शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महाशिवरात्रीनिमित्त घृष्णेश्वराकडे जाणाऱ्या ३ मार्गावरील अवजड वाहतूक ५ दिवस बंद 

By सुमित डोळे | Updated: March 6, 2024 19:45 IST

जड, अवजड वाहनांसाठी पाच दिवस तीन महत्वाचे मार्ग बंद राहणार

छत्रपती संभाजीनगर : वेरुळ येथील घृष्णेवर मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून जवळपास लाखो भाविक येणार असल्याने ७ ते ११ मार्च दरम्यान घृष्णेवर कडे जाणारे तीन महत्वाचे मार्ग जड, अवजड व हलक्या वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

८ मार्च रोजी सर्वत्र महाशिवरात्री उत्साहात साजरी केली जात आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वेरुळ येथील घृष्णेवर मंदिरात देखील ७ ते ११ मार्च दरम्यान महायात्रेचे आयोजन करण्यात आले असून विविध धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमांचा समावेश असेल. यंदा राज्यभरातून ५ लाख भाविक येण्याची शक्यता आहे. मंदिरासह तिर्थकुंड, वेरुळ लेणी एकाच मार्गावर असल्याने पोलिसांनी ५ दिवस तीन महत्वाच्या मार्गांवरील वाहतूकीत बदल केला आहे. नागरिकांनी या दरम्यान पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक मनिष कलवानीया यांनी केले आहे.

असा असेल बदल-छत्रपती संभाजीनगर, दौलताबाद मार्गे वेरुळ, कन्नडकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर, शेरणापुर फाटा, दौलताबाद टि पॉईंट, माळीवाडा, कसाबखेडा, वेरुळ मार्गे कन्नड कडे जातील.-वेरुळ, खुलताबाद दौलताबाद मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येणारी वाहने वेरुळ, कसाबखेडा, माळीवाडा, दौलताबाद मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जातील.- फुलंब्री, खुलताबाद, वेरुळ, कन्नड, धुळे कडे जाणारी वाहने फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, नगरनाका, शेरणापुर फाटा, दौलताबाद, माळीवाडा, कसाबखेडा, वेरुळ मार्गे कन्नडकडे जाईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMahashivratriमहाशिवरात्री