शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली तब्बल तेरा वर्षांचा कारावास भोगल्यानंतर पतीसह सासू-सासरे निर्दोष मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:09 IST

पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली तब्बल तेरा वर्षांचा कारावास भोगल्यानंतर पतीसह मृताचे सासू-सासरे यांची औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी जन्मठेपेची शिक्षा रद्द करून निर्दोष मुक्तता केली.

ठळक मुद्देमयताच्या सासू -सासऱ्यांनाही सात वर्षांच्या कारावासानंतर जामीन

औरंगाबाद : पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली तब्बल तेरा वर्षांचा कारावास भोगल्यानंतर पतीसह मृताचे सासू-सासरे यांची औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी जन्मठेपेची शिक्षा रद्द करून निर्दोष मुक्तता केली.आरोपी पती अनिल विश्वनाथ पथवे (रा. सावरगाव पाट, ता. अकोले, जि.अहमदनगर) हा गेली १३ वर्षे कारागृहातच आहे. तर त्याचे आई-वडीलही सात वर्षे कारागृहात होते. त्यांना नंतर जामीन मंजूर झाला. या तिघांना संगमनेरच्या सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.मृत सीताबाईची आई शांताबाई यांनी फिर्याद दिली होती की, आरोपी अनिलचे लग्न २००३ मध्ये त्यांची मुलगी सीताबाई हिच्याशी झाले होते. १३ नोव्हेंबर २००५ रोजी सीताबाई घरातून गायब झाली. १६ नोव्हेंबर २००५ रोजी तिचा मृतदेह त्यांचे शेजारी केशव जगताप यांच्या विहिरीत आढळला होता. मृतदेहाचे जागेवरच दोन डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. प्राथमिक अहवालात त्यांनी सीताबाईचा बुडून मृत्यू झाल्याचे नमूद केले; परंतु अंतिम अहवालात गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे नमूद केले. अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मूलबाळ होत नसल्याने सीताबाईचा खून करण्यात आल्याचे यात म्हटले होते.संगमनेर सत्र न्यायालयाने अनिल, त्याची आई सावित्रीबाई आणि वडील विश्वनाथ पथवे यांना कलम ४९८ (अ) मधून मुक्त केले, पण खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या शिक्षेविरोधात तिघांनीही उच्च न्यायालयात अपील दाखल केले. सुनावणीदरम्यान खंडपीठाने प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी सत्र न्यायालयाकडे पाठविले. मात्र तिघांचीही शिक्षा सत्र न्यायालयाने कायम केली.या शिक्षेविरुद्ध तिघांनीही अ‍ॅड. व्ही. डी. सपकाळ यांच्यामार्फत खंडपीठात अपील दाखल केले. सुनावणीच्या वेळी म्हणणे मांडण्यात आले, की शवविच्छेदन करणाºया डॉक्टरांचे दोन अहवाल संशयास्पद आहेत. सीताबाई ही १३ नोव्हेंबरला गायब झाली आणि १६ ला तिचा मृतदेह आढळला. पती व सासरच्यांनी तिचा बराच शोध घेतला. पोलीस पाटील यांच्या जबाबात, मृत सीताबाई ही यापूवीर्ही दोन-तीन वेळा घरातून अचानक निघून गेल्याचे स्पष्ट झालेले आहे. तसेच हुंडाबळीच्या आरोपातून सत्र न्यायालयाने आरोपींना मुक्त केले आहे. आरोपी ठाकर समाजाचे आहेत. त्यांच्यामध्ये दोन विवाहाची प्रथा अजूनही आहे. त्यामुळे मूलबाळ होत नसल्याने खून करण्याचे काहीही सबळ कारण दिसून येत नाही. अ‍ॅड. सपकाळ यांना अ‍ॅड. आदिनाथ जगताप आणि अ‍ॅड.संदीप सपकाळ यांनी साह्य केले.--------------

टॅग्स :Courtन्यायालयAurangabadऔरंगाबादmurbadमुरबाड