शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
4
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
5
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
6
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
7
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
8
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
9
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
10
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
11
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
12
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
13
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
14
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
15
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
16
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
17
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
18
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
19
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
20
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी

'करिअर करण्यासाठी राजकारणात आलो नाही'; राजू शेट्टी यांनी नाकारली चंद्रशेखर रावांची ऑफर!

By स. सो. खंडाळकर | Updated: February 14, 2023 12:48 IST

‘आमचं अस्तित्व संपवायचं नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणून लढायचंय...’

औरंगाबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव यांनी दिलेली ऑफर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी नम्रपणे नाकारली. आम्हाला आमच्या संघटनेचं अस्तित्व संपवायचं नाही. करिअर करण्यासाठी मी राजकारणात आलो नाही तर शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणून त्यासाठी लढा द्यायचा आहे, अशी आपली भूमिका स्पष्टपणाने ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी मांडली. पैठण येथे सोमवारी दिवसभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर ते ‘लोकमत’च्या प्रतिनिधीशी मोबाइलवरच बोलले.

राव माझे जुने मित्र.....त्यांनी सांगितले की, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव काही दिवसांपूर्वी मला भेटले. ते माझे जुने मित्र आहेत. कारण २००९ ते २०१४ या काळात आम्ही एकत्र लोकसभेत काम केले आहे. छोटी राज्ये झाली पाहिजेत, ही भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची असल्यामुळे त्यांच्या तेलंगणाच्या संघर्षाला माझा नेहमीच पाठिंबा राहिला होता. त्यांनी मला भारत राष्ट्र समितीमध्ये येऊन महाराष्ट्राचे प्रमुख पद घेण्याची विनंती केली होती. परंतु ती मी नम्रपणे नाकारली आहे.

चार प्रस्थापित पक्ष सोडून आघाडी व्हावी....महाराष्ट्रातील चार प्रस्थापित पक्ष सोडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आघाडी होत असेल तर त्याचा घटक पक्ष व्हायला आम्ही तयार आहोत. मुळात आमचं राजकारण शेतकऱ्यांसाठी आहे. करिअर करण्यासाठी नाही. त्यामुळे यापूर्वी आलेल्या ऑफर्स मी नाकारलेल्याच आहेत, असे त्यांनी नमूद केले.

रावांचे मुद्दे चांगलेच; पण.....त्यांनी सांगितले की, चंद्रशेखर राव यांचे मुद्दे चांगले असले तरी सध्याच्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष करून सभागृहात जाण्याची क्षमता असणारे फार कमी लोक आहेत आणि त्यांनी कुठल्या पक्षात गुंतून पडू नये, स्वतंत्रपणे काम करावे, या मताचा मी आहे. तुमची ऑफर स्वीकारली तर कदाचित चळवळीचं नुकसान होईल, हे मी चंद्रशेखर राव यांना सांगितले आहे. तुमच्या कार्यक्रमाला आमचा पाठिंबा आहे. तुमचे मुद्दे चांगले आहेत; पण कुणाच्या पक्षात जायचं नाही, असे राव यांना स्पष्ट सांगितले असल्याचे शेट्टी म्हणाले.

२२ फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्का जाम३७ टक्के वीज दरवाढीला विरोध, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवा, कांद्याचे गडगडलेले दर, कापूस व सोयाबीनचे दर, पीक विम्याचे पैसे, कृषी संजीवनी योजनेस मुदतवाढ द्या, बुलडाणा येथील शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांची खातेनिहाय चौकशी इ. मागण्यांसाठी २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वा. राज्यभर सर्वत्र प्रमुख रस्त्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी सोमवारी पैठणच्या बैठकीत केली.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावAurangabadऔरंगाबाद