शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

अहो, ऐका! हेडफोन वापरणाऱ्या १० पैकी २ तरुणांना बहिरेपणा

By संतोष हिरेमठ | Updated: March 3, 2023 19:36 IST

शासकीय रुग्णालयात घाटीतील डाॅक्टरांचे निरीक्षण

- संतोष हिरेमठछत्रपती संभाजीनगर : दिवसेंदिवस अनेक कारणांनी श्रवणदोषांना सामोरे जावे लागत आहे. विशेषत: सतत हेडफोन, इयरफोनने तरुणांना बहिरेपणाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. नियमित हेडफोन, इयरफोन वापरणाऱ्या १० पैकी २ तरुणांना श्रवणदोष येत असल्याचे निरीक्षण घाटीतील डाॅक्टरांनी नोंदविले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आठवड्यातून ४ दिवस होणारी कान-नाक-घसा विभागाची ओपीडी आता दररोज होत आहे. इतकेच काय आठवड्यातून तीनच दिवस होणाऱ्या शस्त्रक्रियाही आता दररोज होऊ लागल्या आहेत.

बहिरेपणा आणि श्रवण दोष कमी करण्यासाठी घ्यायची दक्षता, तसेच कानाचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजनांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी ३ मार्चला 'जागतिक श्रवण दिन' साजरा केला जातो. घाटीतील कान-नाक-घसा विभागातील सहयोगी प्राध्यापक डाॅ. प्रशांत केचे म्हणाले, दररोज ओपीडीत येणाऱ्या रुग्णांमध्ये ५० टक्के रुग्ण कानाशी संबंधीत आजारांचे असतात. एक दिवसाच्या शिशूंपासून ज्येष्ठांपर्यंत श्रवणदोष आढळतो. सहायक प्राध्यापक डाॅ. शैलेश निकम म्हणाले, कानाची नस कमजोर झाल्याने, कान फुटणे, वाहणे, जन्मत: बहिरेपणा, हेडफोन वापरामुळे श्रवणदोष निर्माण झालेले रुग्ण उपचारासाठी येतात.

ऑडिओलाॅजिस्ट डाॅ. प्रिया गुप्ता म्हणाल्या, विभागातील ऑडिओलाॅजी क्लिनिकच्या माध्यमातून अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने कर्णदोषाचे निदान करून उपचाराची पुढील दिशा ठरवली जाते. खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी अधिक पैसे मोजावे लागतात, परंतु घाटीत अगदी स्वस्तात, शासकीय शुल्कात विविध तपासण्या होतात. विभागप्रमुख डाॅ. सुनील देशमुख म्हणाले, अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली १ जानेवारीपासून ओपीडीत दररोज रुग्णसेवा दिली जात आहे. शस्त्रक्रियादेखील आता दररोज होत आहे.

अशी आहे परिस्थितीकान-नाक-घसा विभागाची रोजची ओपीडी- १०० ते १२५ओपीडीत कानाशी संबंधीत येणारे रुग्ण- ५० टक्केरोज होणाऱ्या मोठ्या शस्त्रक्रिया- ५ ते ६रोज होणाऱ्या छोट्या शस्त्रक्रिया- ७ ते ८

असे जपा कानाचे आरोग्य..सतत हेडफोन, इयरफोन वापरू नये. कानांना पुरेशी विश्रांती द्यावी. मोठ्या आवाजाच्या ठिकाणी काम करताना बहिरेपणा आल्याची समस्या घेऊन महिन्याला किमान २ ते ३ कामगार घाटीत येतात. अशा ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांनी श्रवण संरक्षण उपकरण वापरले पाहिजे. सतत सर्दी, खोकला होत असेल तर वेळीच उपचार घ्यावा. जन्मत: बहिरेपणावर वेळीच उपचार घेतल्यास मुले ऐकू शकतात, त्यातून ते बोलू शकतात. कानात काडी, टोकदार वस्तू टाकता कामा नये.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य