शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

HSC Result : औरंगाबाद विभागात जालन्याची बाजी; बीड दुसऱ्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 16:34 IST

उत्तीर्णतेच्या टक्केवारीत मुलींची आघाडी कायम

ठळक मुद्देविभागाचा निकाल ८८.१८ टक्के राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के

औरंगाबाद :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात औरंगाबाद विभागात जालना जिल्ह्याचा निकाल ९०.७२ टक्के एवढा लागला आहे. तर दुसऱ्या स्थानी बीड जिल्हा राहिला असून, ८८.८३ टक्के निकाल लागला आहे. विभागात उत्तीर्णतेत यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.१३ टक्के असून, मुलाची ८५.६६ टक्के एवढी आहे. 

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निकालात राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक ९५.८९ टक्के लागला आहे तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१८ टक्के आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला आहे. 

बारावी परीक्षेचा निकालाची अनेक विद्यार्थी अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. त्यात सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा केल्या जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता अखेर विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेली बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोना महामारी मुळे यावर्षी निकाल लावण्यासाठी विलंब झाला आहे.

औरंगाबाद विभागाचा निकाल ८८.१८ टक्के लागला असून विभागातील ४०६ परीक्षा केंद्रावर बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. सदरील परीक्षेला विभागातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली असे एकूण विभागातून १ लाख ६४ हजार ७३०विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंद केली होती. त्यात १लाख ६३ हजार ७३८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १ लाख ४४ हजार ३७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ८७.७६ टक्के लागला. तर जालना जिल्ह्यातुन २९ हजार ६३७ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यापैकी २९ हजार ५४५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर त्यापैकी २६ हजार ८०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर जालना जिल्ह्याचा निकाल ९०.७२ टक्के लागला.

तसेच बीड जिल्ह्यातील ३९ हजार १५६ विद्यार्थ्यांपैकी ३८ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर त्यापैकी ३४ हजार ५४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर बीड जिल्ह्याचा निकाल ८८.८३ टक्के लागला. तसेच परभणी जिल्ह्यातील एकूण २३ हजार १३४ विद्यार्थ्यांपैकी २२ हजार ८४९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १९ हजार ३४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण परभणी जिल्ह्याचा निकाल ८४.६६% लागला. याशिवाय हिंगोली जिल्ह्यातून १२ हजार ४०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १२ हजार २८० विद्यार्थी परीक्षेला बसले. तर त्यात १० हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर एकूण हिंगोली जिल्ह्याचा निकाल ८८.५४ % एवढा लागला लागला. 

मुलींची यशाची परंपरा कायमऔरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड असे एकूण विभागात बारावी परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. विभागातून ९२.१३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर मुलांचे प्रमाण हे ८५.६६ टक्के लागला आहे. त्यामुळे यंदा मुलींचीच बाजी मारली आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी