शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

वर्षभरात अपघातात १९७ जणांचा मृत्यू; जीव घेणारे वाहनचालक किती दिवस अज्ञात राहणार?

By राम शिनगारे | Updated: January 31, 2024 11:30 IST

वाहनांची वर्दळ असल्यामुळे अपघातानंतर पळून जाणारे चालक सापडतच नाहीत.

छत्रपती संभाजीनगर : देशभरात अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे अपघात झाल्याची घटना उघडकीस येत असते. त्यात जीव गमावणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे वारंवार आवाहन केले जाते. शासन वेळोवेळी नियमांमध्ये बदल करीत असते. तरीही अपघातांची संख्या कमी होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने ‘हिट ॲण्ड रन’ कायदा आणला आहे. त्यानुसार अपघातानंतर चालक पळून गेल्यास त्यास दहा वर्षांपर्यंत कारावास आणि ७ लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे पोलिसांनाही पळून जाणारे वाहनचालक शोधून काढावे लागणार आहेत.

वर्षभरात १८७ प्राणांतिक अपघातछत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत २०२३ या वर्षात तब्बल १८७ प्राणांतिक अपघात घडले आहेत. हाच आकडा ग्रामीण भागात त्यापेक्षा अधिक आहे.

१९७ जणांचा मृत्यू, ४१९ गंभीरपोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मागील वर्षी झालेल्या ६०० अपघातांमध्ये १९७ जणांनी आपला जीव गमावला आहे. त्याच वेळी अपघातात जखमी झालेल्यांची संख्या ही ४१९ एवढी आहे. २०२२ मध्ये अपघातातील मृत्यू झालेल्यांची संख्या १९९ होती. तर जखमींची संख्या ३७० एवढी होती. मृतांची संख्या २०२३ या वर्षात २ ने घटली असली तरी जखमींची संख्या ४९ ने वाढली आहे.

अज्ञात चालक सापडतच नाहीतअनेक अपघात हे सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या ठिकाणी होतात. दुचाकीस्वरास उडवून मोठी वाहने निघून जातात. त्याच मार्गावरून वाहनांची वर्दळ असल्यामुळे अपघातानंतर पळून जाणारे चालक सापडतच नाहीत. घटनेला काही दिवस उलटून गेल्यानंतर तपास यंत्रणांचेही दुर्लक्ष होते.

हिट ॲण्ड रन कायदा काय आहे?सध्याचा कायदा : भारतीय दंड संहितेतील (आयपीसी) तरतुदीनुसार अपघाताच्या प्रकरणात चालकाची ओळख पटल्यानंतर निष्काळजीपणे वाहन चालवणे २७९, निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ३०४ ए आणि जीव धोक्यात घालणे ३३८ या कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात येत होता. या नोंदीनुसार २ वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. त्यात आरोपीला तत्काळ जामीन मिळत आहे.

केलेले बदल : आयपीसी कायदा बदलून भारतीय न्याय संहिता हा कायदा संसदेत मंजूर केला आहे. त्यातील तरतुदीनुसार अपघातानंतर चालकाने थांबून जखमींना मदत केल्यास त्यात कमी शिक्षेची तरतूद आहे; मात्र अपघातानंतर चालक पळून जातो. अशा प्रकरणात ‘हिट ॲण्ड रन’ कायद्यानुसार चालकाला दहा वर्षांच्या सक्तमजुरीची व ७ लाख रुपये आर्थिक दंडाच्या शिक्षेची तरतूद केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात