शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
6
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
7
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
8
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
9
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
10
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
11
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
12
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
13
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
14
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
15
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
16
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
17
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
18
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
19
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
20
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  

एचआयव्हीबाधित बालक वसतिगृहाविना

By admin | Updated: January 13, 2016 23:58 IST

हिंगोली : एचआयव्ही संसर्गित जिल्ह्यामध्ये ० ते १४ वयोगटातील जवळपास १३२ बालके आहेत. त्यापैकी अनेकांना आईवडील नसल्याने त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हिंगोली : एचआयव्ही संसर्गित जिल्ह्यामध्ये ० ते १४ वयोगटातील जवळपास १३२ बालके आहेत. त्यापैकी अनेकांना आईवडील नसल्याने त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर काही बालके नातेवाईकांकडे राहतात. त्यांची हेळसांड होणार नाही, याची काळजी घेत शासनाकडून त्यांना हक्काचे वसतिगृह असणे आवश्यक आहे.जिल्हा आरोग्य विभागामार्फत एचआयव्हीचे प्रमाण कमी करण्यासाठी शहरी व ग्राम स्तरावर विविध कार्यक्रम, उपक्रम राबविले जात आहेत. बाधितांना आवश्यक उपचार पद्धती दिली जात आहे. गतवर्षी जिल्ह्याचे बाधितांचे प्रमाण १.८ टक्के एवढे होते. जनजागृतीनंतर यावर्षी ते ०.७१ टक्के झाले आहे. असे असले तरी एचआयव्ही संसर्गित अनाथ बालकांसाठी वसतिगृह आवश्यक आहे. जेणेकरून त्यांची हेळसांड होणार नाही, परंतु याबाबत शासनाकडून काही हालचाली होताना दिसून येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या राहण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यांना हक्काचे वसतिगृह नसल्याने ते इतर नातेवाईकांकडे राहतात. आजही समाजामध्ये काही ठिकाणी संसर्गित बालके आणि सामान्य बालकांत भेदभाव केला जातो. तो करू नये, यासाठी होणारी जागृती मानसिक कसोटीवर टिकत नाही. त्यामुळे त्यांना पर्यायी व्यवस्था असल्यास ते फायद्याचे ठरू शकते. जिल्ह्यात एकूण ७१ अनाथ संसर्गित मुले आहेत. त्यापैकी अनेक पूर्णत: अनाथ आहेत. त्यामुळे त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एचआयव्हीबाबत तसेच बाधित व्यक्तींना माहिती व समुपदेशन करण्यासाठी जिल्ह्यामध्ये एकूण ७ आयसीटीसी केंद्र आहेत. तसेच उपजिल्हा रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातून मोफत उपचार व मार्गदर्शन केले जाते. (प्रतिनिधी)