शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पोस्टमन, मेलगार्ड पद भरती प्रक्रिया याचिकांवर २६ नोव्हेंबरला सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 21:40 IST

औरंगाबाद : २०१५ साली राबविण्यात आलेल्या पोस्टमन, मेलगार्ड आणि एम.टी.एस. आदी पदांची भरती प्रक्रिया रद्द केल्याच्या नाराजीने दाखल सर्व याचिकांवर २६ नोव्हेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.

औरंगाबाद : २०१५ साली राबविण्यात आलेल्या पोस्टमन, मेलगार्ड आणि एम.टी.एस. आदी पदांची भरती प्रक्रिया रद्द केल्याच्या नाराजीने दाखल सर्व याचिकांवर २६ नोव्हेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.

१ नोव्हेंबर रोजी वरील याचिकांच्या सुनावणीवेळी वरील सर्व याचिका केंद्रीय न्यायाधीकरणाकडे सुनावणीसाठी वर्ग करण्याची विनंती केंद्र शासनाचे वकील अनिल सिंग यांनी केली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. स्वप्नील तावशीकर यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, सदर याचिका २०१६ पासून प्रलंबित आहेत. २ आॅगस्ट २०१७ रोजी उच्च न्यायालयाने सदर याचिका मंजूर करून निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीत घेण्याचा आदेश दिला होता.

त्यानंतर नोव्हेंबर २०१७ ला पोस्ट खात्यातर्फे दाखल केलेल्या पुनर्विचार याचिका मंजूर होऊन मूळ याचिका सुनावणीस घेण्याचे निर्देश ४ मे २०१८ रोजी देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने सदर याचिकांची अगोदरच दखल घेतल्यामुळे त्या केंद्रीय न्यायाधीकरणाकडे सुनावणीसाठी वर्ग करू नयेत, असा युक्तिवाद अ‍ॅड. तावशीकर यांनी केला असता खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

पोस्ट खात्याने २०१५ मध्ये वरील २४३४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. त्यासाठी एकूण ४ लाख ९३ हजार १९१ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. परीक्षेअंती २४३४ उमेदवारांची निवड झाली होती. मात्र, २०१६ साली पोस्ट खात्याने तडकाफडकी आदेश काढून संपूर्ण परीक्षा रद्द करून रुजू झालेल्या ३९५ पोस्टमन, मेलगार्ड यांना निलंबित केले, तसेच निवड झालेल्या २०३९ उमेदवारांची निवड यादी रद्द केली होती. त्याविरुद्ध दाखल याचिकांवर आता २६ नोव्हेंबर २०१८ रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.

टॅग्स :Courtन्यायालयAurangabadऔरंगाबाद