शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पोस्टमन, मेलगार्ड पद भरती प्रक्रिया याचिकांवर २६ नोव्हेंबरला सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 21:40 IST

औरंगाबाद : २०१५ साली राबविण्यात आलेल्या पोस्टमन, मेलगार्ड आणि एम.टी.एस. आदी पदांची भरती प्रक्रिया रद्द केल्याच्या नाराजीने दाखल सर्व याचिकांवर २६ नोव्हेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.

औरंगाबाद : २०१५ साली राबविण्यात आलेल्या पोस्टमन, मेलगार्ड आणि एम.टी.एस. आदी पदांची भरती प्रक्रिया रद्द केल्याच्या नाराजीने दाखल सर्व याचिकांवर २६ नोव्हेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.

१ नोव्हेंबर रोजी वरील याचिकांच्या सुनावणीवेळी वरील सर्व याचिका केंद्रीय न्यायाधीकरणाकडे सुनावणीसाठी वर्ग करण्याची विनंती केंद्र शासनाचे वकील अनिल सिंग यांनी केली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. स्वप्नील तावशीकर यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, सदर याचिका २०१६ पासून प्रलंबित आहेत. २ आॅगस्ट २०१७ रोजी उच्च न्यायालयाने सदर याचिका मंजूर करून निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीत घेण्याचा आदेश दिला होता.

त्यानंतर नोव्हेंबर २०१७ ला पोस्ट खात्यातर्फे दाखल केलेल्या पुनर्विचार याचिका मंजूर होऊन मूळ याचिका सुनावणीस घेण्याचे निर्देश ४ मे २०१८ रोजी देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने सदर याचिकांची अगोदरच दखल घेतल्यामुळे त्या केंद्रीय न्यायाधीकरणाकडे सुनावणीसाठी वर्ग करू नयेत, असा युक्तिवाद अ‍ॅड. तावशीकर यांनी केला असता खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

पोस्ट खात्याने २०१५ मध्ये वरील २४३४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. त्यासाठी एकूण ४ लाख ९३ हजार १९१ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. परीक्षेअंती २४३४ उमेदवारांची निवड झाली होती. मात्र, २०१६ साली पोस्ट खात्याने तडकाफडकी आदेश काढून संपूर्ण परीक्षा रद्द करून रुजू झालेल्या ३९५ पोस्टमन, मेलगार्ड यांना निलंबित केले, तसेच निवड झालेल्या २०३९ उमेदवारांची निवड यादी रद्द केली होती. त्याविरुद्ध दाखल याचिकांवर आता २६ नोव्हेंबर २०१८ रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.

टॅग्स :Courtन्यायालयAurangabadऔरंगाबाद