शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

होम आयसोलेशनची सेवा ५ हजारांत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:04 IST

औरंगाबाद : होम आयसोलेशनची (गृहअलगीकरण) सेवा ५ हजार रुपयांत मिळणार आहे. रुग्णासाठी कराव्या लागणाऱ्या विविध टेस्टचा खर्च वेगळा असणार ...

औरंगाबाद : होम आयसोलेशनची (गृहअलगीकरण) सेवा ५ हजार रुपयांत मिळणार आहे. रुग्णासाठी कराव्या लागणाऱ्या विविध टेस्टचा खर्च वेगळा असणार आहे. रुग्णाची ऑक्सिजन पातळी व इतर लक्षणांचे विश्लेषण डॉक्टरांनी केल्यानंतर होम आयसोलेशन करायचे की, हॉस्पिटलमध्ये ठेवायचे याचा निर्णय डॉक्टर घेतील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत कोरोनाचे वाढते रुग्ण, खाटांचे आरक्षण आणि उपचारपध्दती याबाबत खासगी डॉक्टर्सची बैठक झाली. होम आयसोलेशनची सेवा यापूर्वी ११ हजार रुपयांत काही खासगी हॉस्पिटलमध्ये मिळत होती. ५ हजारांत ही सेवा १० दिवसांसाठी देण्याबाबत रविवारच्या बैठकीत एकमत झाले. गृहअलगीकरण करताना अधिकचे शुल्क घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांच्या बैठकीत देण्यात आला. सध्या शहरात १२ हजारांपेक्षा जास्त रुग्ण होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत.

ज्यांना कमी लक्षणे आहेत, ६० वर्षांतील वय असावे. घरात प्रसाधनगृह स्वतंत्र असावे. ५०० रुपयांत एकदा वैद्यकीय सल्ला व्हिडिओ कॉलमार्फत दिला जाईल. १० वेळा तपासणी केली जाईल. त्यासाठी खासगी रुग्णालयांवर जबाबदारी देण्यात आली आहे. ज्या टेस्ट करण्याची गरज असेल, त्याचे वेगळे शुल्क रुग्णाला द्यावे लागतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरात मनपा ३६१० बेड करणार आहे. १८१४ बेड कार्यरत आहेत. १७९६ बेड तयार होतील. ३०० बेड मनपाकडे रिकामे आहेत. मनपाकडे सध्या २१ कोरोना सेंटर आहेत. त्यातील १२ सुरू आहेत. जिल्ह्यात ३०० व्हेंटीलेटर असून १०० वाढविण्याचा प्रयत्न आहे. घाटीला व्हेंटीलेटर देण्याचे नियोजन आहे.

खासगी हॉस्पिटलबाहेर बोर्ड लावणार

लसीकरण न करणाऱ्या डॉक्टर्सच्या हॉस्पिटलबाहेर फ्लेक्स लावून आवाहन करण्यात येईल. या रुग्णालयातील डॉक्टर्सनी कोरोना लसीकरण केलेले नाही. येथे उपचार घ्यायचे की नाही, तुम्ही ठरवा. असे आवाहन करणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. टेस्ट वाढल्यामुळे रुग्ण वाढले आहेत. ग्रामीण भागात क्वारंटाईन सेंटर उभारण्याचा निर्णय झाला आहे.

कन्टेंनमेंट झोन वाढवावेत

संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कन्टेंनमेंट झोन वाढविण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. खासगी दवाखान्यांनी लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवावी. उपचारासाठी आवश्यक औषधींचा साठा पुरेशा प्रमाणात असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.