शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

पोस्टमन, मेलगार्ड पद भरती प्रक्रिया याचिकांवर २६ नोव्हेंबरला सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 21:40 IST

औरंगाबाद : २०१५ साली राबविण्यात आलेल्या पोस्टमन, मेलगार्ड आणि एम.टी.एस. आदी पदांची भरती प्रक्रिया रद्द केल्याच्या नाराजीने दाखल सर्व याचिकांवर २६ नोव्हेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.

औरंगाबाद : २०१५ साली राबविण्यात आलेल्या पोस्टमन, मेलगार्ड आणि एम.टी.एस. आदी पदांची भरती प्रक्रिया रद्द केल्याच्या नाराजीने दाखल सर्व याचिकांवर २६ नोव्हेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.

१ नोव्हेंबर रोजी वरील याचिकांच्या सुनावणीवेळी वरील सर्व याचिका केंद्रीय न्यायाधीकरणाकडे सुनावणीसाठी वर्ग करण्याची विनंती केंद्र शासनाचे वकील अनिल सिंग यांनी केली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. स्वप्नील तावशीकर यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, सदर याचिका २०१६ पासून प्रलंबित आहेत. २ आॅगस्ट २०१७ रोजी उच्च न्यायालयाने सदर याचिका मंजूर करून निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीत घेण्याचा आदेश दिला होता.

त्यानंतर नोव्हेंबर २०१७ ला पोस्ट खात्यातर्फे दाखल केलेल्या पुनर्विचार याचिका मंजूर होऊन मूळ याचिका सुनावणीस घेण्याचे निर्देश ४ मे २०१८ रोजी देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने सदर याचिकांची अगोदरच दखल घेतल्यामुळे त्या केंद्रीय न्यायाधीकरणाकडे सुनावणीसाठी वर्ग करू नयेत, असा युक्तिवाद अ‍ॅड. तावशीकर यांनी केला असता खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

पोस्ट खात्याने २०१५ मध्ये वरील २४३४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. त्यासाठी एकूण ४ लाख ९३ हजार १९१ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. परीक्षेअंती २४३४ उमेदवारांची निवड झाली होती. मात्र, २०१६ साली पोस्ट खात्याने तडकाफडकी आदेश काढून संपूर्ण परीक्षा रद्द करून रुजू झालेल्या ३९५ पोस्टमन, मेलगार्ड यांना निलंबित केले, तसेच निवड झालेल्या २०३९ उमेदवारांची निवड यादी रद्द केली होती. त्याविरुद्ध दाखल याचिकांवर आता २६ नोव्हेंबर २०१८ रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.

टॅग्स :Courtन्यायालयAurangabadऔरंगाबाद