शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

हॅलो, हॅलो...माझे नाव मतदार यादीत आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 20:26 IST

तक्रार नोंदविण्यासाठी आयोगाने उपलब्ध केला ‘टोल फ्री क्रमांक १९५०’ 

औरंगाबाद : निवडणूक आयोगाने तक्रारी नोंदविता याव्यात, यासाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावरून सध्या एकच प्रश्न विचारला जातो आहे, तो म्हणजे हॅलो...सर माझे नाव मतदार यादीमध्ये आहे ना. नाव असल्याचे समजल्यानंतरच समोरील व्यक्ती फोनवरील संभाषण बंद करीत असल्याचा अनुभव निवडणूक विभागाला येत आहे. 

अजून आचारसंहितेचा पारा चढला नसल्यामुळे मागील दीड महिन्यात निवडणूक आणि मतदानासंबंधी एकही तक्रार आली नसून  वैयक्तिक माहिती विचारण्यासाठी या टोल फ्री क्रमांकाचा वापर होत आहे. मतदार यादीत नाव असण्याबाबतचा प्रश्न सर्वाधिक वेळा विचारला गेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांच्या तक्रारींसाठी २५ जानेवारीपासून १९५० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यासाठी एक पथक गठीत करण्यात आले आहे. कोणाचे नाव यादीत आले आहे की नाही, अर्जात काय उणिवा राहिल्या आहेत, मतदार यादीत नाव नोंदणीसाठी काय करावे लागेल, कोठे अर्ज भरावा लागेल, अर्जासोबत काय कागदपत्रे जोडावी लागतील. हे आयोगाने वेळोवेळी जाहीर केले असले तरी टोल फ्री क्रमांक दिला. आजवर त्या क्रमांकावर १२४८ कॉल्स आल्याची नोंद झाली आहे.

रोज ४० ते ४५ कॉल्स फोन करणारे स्वत:चे नाव मतदार यादीमध्ये आहे का, कोणत्या मतदारसंघातील यादीमध्ये आहे. नावात बदल करायचा असल्यास काय करावे लागेल, आता नाव नोंदले तर यावेळी मला मतदान करता येईल का, अशाच प्रकारच्या प्रश्नांचा भडिमार मतदारांकडून केला जात आहे. रोज ४० ते ४५ कॉल्स प्राप्त होत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. 

व्हीव्हीपॅटचा डेमो २१ कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनाजिल्ह्यातील एक हजारांवर अधिकारी, कर्मचारी आणि कामगार असलेल्या २१ कंपन्यांमध्ये निवडणूक विभाग व्होटर व्हेरिफीयेबल पेपर आॅडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) या मशीनचा डेमो देणार आहे. गुरुवारपासून या तीनदिवसीय मोहिमेस सुरुवात झाली. ४जिल्ह्यात २ लाख ५० हजारांवर नागरिकांनी व्हीव्हीपॅटच्या डेमोमध्ये सहभाग घेतला. यापैकी १ लाख ८० हजार जणांनी प्रत्यक्ष मतदानाचा डेमो करून बघितला. जिल्ह्यातील एक हजारांवर कर्मचारी असलेल्या २१ कंपन्यांतून अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना व्हीव्हीपॅट मशीनचा डेमो दिला जाणार आहे. यासाठी विशेष पथकांचीही नेमणूक केली आहे. ४शनिवारी या तीनदिवसीय मोहिमेचा समारोप केला जाईल. कंपन्यांतून कामगारांपर्यंत पोहोचणे आणि मतदानाबद्दल जागृती करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. २१ कंपन्यांतील कर्मचारी, कामगारांना प्रशिक्षण, डेमो देण्याबरोबरच मतदानाची शपथही दिली जाणार आहे. मतदान करण्यासंंबंधीचे संकल्प पत्रही भरवून घेतले जाणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगAurangabadऔरंगाबाद