शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
2
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
3
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
4
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
5
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
6
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
7
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
8
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
9
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
10
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुब्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
11
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
13
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
14
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
15
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
16
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
17
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
18
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
19
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
20
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाने बळीराजा सुखावला

By admin | Updated: June 16, 2017 23:36 IST

नांदेड : गत दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे बळीराजा काही प्रमाणात सुखावला असून जिल्ह्यात पेरणीला वेग आला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : गत दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे बळीराजा काही प्रमाणात सुखावला असून जिल्ह्यात पेरणीला वेग आला आहे. मात्र दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी १०० मि. मी. पाऊस झाल्यानंतरच कापूस व सोयाबीनची पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक डॉ.तुकाराम मोटे यांनी केले आहे.सध्या जिल्ह्यातील सर्वदूर भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नसून पाच - सहा तालुक्यात पेरणीसाठी चागंला पाऊस झाला आहे. परंतु सर्वच भागातील शेतकरी पेरणी करीत आहे. ज्या भागात १०० मिलीमिटरपेक्षा कमी पाऊस असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी १०० मि. मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे म्हटले आहे. कमी पाऊस असल्याने जमिनीतील ओलावा कमी असतो त्यामुळे पेरणी केलेले बियाणे उगवत नाही, परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती असते. शिवाय कोरड्या जमिनीत टाकलेले बियाणे किड्यामुंग्या खाण्याची दाट शक्यता असते. यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी केल्यास फायदेशीर ठरेल, असा सल्लाही कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. गत दोन दिवसांपासून बहुतांश भागात पेरणीला वेग आला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी कापसाची लागवड करीत असून सोयाबीनची पेरणीही करीत आहेत. या हंगामात पेरणीसाठी जवळपास ७ लाख ८९ हजार २१७ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्यात जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या सोयाबीन आणि कापसाची मोठ्या प्रमाणात पेरणी होणार असून उर्वरित क्षेत्रावर मूग, उडीद, ज्वारी आदी पिकांची पेरणी होणार आहे. शेतकऱ्यांनी पेरणीचा खर्च कमी करण्यासाठी घरचे बियाणे वापरावेत, पंरतु त्याआधी सदर बियाणाची उगवण क्षमता तपासून घेणे आवश्यक आहे. पेरणी करीत असतांना बीजप्रक्रिया करावी, तसेच उगवण शक्ती तपासून घ्यावी, असे केल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढवणार नाही, असेही ते म्हणाले़