शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली तब्बल तेरा वर्षांचा कारावास भोगल्यानंतर पतीसह सासू-सासरे निर्दोष मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:09 IST

पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली तब्बल तेरा वर्षांचा कारावास भोगल्यानंतर पतीसह मृताचे सासू-सासरे यांची औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी जन्मठेपेची शिक्षा रद्द करून निर्दोष मुक्तता केली.

ठळक मुद्देमयताच्या सासू -सासऱ्यांनाही सात वर्षांच्या कारावासानंतर जामीन

औरंगाबाद : पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली तब्बल तेरा वर्षांचा कारावास भोगल्यानंतर पतीसह मृताचे सासू-सासरे यांची औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी जन्मठेपेची शिक्षा रद्द करून निर्दोष मुक्तता केली.आरोपी पती अनिल विश्वनाथ पथवे (रा. सावरगाव पाट, ता. अकोले, जि.अहमदनगर) हा गेली १३ वर्षे कारागृहातच आहे. तर त्याचे आई-वडीलही सात वर्षे कारागृहात होते. त्यांना नंतर जामीन मंजूर झाला. या तिघांना संगमनेरच्या सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.मृत सीताबाईची आई शांताबाई यांनी फिर्याद दिली होती की, आरोपी अनिलचे लग्न २००३ मध्ये त्यांची मुलगी सीताबाई हिच्याशी झाले होते. १३ नोव्हेंबर २००५ रोजी सीताबाई घरातून गायब झाली. १६ नोव्हेंबर २००५ रोजी तिचा मृतदेह त्यांचे शेजारी केशव जगताप यांच्या विहिरीत आढळला होता. मृतदेहाचे जागेवरच दोन डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. प्राथमिक अहवालात त्यांनी सीताबाईचा बुडून मृत्यू झाल्याचे नमूद केले; परंतु अंतिम अहवालात गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे नमूद केले. अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मूलबाळ होत नसल्याने सीताबाईचा खून करण्यात आल्याचे यात म्हटले होते.संगमनेर सत्र न्यायालयाने अनिल, त्याची आई सावित्रीबाई आणि वडील विश्वनाथ पथवे यांना कलम ४९८ (अ) मधून मुक्त केले, पण खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या शिक्षेविरोधात तिघांनीही उच्च न्यायालयात अपील दाखल केले. सुनावणीदरम्यान खंडपीठाने प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी सत्र न्यायालयाकडे पाठविले. मात्र तिघांचीही शिक्षा सत्र न्यायालयाने कायम केली.या शिक्षेविरुद्ध तिघांनीही अ‍ॅड. व्ही. डी. सपकाळ यांच्यामार्फत खंडपीठात अपील दाखल केले. सुनावणीच्या वेळी म्हणणे मांडण्यात आले, की शवविच्छेदन करणाºया डॉक्टरांचे दोन अहवाल संशयास्पद आहेत. सीताबाई ही १३ नोव्हेंबरला गायब झाली आणि १६ ला तिचा मृतदेह आढळला. पती व सासरच्यांनी तिचा बराच शोध घेतला. पोलीस पाटील यांच्या जबाबात, मृत सीताबाई ही यापूवीर्ही दोन-तीन वेळा घरातून अचानक निघून गेल्याचे स्पष्ट झालेले आहे. तसेच हुंडाबळीच्या आरोपातून सत्र न्यायालयाने आरोपींना मुक्त केले आहे. आरोपी ठाकर समाजाचे आहेत. त्यांच्यामध्ये दोन विवाहाची प्रथा अजूनही आहे. त्यामुळे मूलबाळ होत नसल्याने खून करण्याचे काहीही सबळ कारण दिसून येत नाही. अ‍ॅड. सपकाळ यांना अ‍ॅड. आदिनाथ जगताप आणि अ‍ॅड.संदीप सपकाळ यांनी साह्य केले.--------------

टॅग्स :Courtन्यायालयAurangabadऔरंगाबादmurbadमुरबाड