शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
5
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
6
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
7
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
8
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
9
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
10
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
11
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
12
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
13
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
14
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
15
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
16
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
17
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
18
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
19
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
20
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार

आरोग्य विभागच आजारी

By admin | Updated: July 23, 2014 00:22 IST

सुनील चौरे, हदगाव तालुक्यातील २ लाख ६० हजार नागरिकांच्या आरोग्याचे ओझे केवळ १० डॉक्टरांच्या डोक्यावर असल्यामुळे आरोग्य विभाग आजारी झाला आहे.

सुनील चौरे, हदगावतालुक्यातील २ लाख ६० हजार नागरिकांच्या आरोग्याचे ओझे केवळ १० डॉक्टरांच्या डोक्यावर असल्यामुळे आरोग्य विभाग आजारी झाला आहे. या विभागालाच उपचाराची गरज असल्याचे चित्र आहे़ ३१ उपकेंद्रातील बाळंतकक्ष नावालाच असून गोरगरीबांना किरकोळ आजारांसाठी खाजगी डॉक्टराची मदत घ्यावी लागत आहे़तालुक्यात १४५ गावांतील २ लाख ६० हजार लोकांसाठी सहा आरोग्य केंद्र व एक उपजिल्हा रुग्णालय आहे़ या ६ प्राथमिक आरोग्य केंद्रावर २ लाख २१ हजार ग्रामस्थांना आरोग्य सेवा देण्यासाठी ४ डॉक्टर आहेत़ तामसा येथील डॉक्टर निवृत्त झाले असून बरडशेवाळा येथील डॉक्टरचे पद रिक्त आहे़ हदगाव शहरातील उपजिल्हा रुग्णालयात ४० हजार लोकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी ६ डॉक्टर असून रेग्यूलर ५ डॉक्टर आहेत़ त्यापैकी दोन डॉक्टरांची बदली झाली आहे़या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३१ उपकेंद्र आहेत़ या उपकेंद्रावर निदान दोन कर्मचारी नियुक्त असणे आवश्यक आहे़ यामध्ये पुरूष कर्मचाऱ्यांची १९ पदे भरलेली आहेत़ तर १२ पदे रिक्त आहेत़ स्त्री कर्मचाऱ्यांची कंत्राटी ३१ पदे भरलेली आहेत़ एकूण आरोग्य कर्मचारी १४५ गावांसाठी ६२ आहेत़ प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर एक एमबीबीएस व एक बीएएमएस अशी दोन डॉक्टरांची पदे असतात़ परंतु बरडशेवाळा, आष्टी, तामसा या ठिकाणी ही पदे रिक्त आहेत़बरडशेवाळा, निमगाव, कोहळी, तामसा, आष्टी, वायफना येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत़ ही केंदे्र व्यवस्थित चालू राहिली तरी ग्रामस्थांना चांगली सेवा मिळू शकते़ परंतु येथे निम्मे पदे रिक्त आहेत़ असलेले डॉक्टर, कर्मचारी स्थानिक केंद्रात राहत नाहीत़ त्यामुळे ग्रामस्थांना नाईलाजास्तव खाजगी डॉक्टरकडे जावून आरोग्य बिघडून घ्यावे लागते़ आर्थिक भूर्दंड वेगळाच़ सहा प्राथमिक केंद्रांतर्गत ३१ उपकेंद्र नावालाच आहेत़ याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही़ पिंपरखेड, कवाना, अंबाळा, गोर्लेगाव, मनाठा, चाभरा, चिंचगव्हाण, निमगाव, आष्टी, लिंगापूर, हरडप, बनचिंचोली, लोहा, घोगरी, पाथरड, चिकाळा, शिरड, निवघा, तळणी, येळंब, भाटेगाव, उमरी, नेवरी, उंचेगाव (बु़), कोहळी इ़ केंद्रे आहेत़ परंतु सर्वत्र परिस्थिती सारखीच आहे़ उपकेंद्रावर बाळंतकक्ष २४ तास सुरू असायला पाहिजे़ ते केवळ ३ ते ४ तास आठवड्यातून ३ ते ४ दिवस सुरू असते़ अडगळीचे केंद्र कायमच बंद असतात़ एवढ्यावरही काम व्यवस्थित व्हावीत ही रुग्णाची अपेक्षा, तीही अपूर्णच़ कारण स्थानिक एकही कर्मचारी राहत नाही़ जिल्ह्यावरून ये-जा करतात़ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा किंवा वर्तमानपत्रात बातमी आली की दोन-चार दिवस हे डॉक्टर नियमित दिसतात़ पुन्हा चंद्राप्रमाणे गायब होतात़ याउलट खाजगी डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आह़े़ एखाद्या अवघड आजाराचा उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर घाबरेल, परंतु ही डॉक्टर मंडळी बेधडक महागडी औषधी देऊन रुग्णांचे बेहाल करतात़ नैसर्गिक आपत्ती, पावसाचा बेजबाबदारपणा या संकटातून तगावलेल्या ग्रामस्थांना या आरोग्य विभागाचाही दणका बसत आहे़बाळंतकक्षाची सुविधा उपलब्ध नाही मृत्यूदर घटला हे खरे असले तरी ग्रामीण भागात नवशिशु जन्मताच मृत पावण्याचे प्रमाण गंभीर आहे़ बाळंतकक्षाची व्यवस्था नसल्याने उपचाराअभावी महिन्याकाठी १-२ बालमृत्यू होतच असतो़ त्याची दप्तरी नोंदही नसते़ हे सर्व चुपचाप सुरू असते़ अनेक ठिकाणी पती-पत्नी, वडील-मुलगा किंवा नातेवाईक डॉक्टर आहेत़ त्यापैकी एकच दवाखान्यात उपस्थित असतो़ दुसरा फक्त पगार घेतो़ हदगाव शहरात शालेय तपासणीसाठी ३ डॉक्टर, आयुष डॉक्टर ३ यामध्ये आयुर्वेदिक, युनानी, अ‍ॅलोपॅथीक तर नियमित डॉक्टरांची संख्या ५ आहे़ यामध्ये दोन स्पेशालिस्टची बदली होवून त्याऐवजी दोन एमबीबीएस डॉक्टर देण्यात आले़ डॉक्टरांची संख्या वाढण्याऐवजी दिवसेंदिवस कमीच होत आहे़ कर्मचाऱ्यांमध्ये कुशल कर्मचाऱ्यांऐवजी लागेबांधे असलेल्यांची संख्या जास्त असल्यामुळे वरिष्ठांना काम करताना तारेवरची कसरत करावी लागते़