शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कृषी कायद्यास स्थगिती देणाऱ्या अध्यादेशाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 13:10 IST

केंद्र शासनाने संसदेत पारित केलेल्या कृषी विधेयकाला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याच्या  विरोधात  भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत  शासनाने कृषी  विधेयकाच्या स्थगितीसाठी  काढलेल्या  अध्यादेशाची होळी केली. 

औरंगाबाद : केंद्र शासनाने संसदेत पारित केलेल्या कृषी विधेयकाला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याच्या  विरोधात  भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत  शासनाने कृषी  विधेयकाच्या स्थगितीसाठी काढलेल्या अध्यादेशाची होळी केली. 

कृषी विधेयक हे शेतकऱ्यांच्या हिताचे असून ते राज्यात लागू करण्याची मागणी करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.  यावेळी बोलताना  आ. हरिभाऊ बागडे म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या ६ वर्षांत अनेक निर्णय घेतले आहेत. डॉ. स्वामीनाथन  आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.  युपीए सरकारने  स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आमलात आणण्याची इच्छाशक्ती कधीच दाखविली नाही. कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचे  जीवनमान उंचावणार  आहे. मात्र राजकीय हेतूने त्यास राज्य शासनाने विरोध केला आहे, असा आरोप बागडे यांनी केला. 

यावेळी जिल्हाध्यक्ष विजय औताडे, सरचिटणीस लक्ष्मण औटे, अशोक पवार, सूरज लोळगे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची  मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :agricultureशेतीbillबिलBJPभाजपा