शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘टोकाई’ सुरू होण्याची आशा पल्लवीत

By admin | Updated: May 9, 2014 00:22 IST

इब्राहिम जहागीरदार, कुरूंदा अनेक वर्षापासून या ना त्या कारणाने रखडलेल्या कुरूंदा येथील नियोजीत टोकाई सहकारी साखर कारखान्याचे ९० टक्के काम मार्गी लागले.

इब्राहिम जहागीरदार, कुरूंदा अनेक वर्षापासून या ना त्या कारणाने रखडलेल्या कुरूंदा येथील नियोजीत टोकाई सहकारी साखर कारखान्याचे ९० टक्के काम मार्गी लागले. हत्ती निघाला पण शेपूट अडकल्याने गळीत हंगामावर प्रश्न चिन्ह लागलेले असताना आ. जयप्रकाश दांडेगावकर यांनी ‘टोकाई’चा गळीत हंगाम पुर्णा कारखान्याच्या सहकार्यातून करण्याचा विडा उचलला होता. गेल्या बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत कारखान्याला संजीवनी देण्यासाठी ‘टोकाई’साठी ५ कोटी ६६ लाख रुपये मंजूर झाल्याने हा कारखाना सुरू होण्याची आशा पल्लवीत झाली आहे. वसमत तालुक्यातील कुरूंदा येथील टोकाई साखर कारखाना या भागासाठी महत्वाचा मानला जातो. कारखान्याच्या सुरूवातीपासून तर पायाभरणीपर्यंत अनेक अडथळे आले होते. आतापर्यंत कारखान्याच्या उभारणीसाठी मोठेच राजकारण घडले. प्रत्येक निवडणुकीत कारखान्याचा मुद्दा उपस्थितीत केला जात होता. निधीअभावी कारखान्याचे काम नेहमी रखडत गेले. आजघडीलाही काम खोळंबलेले आहे. या कारखान्याच्या पायाभरणीपासून चिमणी उभारण्यापर्यंत तत्कालीन दोन मुख्यमंत्र्यांची उपस्थिती लाभलेली असताना कारखाना सुरू होण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत; परंतु कारखान्याच्या निवडणुकीनंतर दिग्गज नेत्यांची फळी संचालकपदावर आल्यानंतर खर्‍या अर्थाने कामाला गती मिळाली. त्यामुळेच कारखान्याचे ९० टक्के काम मार्गी लागले आहे. कारखान्याची मशिनरी, गाळ जमविण्याचे बांधकाम, चिमणी आदी महत्वाची कामे झाली आहेत. जवळपास १० टक्के काम रखडले आहे. या कारखान्यावर काँग्रेस व राष्टÑवादीच्या नेत्यांचे वर्चस्व आहे. अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद राकाँकडे ठेवण्यात आले आहे. कारखान्याच्या कामाला आतापर्यंत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आ. जयप्रकाश दांडेगावकर, आ. राजीव सातव, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सहकार्य लाभलेले आहे. वसमत व कळमनुरी तालुक्यातील गावे मोठ्या प्रमाणात ‘टोकाई’च्या कार्यक्षेत्रात येतात. त्यामुळे कुरूंदा, आंबा चौंढी, गिरगाव, कौठा व कळमनुरी तालुक्यासाठी हा कारखाना लाभदायक ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत आ. दांडेगावकर यांनी पुर्णा कारखान्याच्या माध्यमातून पुढील गळीत हंगाम करण्याचे ठोस आश्वासन दिले होते. त्यामुळे कारखाना ‘पुर्णा’च्या घशात जातो की काय? अशी चर्चाही दबक्या आवाजात होत होती. दांडेगावकर यांच्या ताब्यात कारखाना गेल्यास कारखान्याला संजीवनी मिळेल, असा कयास लावण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर वेगळ्या घडामोडी घडण्याअगोदर राज्य सरकारच्या वतीने बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत ‘टोकाई’ची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ५ कोटी ६६ लाख रुपयांचे भागभांडवल देण्याचा निर्णय घेण्यात आला. कारखान्याचे ९० टक्के काम पूर्ण वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे जवळपास दहा वर्षापूर्वी टोकाई कारखान्याच्या उभारणीला सुरूवात झाली कारखान्यातील विविध साहित्य लंपास झाले आहे. त्यानंतरही याठिकाणी सुरक्षा ठेवण्यात आलेली नाही कुरूंदा परिसरासाठी महत्वाचा असलेला टोकाई कारखाना सुरू होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकर्‍यांमध्ये उत्साह आहे वसमतचे आ.दांडेगावकर यांनी ‘पुर्णा’च्या माध्यमातून या कारखान्याचा गळीत हंगाम करण्याचे आश्वासन दिले आहे टोकाई कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आता राज्य सरकारकडून ५ कोटी ६६ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे