शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
3
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
4
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
5
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
6
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
7
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
8
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
9
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
10
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
11
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
12
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
13
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
14
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
15
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
16
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
17
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
18
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
19
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
20
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

मी पुन्हा एकदा सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगतोय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:07 IST

यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आणि पुन्हा एकदा सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगत असल्याचे ‘सीएमआयए’चे माजी अध्यक्ष गौतम नंदावत म्हणाले.

ठळक मुद्देअवयव दान : युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये गौतम नंदावर यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी

औरंगाबाद : आयुष्यात दुसऱ्यांसाठी रुग्णालयात गेलो; परंतु स्वत:च्या एखाद्या आजारासाठी कधीही रुग्णालयाची पायरी चढलो नव्हतो. इंजेक्शनची भीती वाटत असे. अशा सगळ्यात ६ सें.मी.च्या ट्युमरमुळे यकृताची चलनप्रक्रिया थंडावली. तीन महिन्यांपेक्षा अधिक आयुष्य नसल्याचे सांगितले जात होते; परंतु यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आणि पुन्हा एकदा सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगत असल्याचे ‘सीएमआयए’चे माजी अध्यक्ष गौतम नंदावत म्हणाले.शहरातील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये आॅगस्टमध्ये त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती देताना ते बोलत होते. यावेळी युनायटेड सिग्मा हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उन्मेष टाकळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय रोटे, मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलचे डॉ. विक्रम राऊत यांची उपस्थिती होती. या दोन्ही रुग्णालयातील तज्ज्ञांनी ही शस्त्रक्रिया केली. डॉ. टाकळकर म्हणाले, ब्रेन डेड व्यक्तीचे यकृत अथवा नातेवाईकांचे अर्धे यकृत घेऊन प्रत्यारोपण शक्य असते. दोन्ही रुग्णालयाच्या सहकार्याने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सिग्मा हॉस्पिटलमधील हे दुसरे यकृत प्रत्यारोपण होते. अवयवदानाची ही प्रक्रिया अधिक सक्षम व्हावी. त्यातून अधिक रुग्णांना फायदा होईल.शहरातच शस्त्रक्रियेचा विश्वासकुटुंबातील व्यक्तींचे यकृत वैद्यकीय कारणांमुळे प्रत्यारोपित करता आले नाही. अखेर सिग्मा हॉस्पिटलमध्ये यकृत उपलब्ध झाले आणि शस्त्रक्रियाही झाली. यापूर्वी १९९८ मध्ये नातेवाईकाच्या स्टेंटची शस्त्रक्रिया शहरातच झाली होती. त्यामुळे यकृत प्रत्यारोपणही शहरातच होईल, असा विश्वास होता, असे गौतम नंदावत म्हणाले.पारदर्शकपणे होते प्रत्यारोपणदरवर्षी किमान देशात ३० हजार लोकांना यकृत प्रत्यारोपणाची गरज असते. प्रत्यक्षात १५०० ते २ हजार लोकांनाच यकृत उपलब्ध होते. यकृत, किडनी प्रत्यारोपणाअभावी अनेक जण मृत्युमुखी पडतात. त्यामुळे अवयवदानामुळे एखाद्याचा जीव कसा वाचतो, हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडत असते. त्यावर शासनाचीही देखरेख असते, असे डॉ. विक्रम राऊत म्हणाले. 

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल