शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात अपघातात १९७ जणांचा मृत्यू; जीव घेणारे वाहनचालक किती दिवस अज्ञात राहणार?

By राम शिनगारे | Updated: January 31, 2024 11:30 IST

वाहनांची वर्दळ असल्यामुळे अपघातानंतर पळून जाणारे चालक सापडतच नाहीत.

छत्रपती संभाजीनगर : देशभरात अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे अपघात झाल्याची घटना उघडकीस येत असते. त्यात जीव गमावणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे वारंवार आवाहन केले जाते. शासन वेळोवेळी नियमांमध्ये बदल करीत असते. तरीही अपघातांची संख्या कमी होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने ‘हिट ॲण्ड रन’ कायदा आणला आहे. त्यानुसार अपघातानंतर चालक पळून गेल्यास त्यास दहा वर्षांपर्यंत कारावास आणि ७ लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे पोलिसांनाही पळून जाणारे वाहनचालक शोधून काढावे लागणार आहेत.

वर्षभरात १८७ प्राणांतिक अपघातछत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत २०२३ या वर्षात तब्बल १८७ प्राणांतिक अपघात घडले आहेत. हाच आकडा ग्रामीण भागात त्यापेक्षा अधिक आहे.

१९७ जणांचा मृत्यू, ४१९ गंभीरपोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मागील वर्षी झालेल्या ६०० अपघातांमध्ये १९७ जणांनी आपला जीव गमावला आहे. त्याच वेळी अपघातात जखमी झालेल्यांची संख्या ही ४१९ एवढी आहे. २०२२ मध्ये अपघातातील मृत्यू झालेल्यांची संख्या १९९ होती. तर जखमींची संख्या ३७० एवढी होती. मृतांची संख्या २०२३ या वर्षात २ ने घटली असली तरी जखमींची संख्या ४९ ने वाढली आहे.

अज्ञात चालक सापडतच नाहीतअनेक अपघात हे सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या ठिकाणी होतात. दुचाकीस्वरास उडवून मोठी वाहने निघून जातात. त्याच मार्गावरून वाहनांची वर्दळ असल्यामुळे अपघातानंतर पळून जाणारे चालक सापडतच नाहीत. घटनेला काही दिवस उलटून गेल्यानंतर तपास यंत्रणांचेही दुर्लक्ष होते.

हिट ॲण्ड रन कायदा काय आहे?सध्याचा कायदा : भारतीय दंड संहितेतील (आयपीसी) तरतुदीनुसार अपघाताच्या प्रकरणात चालकाची ओळख पटल्यानंतर निष्काळजीपणे वाहन चालवणे २७९, निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ३०४ ए आणि जीव धोक्यात घालणे ३३८ या कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात येत होता. या नोंदीनुसार २ वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. त्यात आरोपीला तत्काळ जामीन मिळत आहे.

केलेले बदल : आयपीसी कायदा बदलून भारतीय न्याय संहिता हा कायदा संसदेत मंजूर केला आहे. त्यातील तरतुदीनुसार अपघातानंतर चालकाने थांबून जखमींना मदत केल्यास त्यात कमी शिक्षेची तरतूद आहे; मात्र अपघातानंतर चालक पळून जातो. अशा प्रकरणात ‘हिट ॲण्ड रन’ कायद्यानुसार चालकाला दहा वर्षांच्या सक्तमजुरीची व ७ लाख रुपये आर्थिक दंडाच्या शिक्षेची तरतूद केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात