिवसांपूर्वी मला भेटले. ते माझे जुने मित्र आहेत. कारण २००९ ते २०१४ या काळात आम्ही एकत्र लोकसभेत काम केले आहे. छोटी राज्ये झाली पाहिजेत, ही भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची असल्यामुळे त्यांच्या तेलंगणाच्या संघर्षाला माझा नेहमीच पाठिंबा राहिला होता. त्यांनी मला भारत राष्ट्र समितीमध्ये येऊन महाराष्ट्राचे प्रमुख पद घेण्याची विनंती केली होती. परंतु ती मी नम्रपणे नाकारली आहे.

चार प्रस्थापित पक्ष सोडून आघाडी व्हावी....महाराष्ट्रातील चार प्रस्थापित पक्ष सोडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आघाडी होत असेल तर त्याचा घटक पक्ष व्हायला आम्ही तयार आहोत. मुळात आमचं राजकारण शेतकऱ्यांसाठी आहे. करिअर करण्यासाठी नाही. त्यामुळे यापूर्वी आलेल्या ऑफर्स मी नाकारलेल्याच आहेत, असे त्यांनी नमूद केले.

रावांचे मुद्दे चांगलेच; पण.....त्यांनी सांगितले की, चंद्रशेखर राव यांचे मुद्दे चांगले असले तरी सध्याच्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष करून सभागृहात जाण्याची क्षमता असणारे फार कमी लोक आहेत आणि त्यांनी कुठल्या पक्षात गुंतून पडू नये, स्वतंत्रपणे काम करावे, या मताचा मी आहे. तुमची ऑफर स्वीकारली तर कदाचित चळवळीचं नुकसान होईल, हे मी चंद्रशेखर राव यांना सांगितले आहे. तुमच्या कार्यक्रमाला आमचा पाठिंबा आहे. तुमचे मुद्दे चांगले आहेत; पण कुणाच्या पक्षात जायचं नाही, असे राव यांना स्पष्ट सांगितले असल्याचे शेट्टी म्हणाले.

२२ फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्का जाम३७ टक्के वीज दरवाढीला विरोध, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवा, कांद्याचे गडगडलेले दर, कापूस व सोयाबीनचे दर, पीक विम्याचे पैसे, कृषी संजीवनी योजनेस मुदतवाढ द्या, बुलडाणा येथील शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांची खातेनिहाय चौकशी इ. मागण्यांसाठी २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वा. राज्यभर सर्वत्र प्रमुख रस्त्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी सोमवारी पैठणच्या बैठकीत केली.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावAurangabadऔरंगाबाद