शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

हे कसे जमणार सरकार? फळपीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त ३१ तासांचा दिला वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:48 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत मिळावी, यानुषंगाने शासनाने पीकविमा योजना लागू केली असली तरी लालफितीच्या नोकरशाहीमुळे या योजनेचा पुरता बोजवारा उडत आहे.

- यादवकुमार शिंदे

सोयगाव : संत्रा, पेरू, लिंबू, द्राक्ष या ४ फळपिकांचा विमा काढण्यासाठी राज्य सरकारकडून फक्त ३१ तासांचा वेळ देण्यात आल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत मिळावी, यानुषंगाने शासनाने पीकविमा योजना लागू केली असली तरी लालफितीच्या नोकरशाहीमुळे या योजनेचा पुरता बोजवारा उडत आहे. फळपिकांचा विमा काढण्यासाठीचे राज्याच्या कृषी आयुक्तांनी १३ जून रोजी सायंकाळी ५:०० वाजता सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना पत्र पाठवले. त्यात फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती करावी, असे सांगितले. तसेच संत्रा, पेरू, लिंबू, द्राक्ष या चार पिकांचा विमा काढण्याची अखेरची मुदत १४ जून रोजी रात्री १२:०० वाजेच्या आत दिली. त्यामुळे ३१ तासांमध्ये या फळपिकांचा संबंधित शेतकऱ्यांनी विमा कसा काढावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. यातच अनेक शेतकऱ्यांना या फळपिकांचा विमा काढता आला नाही. याबाबत तालुका कृषी अधिकारी रमेश गुंडीले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, राज्य शासनाने यंदा आठ फळपिकांसाठी विमा योजना राबवली आहे. शनिवारी दिवसभर शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत; परंतु, काही पिकांना एक दिवसाचाच वेळ मिळाल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे. कृषी आयुक्तालयाने केंद्र सरकारला मुदत वाढविण्याची विनंती केली आहे. त्यामुळे या चारही फळपिकांसाठी मुदत वाढून मिळण्याची शक्यता आहे.

कोणती कागदपत्रे आवश्यक ?योजनेसाठी अर्ज करताना ॲग्रिस्टॅक नोंदणी, आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमीन उतारा, जिओ टॅग फोटो, ई-पीक पाहणी असणे बंधनकारक आहे. ही सर्व कागदपत्रे ३१ तासांत जमवणे, या योजनेची माहिती घेणे आणि पैशांची तजवीज करून अर्ज करणे शक्य आहे का? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. शिवाय एकाच दिवशी एकाच वेबसाइटवर राज्यातील सर्व शेतकरी अर्ज करू लागले तर विमा पोर्टल सुरळीत चालणार का, असा प्रश्न निर्माण होतो. १४ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता विमा पोर्टल वेबसाइटला एरर येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे घाईत तयारी केलेल्या शेतकऱ्यांनाही या फळपिकांचा विमा काढता आला नाही.

अन्य कोणत्या पिकांना किती मुदत ?चिकू, मोसंबी पिकांसाठी ३० जून, डाळिंब पिकासाठी १४ जुलै, तर सीताफळ पिकाचा विमा काढण्यासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

विम्याची मुदत वाढेलफळबाग पीक विमा योजनेंतील लिंबू, पेरू, द्राक्ष आणि संत्रा या पिकांचा विमा काढण्यासाठी १३ जून रोजी संकेतस्थळ सुरू झाले आणि १४ जूनपर्यंत विमा काढण्यास मुदत होती. ही बाब कृषी आयुक्तालयांस कळविली आहे. या फळपिकांच्या विम्याची मुदत नक्की वाढेल.-प्रकाश देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी