शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

दुरूनच दुर्गंधी येणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यावर शेकडो एकरवर फळबाग, ऊस आणि गुरांसाठी गवत

By बापू सोळुंके | Updated: May 30, 2024 18:42 IST

दुरूनच दुर्गंधी येणाऱ्या या पाण्यात विद्युत मोटारपंपाद्वारे पाण्याचा उपसा करून फळबाग, ऊस आणि गुरांसाठी गवत पिकविले जात आहे.

छत्रपती संभाजीनगर : पाणीटंचाईमुळे सारे त्रस्त असताना शहरातून वाहणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यावर मात्र वाळूज परिसरातील शेती चांगलीच बहरल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून मंगळवारी दिसून आले.

दुरूनच दुर्गंधी येणाऱ्या या पाण्यात विद्युत मोटारपंपाद्वारे पाण्याचा उपसा करून फळबाग, ऊस आणि गुरांसाठी गवत पिकविले जात आहे. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत आटले आहेत. तीव्र पाणीटंचाईचा सामना सुरू असताना शहरालगतच्या काही गावांत मात्र ड्रेनेजच्या पाण्यावर जोरदार शेती सुरू असल्याचे मंगळवारी लोकमत प्रतिनिधींना दिसून आले. छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वांत मोठ्या नाल्यातून ड्रेनेजचे पाणी वाहत वाळूज, वळदगाव मार्गे पुढे वाहत जाते. या नाल्यातून वाहणाऱ्या घाणेरड्या पाण्याची दुर्गंधी सुमारे अर्धा किलोमीटर परिसरात पसरलेली असते. अशा नाल्याच्या दोन्ही काठावर शेती असलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी नाल्यामध्ये शेकडो विद्युत मोटार पंप टाकले आहेत. 

या पंपाद्वारे नाल्यातील पाणी उपसा करून ते शेतातील पिकांना देण्यात येते. विशेष म्हणजे हा नाला रात्रंदिवस वाहतो. यामुळे पाण्याचा तुटवडा कधीही भासत नाही. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जास्त पाणी लागणाऱ्या उसाची शेती या पाण्यावर सुरू केली आहे. वळदगाव, धामोरी वाळूज परिसरातील नाल्याकाठचे शेतकरी नाल्याच्या पाण्यावर शेती करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी मोसंबीच्या बागा लावल्या आहेत, तर काही जण भाजीपाला पिकवितात. शिवाय जनावरांसाठी हिरवा चारा म्हणून गवत शेतीही मुबलक प्रमाणात दिसून आली. हे गवत शहरातील पशुखाद्य म्हणून विकून बक्कळ कमाई हे शेतकरी करतात.

सुखना नदीतील चेम्बरमध्ये विद्युत मोटारपंपशहराच्या पूर्वेला वाहणाऱ्या सुखना नदीत खूप मोठी ड्रेनेजलाइन आहे. बंद ड्रेनेजलाइनच्या पाइपमध्ये चोकअप हाेऊ नये, तसेच नवीन जोडणी देण्यासाठी ठिकठिकाणी महाकाय चेम्बर आहेत. या चेम्बर्समध्ये सुखनाकाठच्या शेतकऱ्यांनी मोटारपंप टाकून चेम्बरमधील घाणरेड्या पाण्याचा उपसा करून शेतासाठी वापर केला जात आहे.

पाच वर्षांपूर्वी झाली होती मोठी दुर्घटनाचेम्बरमधील मोटार पंप काढताना चार शेतमजूर आणि शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना चार वर्षांपूर्वी घडली. तेव्हा ड्रेनेज चेम्बरमध्ये मोटार पंप बंद करण्याचे निर्देश पोलिस विभागाने शेतकऱ्यांना दिले होते. या घटनेनंतर काही महिने मोटार पंप बंद करण्यात आले होते. मात्र, दरवर्षी उन्हाळ्यात हमखास ड्रेनेजमध्ये मोटारपंप टाकून उपसा करण्याचे काम शेतकरी करतात. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र