शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

रक्ताचे नाते निष्ठूर कसे? छत्रपती संभाजीनगरात १०४, तर जिल्ह्यात आढळले ४१ बेवारस मृतदेह

By सुमित डोळे | Updated: January 19, 2024 11:16 IST

मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिस साधारण ६ ते ८ दिवस वाट पाहतात.

छत्रपती संभाजीनगर : माणूस प्रगत होत असतानाच दुसरीकडे कौटुंबिक वाद, जगण्याच्या बदललेल्या पद्धती, मतभेदांतून नात्यांमधला गोडवा हळूहळू कमी होत आहे. एकत्र कुटुंब पद्धती संपत असून, दूर गेलेल्या नात्यांमधला संपर्कदेखील कमी होत आहे. अनेकदा रक्ताच्या नात्यातील व्यक्ती बेपत्ता झाल्याची, मृत्युमुखी पडल्याची दखलदेखील घेतली जात नाही. गेल्या वर्षभरात शहर, जिल्ह्यात एकूण १४५ बेवारस मृतदेह आढळले. जिवंतपणीच कुटुंबाने दूर केलेल्या व्यक्तींची मृत्यूनंतरदेखील हेळसांड होते. त्यांच्या कुटुंबाचा शोध घेण्यापासून अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी मात्र पोलिस विभाग प्रामाणिकपणे पार पाडतो.

कोणत्या महिन्यात किती अनोळखी मृतदेह आढळले ?महिना             अनोळखी मृतदेह (शहर)जानेवारी             ५फेब्रुवारी             १३मार्च                        ६एप्रिल             ५मे                         ११जून             ७जुलै             १२ऑगस्ट             ८सप्टेंबर             ८ऑक्टोबर             १३नोव्हेंबर             ८डिसेंबर             ८एकूण             १०४

ग्रामीण भागात प्रमाण कमीशहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मात्र अनोळखी मृतदेह आढळण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षाही कमी आहे. २०२३ मध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकूण ४१ मृतदेह आढळले. यात सर्वाधिक मे महिन्यात ११, जूनमध्ये ७ व डिसेंबरमध्ये सहा मृतदेह आढळले.

७५ टक्के मृत्यू अनैसर्गिकचशहरात आढळलेल्या १०४ मृतदेहांपैकी ७९ मृत्यू हे अनैसर्गिक होते. ग्रामीण भागात ४१ पैकी ३३ अनोळखी व्यक्तींचे मृत्यू अनैसर्गिक निष्पन्न झाले.

काय केले जाते या अनोळखी मृतदेहांचे?अनोळखी मृतदेह आढळल्यानंतर मृत्यूच्या कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदन केले जाते. पोलिस शासकीय संकेतस्थळ, माध्यमांद्वारे ती माहिती प्रसिद्ध करतात.

किती दिवस पाहिली जाते वाट ?मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिस साधारण ६ ते ८ दिवस वाट पाहतात. सामान्यत: रेल्वे अपघातात ओळख पटविण्यात अडचणी येतात. अन्य घटनांमध्ये कुटुंबीय सापडतात. मृतदेह कुजण्याच्या अवस्थेत असल्यास तत्काळ अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यसंस्कारासाठी सामाजिक संस्थांना आवाहन केले जाते, तर काही प्रसंगांत पोलिस अनुदानातूनदेखील ते पार पाडले जाते, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले.

घाटी रुग्णालय परिसरात सर्वाधिक मृतदेहशहरात आढळलेल्या अनोळखी मृतदेहांपैकी ३८ पेक्षा अधिक मृतदेह एकट्या घाटी रुग्णालयाच्या परिसरात आढळले. उपचारांसाठी आणल्यानंतर कुटुंबीय रुग्णांना तसेच सोडून जातात. त्यामुळे येथेच सर्वाधिक मृतदेह आढळत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद