शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

'मी औरंगाबादकर'; नामांतरविरोधी मोर्चात तरुणाईचा उत्साह, भर पावसात निघाला मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 20:12 IST

‘आम्ही औरंगाबादकर, हमारा औरंगाबाद, तारिखी औरंगाबाद’ अशा अनेक फलकांसह तरुण तिरंगा झेंडा घेऊन उपस्थित होते.

औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याचा ठराव मागील महिन्यात राज्य सरकारने घेतला. या निर्णयाविरोधात शहरात सर्वपक्षीय नामांतरविरोधी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. समितीने मंगळवारी दुपारी भडकलगेट ते आमखास मैदानापर्यंत भव्य मोर्चाचे आयोजन केले. मोर्चात तरुणाईची लक्षणीय उपस्थिती होती. ‘मी औरंगाबादचा, औरंगाबाद माझे’ यासह ‘आय लव्ह औरंगाबाद’ अशा अनेक फलकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

दुपारी दोन वाजता सुरू होणारा मोर्चा फारशी गर्दी न जमल्यामुळे तीन वाजता सुरू झाला. टाऊन हॉल उड्डाणपूल ओलांडून मोर्चा थेट आमखास मैदानात दाखल झाला. ‘आम्ही औरंगाबादकर, हमारा औरंगाबाद, तारिखी औरंगाबाद’ अशा अनेक फलकांसह तरुण तिरंगा झेंडा घेऊन उपस्थित होते. दुपारपासूनच रिमझिम पाऊस सुरू होता. त्यानंतरही मोर्चातील गर्दी कमी झाली नाही. उलट वाढत गेली. यावेळी एमआयएमचे माजी शहराध्यक्ष शारेख नक्षबंदी, माजी नगरसेवक महेंद्र सोनवणे, गंगाधर ढगे, नासेर सिद्दीकी, कुणाल खरात, अय्युब जहागीरदार, शुकूर सालार, आदींनी मार्गदर्शन केले. शेख अहेमद यांनी संचालन केले.

खा. जलील यांची शरद पवारांवर टीका...राज्य शासनाने शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादच्या नामांतराचा ठराव मंजूर केला त्यावेळी, हा निर्णय सर्वांच्या सहमतीने घेण्यात आल्याच शरद पवार म्हणाले होते. मात्र, त्यांनतर शरद पवार काल औरंगाबादमध्ये असतांना म्हणाले की, आम्हाला माहितच नाही काय ठराव घेतला. आम्हाला याबाबतीत काहीच माहित नसल्याचे म्हणाले. हे म्हणजे झूठ बोले कंव्वा कांटे असे आहे, अशी टीका खा. इम्तियाज जलील यांनी यावेळी केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनImtiaz Jalilइम्तियाज जलील