शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

हे कसे जमणार सरकार? फळपीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त ३१ तासांचा दिला वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:48 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत मिळावी, यानुषंगाने शासनाने पीकविमा योजना लागू केली असली तरी लालफितीच्या नोकरशाहीमुळे या योजनेचा पुरता बोजवारा उडत आहे.

- यादवकुमार शिंदे

सोयगाव : संत्रा, पेरू, लिंबू, द्राक्ष या ४ फळपिकांचा विमा काढण्यासाठी राज्य सरकारकडून फक्त ३१ तासांचा वेळ देण्यात आल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत मिळावी, यानुषंगाने शासनाने पीकविमा योजना लागू केली असली तरी लालफितीच्या नोकरशाहीमुळे या योजनेचा पुरता बोजवारा उडत आहे. फळपिकांचा विमा काढण्यासाठीचे राज्याच्या कृषी आयुक्तांनी १३ जून रोजी सायंकाळी ५:०० वाजता सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना पत्र पाठवले. त्यात फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती करावी, असे सांगितले. तसेच संत्रा, पेरू, लिंबू, द्राक्ष या चार पिकांचा विमा काढण्याची अखेरची मुदत १४ जून रोजी रात्री १२:०० वाजेच्या आत दिली. त्यामुळे ३१ तासांमध्ये या फळपिकांचा संबंधित शेतकऱ्यांनी विमा कसा काढावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. यातच अनेक शेतकऱ्यांना या फळपिकांचा विमा काढता आला नाही. याबाबत तालुका कृषी अधिकारी रमेश गुंडीले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, राज्य शासनाने यंदा आठ फळपिकांसाठी विमा योजना राबवली आहे. शनिवारी दिवसभर शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत; परंतु, काही पिकांना एक दिवसाचाच वेळ मिळाल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे. कृषी आयुक्तालयाने केंद्र सरकारला मुदत वाढविण्याची विनंती केली आहे. त्यामुळे या चारही फळपिकांसाठी मुदत वाढून मिळण्याची शक्यता आहे.

कोणती कागदपत्रे आवश्यक ?योजनेसाठी अर्ज करताना ॲग्रिस्टॅक नोंदणी, आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमीन उतारा, जिओ टॅग फोटो, ई-पीक पाहणी असणे बंधनकारक आहे. ही सर्व कागदपत्रे ३१ तासांत जमवणे, या योजनेची माहिती घेणे आणि पैशांची तजवीज करून अर्ज करणे शक्य आहे का? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. शिवाय एकाच दिवशी एकाच वेबसाइटवर राज्यातील सर्व शेतकरी अर्ज करू लागले तर विमा पोर्टल सुरळीत चालणार का, असा प्रश्न निर्माण होतो. १४ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता विमा पोर्टल वेबसाइटला एरर येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे घाईत तयारी केलेल्या शेतकऱ्यांनाही या फळपिकांचा विमा काढता आला नाही.

अन्य कोणत्या पिकांना किती मुदत ?चिकू, मोसंबी पिकांसाठी ३० जून, डाळिंब पिकासाठी १४ जुलै, तर सीताफळ पिकाचा विमा काढण्यासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

विम्याची मुदत वाढेलफळबाग पीक विमा योजनेंतील लिंबू, पेरू, द्राक्ष आणि संत्रा या पिकांचा विमा काढण्यासाठी १३ जून रोजी संकेतस्थळ सुरू झाले आणि १४ जूनपर्यंत विमा काढण्यास मुदत होती. ही बाब कृषी आयुक्तालयांस कळविली आहे. या फळपिकांच्या विम्याची मुदत नक्की वाढेल.-प्रकाश देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी