शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

प्रात्यक्षिक कसे करणार ? विद्यार्थी, पालकांत संभ्रमावस्था; बोर्ड मात्र परीक्षेच्या तयारीत व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 14:10 IST

जिल्ह्यात ११५८ शाळांत दहावी आणि बारावीचे १ लाख २० हजार १८८ विद्यार्थी आहेत.

ठळक मुद्दे वर्ग सुरू झाल्यावर मोजक्याच चार विषयांना प्राधान्य दिले गेले. बहुतांश ठिकाणी प्रात्यक्षिकही झाले नाही.

- योगेश पायघन

औरंगाबाद : जेमतेम दोन महिने सुरू झालेले प्रत्यक्ष वर्ग बंद होऊन जिल्ह्यात अंशतः लाॅकडाऊन लागल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली. शाळा, महाविद्यालयांकडून अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना काही प्रमाणात सराव, प्रात्यक्षिकांकडे दुर्लक्ष झाले. मात्र, आता न झालेल्या प्रात्यक्षिकांवर परीक्षा कशी द्यायची, असा प्रश्न विद्यार्थ्यांना, तर न झालेल्या प्रात्यक्षिकांची परीक्षा कशी घ्यायची, असा प्रश्न शिक्षकांना सतावत आहे.

जिल्ह्यात ११५८ शाळांत दहावी आणि बारावीचे १ लाख २० हजार १८८ विद्यार्थी आहेत. कोविडमुळे नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद होत्या. ऑनलाईन शिक्षणावरच भर होता. त्यातही विद्यार्थी उपस्थिती ४० टक्केपेक्षा अधिक नव्हती. त्यामुळे ऑनलाईनमध्ये विद्यार्थ्यांना किती पाठ्यांशाचे आकलन झाले, हा प्रश्नच असताना, प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्यावर उपस्थिती ६० ते ७० टक्के झाली. वर्ग सुरू झाल्यावर मोजक्याच चार विषयांना प्राधान्य दिले गेले. त्यामुळे इतर विषयांचे काय, असा प्रश्न असताना, बहुतांश ठिकाणी प्रात्यक्षिकही झाले नाही. आता एकीकडे लेखी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षांचे टेन्शन असताना, पुन्हा ऑनलाईन वर्गातून एप्रिल महिन्यापूर्वी अभ्यासक्रम कसा पूर्ण होईल, याची शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये चिंता आहे.

शिकलोच नाही, तर प्रात्यक्षिक कसे करणार?गावात ऑनलाईन वर्ग कसेबसे झाले. शाळा सुरू झाल्यावर दोन तीन प्रात्यक्षिके झाली. परीक्षेत १० ते १२ प्रात्यक्षिके असतील तर ती कशी करावीत. शिकलोच नाही, तर प्रात्यक्षिक कसे करणार?- सुकन्या गायकवाड, दहावीची विद्यार्थिनी

परीक्षेपेक्षा अधिक टेन्शनपरीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या त्याचे टेन्शन आहेच. आता प्रात्यक्षिक परीक्षा. अनेक प्रात्यक्षिक अद्याप बाकी होत्या. वर्ग बंद झाल्याने ते प्रात्यक्षिक कसे शिकणार, त्याची परीक्षा द्यायची याचे परीक्षेपेक्षा अधिक टेन्शन आले आहे.- प्रथमेश सूर्यवंशी, बारावीचा विद्यार्थी

मुले अस्वस्थ आहेतअभूतपूर्व परिस्थिती आहे. बोर्ड परीक्षा घेण्यासाठी ठाम आहे. पुरेसे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्यावरही चार तास शिकवण्याच्या निकषांत घेता आले नाही. सराव परीक्षांची तयारी सुरू होती. त्यात वर्ग बंद झाले. प्राधान्यक्रमाचे विषय शिकविताना प्रात्यक्षिकाकडे दुर्लक्ष झाले. शिकवले नाही, त्यावर प्रात्यक्षिक घ्यावे लागणार आहे. आधीच तणावात असलेली मुले आता त्यामुळे अस्वस्थ आहेत.- अनिल देशमुख, मुख्याध्यापक, जि. प. प्रशाला, गणोरी

न कंटाळता अभ्यास करत राहावेदहावी, बारावीच्या मुलांनी न कंटाळता अभ्यास करत राहावे. दरवर्षीप्रमाणे केंद्राची निवड करून परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू आहे. परीक्षा घेण्याबाबत काहीच संभ्रम नाही. कोरोनासदृश परिस्थिती असली तरी प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक परीक्षा बॅचनुसार घ्यायला अडसर नाही, असे मानले जात आहे. काही अडचण असेल तर विद्यार्थी, पालकांनी अपील करायचे आहे. अद्याप बोर्डाकडे कोणी यासंदर्भात अपील केले नाही.

- सुगता पुन्ने, सचिव, विभागीय परीक्षा मंडळ, औरंगाबाद

बोर्ड परीक्षेस बसलेले विद्यार्थीजिल्हा - दहावीचे विद्यार्थी - बारावीचे विद्यार्थीऔरंगाबाद - ६५,०११ - ५५,१७७बीड - ४२,५८८-३६,२६७जालना - ३१,२९६-२८,२७७परभणी - २८,४४०-२०,५५२हिंगोली - १६२७६-११,५८०

टॅग्स :ssc examदहावीexamपरीक्षाAurangabadऔरंगाबाद