शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
5
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
6
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
7
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची मानसिक अवस्था बिघडली, रस्त्यावर भयानक अवस्थेत सापडली
8
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
9
कंबर, मान, खांद्यामध्ये असह्य वेदना; दुर्मिळ आजारामुळे १२ किलोने वाढला स्तनांचा आकार
10
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
11
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
12
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
13
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
14
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
15
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
16
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
17
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
18
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
19
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
20
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!

दमदार पावसाने बळीराजा सुखावला

By admin | Updated: June 16, 2017 23:36 IST

नांदेड : गत दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे बळीराजा काही प्रमाणात सुखावला असून जिल्ह्यात पेरणीला वेग आला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : गत दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे बळीराजा काही प्रमाणात सुखावला असून जिल्ह्यात पेरणीला वेग आला आहे. मात्र दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी १०० मि. मी. पाऊस झाल्यानंतरच कापूस व सोयाबीनची पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक डॉ.तुकाराम मोटे यांनी केले आहे.सध्या जिल्ह्यातील सर्वदूर भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नसून पाच - सहा तालुक्यात पेरणीसाठी चागंला पाऊस झाला आहे. परंतु सर्वच भागातील शेतकरी पेरणी करीत आहे. ज्या भागात १०० मिलीमिटरपेक्षा कमी पाऊस असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी १०० मि. मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे म्हटले आहे. कमी पाऊस असल्याने जमिनीतील ओलावा कमी असतो त्यामुळे पेरणी केलेले बियाणे उगवत नाही, परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती असते. शिवाय कोरड्या जमिनीत टाकलेले बियाणे किड्यामुंग्या खाण्याची दाट शक्यता असते. यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी केल्यास फायदेशीर ठरेल, असा सल्लाही कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. गत दोन दिवसांपासून बहुतांश भागात पेरणीला वेग आला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी कापसाची लागवड करीत असून सोयाबीनची पेरणीही करीत आहेत. या हंगामात पेरणीसाठी जवळपास ७ लाख ८९ हजार २१७ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्यात जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या सोयाबीन आणि कापसाची मोठ्या प्रमाणात पेरणी होणार असून उर्वरित क्षेत्रावर मूग, उडीद, ज्वारी आदी पिकांची पेरणी होणार आहे. शेतकऱ्यांनी पेरणीचा खर्च कमी करण्यासाठी घरचे बियाणे वापरावेत, पंरतु त्याआधी सदर बियाणाची उगवण क्षमता तपासून घेणे आवश्यक आहे. पेरणी करीत असतांना बीजप्रक्रिया करावी, तसेच उगवण शक्ती तपासून घ्यावी, असे केल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढवणार नाही, असेही ते म्हणाले़