शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

औरंगाबाद जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई; १ हजार टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 19:21 IST

अप्पर मुख्य सचिवांकडून टँकरची पाहणी पाणीटंचाईसंबंधी उपाययोजनांबद्दल बैठक

औरंगाबाद : जिल्ह्यात वाढत्या तापमानाबरोबर दिवसेंदिवस पाणीटंचाई देखील भीषण होत आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पाणीपुरवठ्यासाठी ९३४ टँकर सुरू होते. आज एक हजारापर्यंत टँकरचा आकडा पोहोचला आहे. दुसरीकडे, जलस्रोत झपाट्याने आटत चालले आहेत. त्यामुळे मे आणि जून महिन्यातील काही दिवस टँकरची मदार ‘एमआयडीसी’च्या जलशुद्धीकरण केंद्रावरच अवलंबून आहे. 

दरम्यान, बुधवार आणि गुरुवारी पाणीपुरवठा विभागाचे अप्पर मुख्य सचिव शामलाल गोयल यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अशोक घुगे, महापालिकेचे अधिकारी आणि ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. टंचाईच्या काळात मे आणि जून महिन्यातील काही दिवसांमध्ये ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याबद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी सध्या ग्रामीण भागात सुमारे एक हजार टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असून, १ मेपर्यंत महापालिकेच्या फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून टँकर भरले जातील. शहरातील नागरिकांही पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे १ मेनंतर त्या जलशुद्धीकरण केंद्रावरून टँकर भरले जाणार नाहीत. त्यामुळे १ मेपासून ‘डीएमआयसी’अंतर्गत खोडेगाव जलशुद्धीकरण केंद्रावर टँकर भरले जातील, अशी माहिती दिली. 

त्यानंतर अप्पर मुख्य सचिव गोयल व अधिकाऱ्यांचा ताफा शेंद्रा ‘एमआयडीसी’ जलशुद्धीकरण केंद्रावर गेला. सध्या शेंद्रा जलशुद्धीकरण केंद्र येथे टँकरसाठी ६ पॉइंट कार्यान्वित करण्यात आले आहेत. आणखी तेथे टँकर भरण्यासाठी पॉइंट वाढविले जाऊ शकतात का, याची माहिती जाणून घेतली. साजापूर ‘एमआयडीसी’ जलशुद्धीकरण केंद्र येथे पहिले दोन पॉइंट होते. त्याठिकाणी आणखी एक पॉइंट वाढविण्यात आला आहे. सध्या त्याठिकाणी ३ पॉइंटवरून टँकरला पाणीपुरवठा केला जात आहे. गोयल यांनी ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांना त्यासंबंधी गोयल यांनी सूचना दिल्या. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कौर, पाणीपुरवठा विभागाचे अशोक घुगे, औरंगाबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांसोबत गोयल यांनी करमाड व लाडगाव येथे जाऊन टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याची पडताळणी केली. या दोन्ही गावांतील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. 

पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठकएमआयडीसी, महावितरण, जलसंपदा आदी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक पुढील आठवड्यात मंत्रालयात घेण्यात येणार आहे. या बैठकीत टँकर भरण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना आखल्या जातील, असे अप्पर मुख्य सचिव शामलाल गोयल यांनी औरंगाबादेतील बैठकीत सांगितले. ४सध्या मुधलवाडी जलशुद्धीकरण केंद्रात २, बजाजगेट जलशुद्धीकरण केंद्रात २, शेंद्रा एमआयडीसी जलशुद्धीकरण केंद्रात ६, बीकेटी येथून २, साजापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रात ३, बिडकीन जलशुद्धीकरण येथे १ आदी पॉइंटद्धारे टँकर भरले जातात. १ मेपासून खोडेगाव येथे टँकर भरण्यासाठी पॉइंट सुरू होईल. तेथे औरंगाबाद आणि पैठण तालुक्यातील गावांसाठी टँकर भरले जातील, तर शेंद्रा येथे फुलंब्री व जवळपासच्या गावांचे टँकर भरले जातील, असे प्रभारी कार्यकारी अभियंता घुगे यांनी सांगितले. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद