शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

'करिअर करण्यासाठी राजकारणात आलो नाही'; राजू शेट्टी यांनी नाकारली चंद्रशेखर रावांची ऑफर!

By स. सो. खंडाळकर | Updated: February 14, 2023 12:48 IST

‘आमचं अस्तित्व संपवायचं नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणून लढायचंय...’

औरंगाबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव यांनी दिलेली ऑफर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी नम्रपणे नाकारली. आम्हाला आमच्या संघटनेचं अस्तित्व संपवायचं नाही. करिअर करण्यासाठी मी राजकारणात आलो नाही तर शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणून त्यासाठी लढा द्यायचा आहे, अशी आपली भूमिका स्पष्टपणाने ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी मांडली. पैठण येथे सोमवारी दिवसभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर ते ‘लोकमत’च्या प्रतिनिधीशी मोबाइलवरच बोलले.

राव माझे जुने मित्र.....त्यांनी सांगितले की, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव काही दिवसांपूर्वी मला भेटले. ते माझे जुने मित्र आहेत. कारण २००९ ते २०१४ या काळात आम्ही एकत्र लोकसभेत काम केले आहे. छोटी राज्ये झाली पाहिजेत, ही भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची असल्यामुळे त्यांच्या तेलंगणाच्या संघर्षाला माझा नेहमीच पाठिंबा राहिला होता. त्यांनी मला भारत राष्ट्र समितीमध्ये येऊन महाराष्ट्राचे प्रमुख पद घेण्याची विनंती केली होती. परंतु ती मी नम्रपणे नाकारली आहे.

चार प्रस्थापित पक्ष सोडून आघाडी व्हावी....महाराष्ट्रातील चार प्रस्थापित पक्ष सोडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आघाडी होत असेल तर त्याचा घटक पक्ष व्हायला आम्ही तयार आहोत. मुळात आमचं राजकारण शेतकऱ्यांसाठी आहे. करिअर करण्यासाठी नाही. त्यामुळे यापूर्वी आलेल्या ऑफर्स मी नाकारलेल्याच आहेत, असे त्यांनी नमूद केले.

रावांचे मुद्दे चांगलेच; पण.....त्यांनी सांगितले की, चंद्रशेखर राव यांचे मुद्दे चांगले असले तरी सध्याच्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष करून सभागृहात जाण्याची क्षमता असणारे फार कमी लोक आहेत आणि त्यांनी कुठल्या पक्षात गुंतून पडू नये, स्वतंत्रपणे काम करावे, या मताचा मी आहे. तुमची ऑफर स्वीकारली तर कदाचित चळवळीचं नुकसान होईल, हे मी चंद्रशेखर राव यांना सांगितले आहे. तुमच्या कार्यक्रमाला आमचा पाठिंबा आहे. तुमचे मुद्दे चांगले आहेत; पण कुणाच्या पक्षात जायचं नाही, असे राव यांना स्पष्ट सांगितले असल्याचे शेट्टी म्हणाले.

२२ फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्का जाम३७ टक्के वीज दरवाढीला विरोध, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवा, कांद्याचे गडगडलेले दर, कापूस व सोयाबीनचे दर, पीक विम्याचे पैसे, कृषी संजीवनी योजनेस मुदतवाढ द्या, बुलडाणा येथील शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांची खातेनिहाय चौकशी इ. मागण्यांसाठी २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वा. राज्यभर सर्वत्र प्रमुख रस्त्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी सोमवारी पैठणच्या बैठकीत केली.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावAurangabadऔरंगाबाद