शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हे कसे जमणार सरकार? फळपीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त ३१ तासांचा दिला वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:48 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत मिळावी, यानुषंगाने शासनाने पीकविमा योजना लागू केली असली तरी लालफितीच्या नोकरशाहीमुळे या योजनेचा पुरता बोजवारा उडत आहे.

- यादवकुमार शिंदे

सोयगाव : संत्रा, पेरू, लिंबू, द्राक्ष या ४ फळपिकांचा विमा काढण्यासाठी राज्य सरकारकडून फक्त ३१ तासांचा वेळ देण्यात आल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत मिळावी, यानुषंगाने शासनाने पीकविमा योजना लागू केली असली तरी लालफितीच्या नोकरशाहीमुळे या योजनेचा पुरता बोजवारा उडत आहे. फळपिकांचा विमा काढण्यासाठीचे राज्याच्या कृषी आयुक्तांनी १३ जून रोजी सायंकाळी ५:०० वाजता सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना पत्र पाठवले. त्यात फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती करावी, असे सांगितले. तसेच संत्रा, पेरू, लिंबू, द्राक्ष या चार पिकांचा विमा काढण्याची अखेरची मुदत १४ जून रोजी रात्री १२:०० वाजेच्या आत दिली. त्यामुळे ३१ तासांमध्ये या फळपिकांचा संबंधित शेतकऱ्यांनी विमा कसा काढावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. यातच अनेक शेतकऱ्यांना या फळपिकांचा विमा काढता आला नाही. याबाबत तालुका कृषी अधिकारी रमेश गुंडीले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, राज्य शासनाने यंदा आठ फळपिकांसाठी विमा योजना राबवली आहे. शनिवारी दिवसभर शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत; परंतु, काही पिकांना एक दिवसाचाच वेळ मिळाल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे. कृषी आयुक्तालयाने केंद्र सरकारला मुदत वाढविण्याची विनंती केली आहे. त्यामुळे या चारही फळपिकांसाठी मुदत वाढून मिळण्याची शक्यता आहे.

कोणती कागदपत्रे आवश्यक ?योजनेसाठी अर्ज करताना ॲग्रिस्टॅक नोंदणी, आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमीन उतारा, जिओ टॅग फोटो, ई-पीक पाहणी असणे बंधनकारक आहे. ही सर्व कागदपत्रे ३१ तासांत जमवणे, या योजनेची माहिती घेणे आणि पैशांची तजवीज करून अर्ज करणे शक्य आहे का? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. शिवाय एकाच दिवशी एकाच वेबसाइटवर राज्यातील सर्व शेतकरी अर्ज करू लागले तर विमा पोर्टल सुरळीत चालणार का, असा प्रश्न निर्माण होतो. १४ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता विमा पोर्टल वेबसाइटला एरर येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे घाईत तयारी केलेल्या शेतकऱ्यांनाही या फळपिकांचा विमा काढता आला नाही.

अन्य कोणत्या पिकांना किती मुदत ?चिकू, मोसंबी पिकांसाठी ३० जून, डाळिंब पिकासाठी १४ जुलै, तर सीताफळ पिकाचा विमा काढण्यासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

विम्याची मुदत वाढेलफळबाग पीक विमा योजनेंतील लिंबू, पेरू, द्राक्ष आणि संत्रा या पिकांचा विमा काढण्यासाठी १३ जून रोजी संकेतस्थळ सुरू झाले आणि १४ जूनपर्यंत विमा काढण्यास मुदत होती. ही बाब कृषी आयुक्तालयांस कळविली आहे. या फळपिकांच्या विम्याची मुदत नक्की वाढेल.-प्रकाश देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी