शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

HHC Exam: गणिताचा पेपर अवघड गेला ‘तो’ उत्तरपत्रिका घेऊनच पळाला; परीक्षा केंद्रावर गोंधळ

By विजय सरवदे | Updated: March 3, 2023 19:01 IST

बारावी गणित पेपरच्यावेळी परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ

छत्रपती संभाजीनगर : यंदा बारावीच्या परीक्षेत काॅपीमुक्त अभियानाचा पुरता फज्जा उडाला. उस्मानपुरा भागात नागसेन उच्च माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी एका परीक्षार्थी विद्यार्थ्याने गणिताचा पेपर अवघड चालल्यामुळे त्याने चक्क उत्तपत्रिका घेऊनच परीक्षा कक्षातून धूम ठोकली. या घटनेमुळे हवालदिल झालेल्या पर्यवेक्षकाने केंद्रसंचालकांमार्फत पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर त्याचा शोध घेऊन त्या विद्यार्थ्याला एका खाजगी अभ्यासिकेतून पकडून आणले.

झाले असे की, शुक्रवारी बारावीचा गणिताचा पेपर होता. देवगिरी महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा पेपर उस्मानपुरा परिसरातील नागसेन उच्च माध्यमिक विद्यालयात १७ क्रमांच्या कक्षात होता. पर्यवेक्षकांनी २८ पानांची शिवलेली उत्तरपत्रिका कक्षातील सर्व विद्यार्थ्यांना वाटप केल्या. त्यानंतर या विद्याथ्याने उत्तरपत्रिकेची शिलाई उसवली व त्यातील १३, १४, १५ आणि १६ या क्रमांकाची पाने व प्रश्नपत्रिका बेंचवर ठेवून तो लघुशंकेसाठी म्हणून बाहेर गेला. त्याने शाळेच्या संरक्षक भिंतीवरुन उडी मारून परीक्षा केंद्रातूनच बाहेर पळ काढला.

बराचवेळ झाला तरी तो परत आला नाही म्हणून सहज पर्यवेक्षकाने त्याच्या बेंचवर जाऊन पाहिले तेव्हा हा प्रकार समोर आला. ही बाब त्यांनी तात्काळ केंद्र संचालकांना कळविली. केंद्र संचालकांनी वेदांतनगर पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी केंद्र व परिसरात त्याचा बराच शोध घेतला. पण, तो सापडला नाही. अखेर त्याच कक्षात परीक्षा देत असलेल्या त्याच्या मित्राकडे चौकशी केली. तेव्हा तो देवगिरी कॉलेज जवळ खाजगी अभ्यासिकेत गेलेला असावा, असा अंदाज त्याने वर्तवला. पोलिस तेथे गेले व त्याला पकडून आणले. मात्र, आपण उतरपत्रिका नेलेलीच नाही, यावर तो ठाम राहिला. शेवटी त्याचे वडिल केंद्रात आले. तेव्हा मात्र, त्याने वडिलांना सोबत नेलेली उत्तरपत्रिका कोठे ठेवली ते सांगितले.

टॅग्स :examपरीक्षाAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण