शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

वर्षभरात अपघातात १९७ जणांचा मृत्यू; जीव घेणारे वाहनचालक किती दिवस अज्ञात राहणार?

By राम शिनगारे | Updated: January 31, 2024 11:30 IST

वाहनांची वर्दळ असल्यामुळे अपघातानंतर पळून जाणारे चालक सापडतच नाहीत.

छत्रपती संभाजीनगर : देशभरात अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे अपघात झाल्याची घटना उघडकीस येत असते. त्यात जीव गमावणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे वारंवार आवाहन केले जाते. शासन वेळोवेळी नियमांमध्ये बदल करीत असते. तरीही अपघातांची संख्या कमी होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने ‘हिट ॲण्ड रन’ कायदा आणला आहे. त्यानुसार अपघातानंतर चालक पळून गेल्यास त्यास दहा वर्षांपर्यंत कारावास आणि ७ लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे पोलिसांनाही पळून जाणारे वाहनचालक शोधून काढावे लागणार आहेत.

वर्षभरात १८७ प्राणांतिक अपघातछत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत २०२३ या वर्षात तब्बल १८७ प्राणांतिक अपघात घडले आहेत. हाच आकडा ग्रामीण भागात त्यापेक्षा अधिक आहे.

१९७ जणांचा मृत्यू, ४१९ गंभीरपोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मागील वर्षी झालेल्या ६०० अपघातांमध्ये १९७ जणांनी आपला जीव गमावला आहे. त्याच वेळी अपघातात जखमी झालेल्यांची संख्या ही ४१९ एवढी आहे. २०२२ मध्ये अपघातातील मृत्यू झालेल्यांची संख्या १९९ होती. तर जखमींची संख्या ३७० एवढी होती. मृतांची संख्या २०२३ या वर्षात २ ने घटली असली तरी जखमींची संख्या ४९ ने वाढली आहे.

अज्ञात चालक सापडतच नाहीतअनेक अपघात हे सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या ठिकाणी होतात. दुचाकीस्वरास उडवून मोठी वाहने निघून जातात. त्याच मार्गावरून वाहनांची वर्दळ असल्यामुळे अपघातानंतर पळून जाणारे चालक सापडतच नाहीत. घटनेला काही दिवस उलटून गेल्यानंतर तपास यंत्रणांचेही दुर्लक्ष होते.

हिट ॲण्ड रन कायदा काय आहे?सध्याचा कायदा : भारतीय दंड संहितेतील (आयपीसी) तरतुदीनुसार अपघाताच्या प्रकरणात चालकाची ओळख पटल्यानंतर निष्काळजीपणे वाहन चालवणे २७९, निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ३०४ ए आणि जीव धोक्यात घालणे ३३८ या कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात येत होता. या नोंदीनुसार २ वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. त्यात आरोपीला तत्काळ जामीन मिळत आहे.

केलेले बदल : आयपीसी कायदा बदलून भारतीय न्याय संहिता हा कायदा संसदेत मंजूर केला आहे. त्यातील तरतुदीनुसार अपघातानंतर चालकाने थांबून जखमींना मदत केल्यास त्यात कमी शिक्षेची तरतूद आहे; मात्र अपघातानंतर चालक पळून जातो. अशा प्रकरणात ‘हिट ॲण्ड रन’ कायद्यानुसार चालकाला दहा वर्षांच्या सक्तमजुरीची व ७ लाख रुपये आर्थिक दंडाच्या शिक्षेची तरतूद केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात