शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा; पीककर्ज भरण्यास अत्यल्प प्रतिसाद, बँकांमध्ये तुरळक गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 17:25 IST

एप्रिल महिन्यापासून मिळते नवीन कर्ज

- जयेश निरपळगंगापूर : मार्च महिना संपण्यास केवळ ६ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना देखील पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखांमध्ये कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची तुरळक गर्दी दिसत आहे.

शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमार्फत कर्ज वितरण केले जाते. यात सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा सहकारी बँकेमार्फत होते. फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी कर्ज भरत असतात. मात्र, सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी युती सरकारने दिले होते. त्यामुळे पुन्हा सत्तेत आलेले युती सरकार कर्जमाफी करेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास आखडता हात घेतल्याने २४ मार्चपर्यंत औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची केवळ ८.६४ टक्के कर्ज वसुली झाली आहे.

३१ मार्चपर्यंत भरले तरच होणार व्याज माफशासनाकडून शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज दिले जाते. मात्र त्यासाठी अट म्हणजे संबंधित शेतकऱ्याने कर्जाची परतफेड ३१ मार्चपूर्वी करणे आवश्यक आहे. जवळपास ९ महिने कर्ज वापरता येत असल्याने बहुतांश शेतकरी ३१ मार्चपूर्वी कर्जाची परतफेड करतात. शेवटच्या आठ दिवसांमध्ये सर्वाधिक कर्जाची परतफेड होते.

बचत गटाच्या तुलनेत फायदेशीरएप्रिलमध्ये उचललेले कर्ज थेट मार्च महिन्यात भरले जाते. जवळपास १० ते ११ महिने शेतकरी बिनव्याजी पैसे वापरू शकतात. त्यामुळे अनेक शेतकरी पीककर्जाची उचल करून नियमितपणे भरणा करतात. बचत गटाच्या तुलनेत पीककर्ज शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे.

सर्वाधिक कर्ज वितरण सहकारी बँकेमार्फतसेवा सहकारी संस्थांमार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांशी जोडली आहे. तसेच ग्रामीण भागातील बहुतांश ग्रामस्थांचे बँक खाते सहकारी बँकांच्या शाखेत आहे. त्यामुळे सर्वाधिक शेतकरी सहकारी बँकेतूनच कर्जाची उचल करतात. जिल्हा बँकेने खरिपात आपल्या ११९ शाखांमार्फत ८८ हजार २०६ शेतकऱ्यांना ४४४.२४ कोटीचे कर्ज वितरण केले आहे. ही टक्केवारी बँकांना दिलेल्या उद्दिष्टांपैकी सर्वाधिक ९७.६४ एवढी होती. तर रब्बीसाठी डिसेंबरअखेर १२१ शेतकऱ्यांना ६३ लाख रुपयांचे म्हणजे केवळ ०.२६ टक्के कर्ज वितरण केले होते.

कर्जमाफीच्या आशेने अत्यल्प प्रतिसादशून्य टक्के व्याज दराचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी पीक कर्जाचा भरणा करावा. एप्रिल महिन्यात पुन्हा नवीन खरीप हंगामाचे कर्ज वितरण केले जाते. कर्जमाफीच्या आशेने यंदा अत्यल्प प्रतिसाद मिळत असला तरी, जास्तीत जास्त कर्ज वसुली होईल, असा अंदाज आहे.-किरण पा. डोणगावकर, उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

जिल्हा बँकेची २४ मार्चअखेर कर्जवाटप व वसुली माहिती (रक्कम कोटीत)तालुका            कर्ज वाटप कर्ज वसुली वसुली टक्केवारीछ.संभाजीनगर १४.३० ९.६४             ७.७१सिल्लोड ३६.०६ ३५.९९             १८.१३सोयगाव ३.५७            ३.५७             ५.९७खुलताबाद ४.५३ ३.६१             ५.२९कन्नड २९.७७ ३०.५७             १३.८०पैठण             २७.६१ १६.१७             ७.३९गंगापूर १५.२८ ८.६९             ३.९३वैजापूर २९.२६ १५.३४             ४.५७फुलंब्री ७.५६ ९.२४             १०.५२एकूण १६७.९४ १३२.८२            ८.६४.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र