शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

हॅलो, हॅलो...माझे नाव मतदार यादीत आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 20:26 IST

तक्रार नोंदविण्यासाठी आयोगाने उपलब्ध केला ‘टोल फ्री क्रमांक १९५०’ 

औरंगाबाद : निवडणूक आयोगाने तक्रारी नोंदविता याव्यात, यासाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावरून सध्या एकच प्रश्न विचारला जातो आहे, तो म्हणजे हॅलो...सर माझे नाव मतदार यादीमध्ये आहे ना. नाव असल्याचे समजल्यानंतरच समोरील व्यक्ती फोनवरील संभाषण बंद करीत असल्याचा अनुभव निवडणूक विभागाला येत आहे. 

अजून आचारसंहितेचा पारा चढला नसल्यामुळे मागील दीड महिन्यात निवडणूक आणि मतदानासंबंधी एकही तक्रार आली नसून  वैयक्तिक माहिती विचारण्यासाठी या टोल फ्री क्रमांकाचा वापर होत आहे. मतदार यादीत नाव असण्याबाबतचा प्रश्न सर्वाधिक वेळा विचारला गेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांच्या तक्रारींसाठी २५ जानेवारीपासून १९५० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यासाठी एक पथक गठीत करण्यात आले आहे. कोणाचे नाव यादीत आले आहे की नाही, अर्जात काय उणिवा राहिल्या आहेत, मतदार यादीत नाव नोंदणीसाठी काय करावे लागेल, कोठे अर्ज भरावा लागेल, अर्जासोबत काय कागदपत्रे जोडावी लागतील. हे आयोगाने वेळोवेळी जाहीर केले असले तरी टोल फ्री क्रमांक दिला. आजवर त्या क्रमांकावर १२४८ कॉल्स आल्याची नोंद झाली आहे.

रोज ४० ते ४५ कॉल्स फोन करणारे स्वत:चे नाव मतदार यादीमध्ये आहे का, कोणत्या मतदारसंघातील यादीमध्ये आहे. नावात बदल करायचा असल्यास काय करावे लागेल, आता नाव नोंदले तर यावेळी मला मतदान करता येईल का, अशाच प्रकारच्या प्रश्नांचा भडिमार मतदारांकडून केला जात आहे. रोज ४० ते ४५ कॉल्स प्राप्त होत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. 

व्हीव्हीपॅटचा डेमो २१ कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनाजिल्ह्यातील एक हजारांवर अधिकारी, कर्मचारी आणि कामगार असलेल्या २१ कंपन्यांमध्ये निवडणूक विभाग व्होटर व्हेरिफीयेबल पेपर आॅडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) या मशीनचा डेमो देणार आहे. गुरुवारपासून या तीनदिवसीय मोहिमेस सुरुवात झाली. ४जिल्ह्यात २ लाख ५० हजारांवर नागरिकांनी व्हीव्हीपॅटच्या डेमोमध्ये सहभाग घेतला. यापैकी १ लाख ८० हजार जणांनी प्रत्यक्ष मतदानाचा डेमो करून बघितला. जिल्ह्यातील एक हजारांवर कर्मचारी असलेल्या २१ कंपन्यांतून अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना व्हीव्हीपॅट मशीनचा डेमो दिला जाणार आहे. यासाठी विशेष पथकांचीही नेमणूक केली आहे. ४शनिवारी या तीनदिवसीय मोहिमेचा समारोप केला जाईल. कंपन्यांतून कामगारांपर्यंत पोहोचणे आणि मतदानाबद्दल जागृती करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. २१ कंपन्यांतील कर्मचारी, कामगारांना प्रशिक्षण, डेमो देण्याबरोबरच मतदानाची शपथही दिली जाणार आहे. मतदान करण्यासंंबंधीचे संकल्प पत्रही भरवून घेतले जाणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगAurangabadऔरंगाबाद