शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अहो खासदार, आधी आमचे स्वागत घ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:03 IST

औरंगाबाद : जिल्ह्याचे खा. इम्तियाज जलील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे १७ सप्टेंबर रोजी उपहासात्मक पुष्पवृष्टी करून स्वागत करणार आहेत. ...

औरंगाबाद : जिल्ह्याचे खा. इम्तियाज जलील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे १७ सप्टेंबर रोजी उपहासात्मक पुष्पवृष्टी करून स्वागत करणार आहेत. त्यांच्या या उपहासाचा शिवसेनेने समाचार घेतला असून त्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. खा. जलील आपण २०१५ पासून सलगपणे हैदराबाद मुक्तिसंग्राम सोहळ्याला उपस्थित राहात आलात. या भूमीप्रति ज्या निष्ठेने आपण उपस्थित राहून स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करता, हे अभिनंदनीयच नव्हे तर गौरवपूर्ण आहे. यासाठी आधी त्यांचे स्वागत करण्याची इच्छा व्यक्त करीत शिवसेनेने त्यांना शालजोडे लगावले आहेत. तुमचे स्वागत करणे कुणाला आवडणार नाही? त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्याची घाई न करता अगोदर आमच्या स्वागताचा स्वीकार करावा, असे शिवसेनेने पत्रात म्हटले आहे.

शिवसेनेचे विधानसभा संघटक राजू वैद्य यांनी साेशल मीडियातून व्हायरल केलेल्या एका पत्रात म्हटले आहे, खा. जलील आपल्याला एक पद्म पुरस्कार द्यावा, अशी शिफारस आम्ही करणार आहोत. आपल्या धडाडीच्या कामाने अवघा मुलूख स्तंभित झाला आहे, औकाफ (वक्फ) बोर्डाच्या जमिनींमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या भू-माफियांना आपण ज्या पद्धतीने जेरबंद केले त्यातूनच तुमचा जो करिष्मा दिसतो तो दखलणीय. तसेच गेल्या काही दिवसांपासून आपण गुटख्याविरोधात मोहीम उघडली. त्यामुळे शहरातून गुटखा हद्दपार झालाय. इतकेच नाही तर मध्यंतरीच्या काळात अवैध दारूचे सगळे अड्डे आपण बंद करून मोठे समाजकार्य केले. तमाम युवापिढीचे आपण हिरो झालात. विधानसभा सदस्य या नात्याने आपण केलेल्या कामाची दखल घ्यावी तेवढी कमीच आहे. आपल्या नियोजनपूर्वक विकासकामांमुळे आपले कार्यक्षेत्र आदर्श मतदारसंघ म्हणून नावारूपाला आले आहे.

आता खासदार म्हणून आपला ठसा उमटलाय. अल्पावधीत आपण संपूर्ण मतदारसंघ विकास कामांनी आणि विकास योजनांनी गजबजून टाकलाय. मतदारसंघातील १३०० हून अधिक गावांची भूमी आपल्या स्पर्शाने पावन झाली. आपल्या पदस्पर्शाने विकासगंगा अवतरल्याचे वृत्त नुकतेच आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकत आहे. आपण आमदार आणि खासदार म्हणून केलेल्या अनेक मूलभूत कामांकडे बघून कुणीही थक्क होईल.

आपल्या २५ नगरसेवकांनी तर सगळे वॉर्ड समस्यामुक्त केलेत

महापालिकेच्या माध्यमातून आपल्या २५ नगरसेवकांनी त्यांचे वॉर्ड समस्यामुक्त केले असून त्याची प्रचिती या भागातून जाता-येता येते. आपल्या पक्षाच्या सदस्यांनी मनपा सभागृहात शालीनता-अदब आणि संस्कारांचे प्रदर्शन घडवीत एक इतिहास घडविला. हे संपूर्ण औरंगाबादकरांनी पाहिले आहे. मुक्तिसंग्रामदिनी आपण येऊन ध्वजवंदन करून हैदराबाद मुक्तीच्या लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्म्यांना दरवर्षीच्या रीतीनुसार अभिवादन करावे.