शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो, हॅलो...माझे नाव मतदार यादीत आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 20:26 IST

तक्रार नोंदविण्यासाठी आयोगाने उपलब्ध केला ‘टोल फ्री क्रमांक १९५०’ 

औरंगाबाद : निवडणूक आयोगाने तक्रारी नोंदविता याव्यात, यासाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावरून सध्या एकच प्रश्न विचारला जातो आहे, तो म्हणजे हॅलो...सर माझे नाव मतदार यादीमध्ये आहे ना. नाव असल्याचे समजल्यानंतरच समोरील व्यक्ती फोनवरील संभाषण बंद करीत असल्याचा अनुभव निवडणूक विभागाला येत आहे. 

अजून आचारसंहितेचा पारा चढला नसल्यामुळे मागील दीड महिन्यात निवडणूक आणि मतदानासंबंधी एकही तक्रार आली नसून  वैयक्तिक माहिती विचारण्यासाठी या टोल फ्री क्रमांकाचा वापर होत आहे. मतदार यादीत नाव असण्याबाबतचा प्रश्न सर्वाधिक वेळा विचारला गेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांच्या तक्रारींसाठी २५ जानेवारीपासून १९५० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यासाठी एक पथक गठीत करण्यात आले आहे. कोणाचे नाव यादीत आले आहे की नाही, अर्जात काय उणिवा राहिल्या आहेत, मतदार यादीत नाव नोंदणीसाठी काय करावे लागेल, कोठे अर्ज भरावा लागेल, अर्जासोबत काय कागदपत्रे जोडावी लागतील. हे आयोगाने वेळोवेळी जाहीर केले असले तरी टोल फ्री क्रमांक दिला. आजवर त्या क्रमांकावर १२४८ कॉल्स आल्याची नोंद झाली आहे.

रोज ४० ते ४५ कॉल्स फोन करणारे स्वत:चे नाव मतदार यादीमध्ये आहे का, कोणत्या मतदारसंघातील यादीमध्ये आहे. नावात बदल करायचा असल्यास काय करावे लागेल, आता नाव नोंदले तर यावेळी मला मतदान करता येईल का, अशाच प्रकारच्या प्रश्नांचा भडिमार मतदारांकडून केला जात आहे. रोज ४० ते ४५ कॉल्स प्राप्त होत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. 

व्हीव्हीपॅटचा डेमो २१ कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनाजिल्ह्यातील एक हजारांवर अधिकारी, कर्मचारी आणि कामगार असलेल्या २१ कंपन्यांमध्ये निवडणूक विभाग व्होटर व्हेरिफीयेबल पेपर आॅडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) या मशीनचा डेमो देणार आहे. गुरुवारपासून या तीनदिवसीय मोहिमेस सुरुवात झाली. ४जिल्ह्यात २ लाख ५० हजारांवर नागरिकांनी व्हीव्हीपॅटच्या डेमोमध्ये सहभाग घेतला. यापैकी १ लाख ८० हजार जणांनी प्रत्यक्ष मतदानाचा डेमो करून बघितला. जिल्ह्यातील एक हजारांवर कर्मचारी असलेल्या २१ कंपन्यांतून अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना व्हीव्हीपॅट मशीनचा डेमो दिला जाणार आहे. यासाठी विशेष पथकांचीही नेमणूक केली आहे. ४शनिवारी या तीनदिवसीय मोहिमेचा समारोप केला जाईल. कंपन्यांतून कामगारांपर्यंत पोहोचणे आणि मतदानाबद्दल जागृती करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. २१ कंपन्यांतील कर्मचारी, कामगारांना प्रशिक्षण, डेमो देण्याबरोबरच मतदानाची शपथही दिली जाणार आहे. मतदान करण्यासंंबंधीचे संकल्प पत्रही भरवून घेतले जाणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगAurangabadऔरंगाबाद