शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

मी लावलेला बोर्ड काढलाच कसा?; औरंगाबादमध्ये जलसंधारणमंत्र्यांकडून वाल्मीच्या अधिकार्‍यांची खरडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 13:50 IST

जल व भूमी व्यवस्थापन संस्थेमध्ये (वाल्मी) सुरू करण्यात आलेल्या मृद व जलसंधारण मुख्यालयाच्या उद्घाटनाचा फलक अधिकार्‍यांच्या अंतर्गत राजकारणामुळे काढून टाकण्यात आल्याने नाराज झालेल्या मृद व जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी बुधवारी कडक शब्दांत अधिकार्‍यांची खरडपट्टी केली.

औरंगाबाद : जल व भूमी व्यवस्थापन संस्थेमध्ये (वाल्मी) सुरू करण्यात आलेल्या मृद व जलसंधारण मुख्यालयाच्या उद्घाटनाचा फलक अधिकार्‍यांच्या अंतर्गत राजकारणामुळे काढून टाकण्यात आल्याने नाराज झालेल्या मृद व जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी बुधवारी कडक शब्दांत अधिकार्‍यांची खरडपट्टी केली. ‘वाल्मी’तर्फे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना प्रा. शिंदे यांनी भाषणातून याबाबत उघड नाराजी व्यक्त केली. 

‘मी या विभागाचा मंत्री आहे आणि कॅबिनेट मंत्र्याने उद्घाटन केलेल्या कार्यालयाचा फलक काढण्यात येतो म्हणजे काय? काढणार्‍यांना हा अधिकार कोणी दिला? हा राजशिष्टाचाराचा भंग आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना प्रा. शिंदे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. 

मृद व जलसंधारण आयुक्त दीपक सिंगला यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, गेल्या महिन्यात आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी येथे आल्यावर कार्यालयाचा फलकच येथे नव्हता. मला बसण्यासाठी कार्यालयदेखील नव्हते. याबाबत जल व सिंचन विभागातील मुख्य लेखा परीक्षक रा. द. मोहिते यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उलटसुलट उत्तरे दिली. यामुळे वाल्मीमध्ये अधिकार्‍यांमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत. आधीच मृद व जलसंधारण विभागात कृषी, जलसंधारण व जिल्हा परिषदेचे कर्मचारी येण्यास उत्सुक नसल्याने गेल्या सात महिन्यांपासून मंजूर पदे रिक्त आहेत. त्यामुळे या विभागाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

सिंगला यांच्याकडे केवळ एक कार्यकारी अभियंता आणि दोन अकाऊंट आॅफिसर असे तीन कर्मचारी काम करतात. पदभरती विषयी प्रा. शिंदे यांना विचारले असता त्यांनी कर्मचारी येण्यास विरोध करीत नसल्याचे सांगितले; मात्र शासनाने घेतलेल्या निर्णयावर कार्य होण्यास विलंब होत असल्याचे त्यांनी मान्य केले. जलसाक्षरतेचे मोठ-मोठे अभियान राबविणार्‍या शासनाला जलसंधारण विभागाला कार्यालय आणि कर्मचारी उपलब्ध करून देता येत नाहीत याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Ram Shindeराम शिंदेAurangabadऔरंगाबाद