शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील भरती अडथळ्यांच्या शर्यतीत!

By मुजीब देवणीकर | Updated: May 30, 2024 20:07 IST

आचारसंहितेचे तर निमित्त : अद्याप रोस्टरच ठरले नाही

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेत मागील तीन दशकांपासून कर्मचारी भरतीच झाली नाही. मागील दोन वर्षांपासून कर्मचारी भरतीचे वारे वाहू लागले. पहिल्या टप्प्यात ११४ कर्मचारी भरतीसाठी प्रक्रिया राबविण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यात २७४ पदे भरायची आहेत. त्यासाठी सध्या आचारसंहितेचे निमित्त करण्यात येत आहे. वास्तविक पाहता कोणत्या प्रवर्गाला किती आरक्षण द्यायचे, याचे रोस्टरच ठरलेले नाही.

महापालिकेत सध्या जिकडे तिकडे निवृत्त अधिकारी, कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी पाहायला मिळत आहेत. निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोणतेही अधिकार देता येत नाही, हा शासनाचाच नियम असतानाही बहुतांश अधिकाऱ्यांना अधिकार बहाल करून ठेवण्यात आले. त्यामुळे प्रशासनावर याचा नंतर ठपका ठेवला जाणार हे निश्चित. २०१७-१८ मध्ये कर्मचारी भरतीचा आकृतीबंध शासनाने मंजूर केला. त्यानंतर सुधारित आकृतीबंधही शासनाने मंजूर करून दिला. भरतीची प्रक्रिया अत्यंत संथगतीने राबविण्यात येत आहे. डिसेंबर २०२३ मध्ये पहिल्या टप्प्यात ११४ पदे भरण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्यात २९ पदे अग्निशमन विभागाची होती. २९ पैकी नऊ उमेदवार अग्निशमन विभागात रुजू झाले. उर्वरित ८५ पदांपैकी ७० पदांवर उमेदवार रुजू झाले आहेत, पंधरा पदांवर उमेदवार रुजू होणे बाकी आहे.

दुसरा टप्प्यात २७४ पदेदुसऱ्या टप्प्यात २७४ पदांसाठी भरती करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला. त्याला देखील शासनाने मान्यता दिली. शासनाने नियुक्त केलेल्या आयबीपीएस या संस्थेच्या माध्यमातून परीक्षा घेऊन ही पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पदांचे रोस्टर (आरक्षण निहाय) ठरवणे गरजेचे होते, रोस्टर ठरवून त्याला विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग शाखेची मान्यता मिळाल्यावर जाहिरात प्रक्रिया करून पदे भरण्याची कार्यवाही केली जाणार होते. मराठा आरक्षणाबद्दल शासनाने घेतलेला निर्णय आणि त्यानंतर लागू झालेली लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता यामुळे पदांचे रोस्टर ठरविण्याची प्रक्रिया अद्याप झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका