शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

१५१ पटासाठी एक मुख्याध्यापक

By admin | Updated: May 20, 2014 00:06 IST

हिंगोली : बालकांच्या मोफत शिक्षणाच्या कायद्यानुसार राज्यातील पहिली ते सातवीपर्यंत १५१ पट असणार्‍या शाळांना मुख्याध्यापकाचे पद मंजूर करण्यात आले आहे.

हिंगोली : बालकांच्या मोफत शिक्षणाच्या कायद्यानुसार राज्यातील पहिली ते सातवीपर्यंत १५१ पट असणार्‍या शाळांना मुख्याध्यापकाचे पद मंजूर करण्यात आले आहे. याबाबतच्या सूचना महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी दिल्या असल्याची माहिती महाराष्टÑ राज्य ग्रेड मुख्याध्यापक महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोहर पोपळाईत यांनी दिली. यापूर्वी २०० पटसंख्या असणार्‍या शाळांसाठी मुख्याध्यापकाचे पद अस्तित्वात होते. बालकांचा मोफत शिक्षणाचा कायदा २००९ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गातील १५१ विद्यार्थ्यांसाठी एक मुख्याध्यापक तर त्याच शाळेत सहावी ते आठवीच्या वर्गातील १०५ विद्यार्थ्यांसाठी एक मुख्याध्यापक पद निर्माण करण्यात आले होते. दोन्हीपैकी एका ठिकाणचे पद भरण्यात येणार होते. त्यामुळे एक ठिकाणचे पद रिक्त राहणार होते. शिवाय ग्रामीण भागातील शाळांमधील १५१ ही विद्यार्थीसंख्या कमी पडत होती. याचा फटका जिल्ह्यातील ७४ मुख्याध्यापकांना बसत होता. ही पदे अतिरिक्त ठरत होती. त्यामुळे त्यांच्यावर पदावन्नत होण्याची वेळ आली होती. ही बाब महाराष्टÑ राज्य ग्रेड मुख्याध्यापक महासंघाच्या वतीने शालेय शिक्षण विभागाकडे मांडण्यात आली. शिवाय या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. त्यानंतर राज्य शासनाने १५१ पटसंख्या असलेल्या शाळांसाठी एक मुख्याध्यापक देण्याचा निर्णय घेतला, असे जिल्हाध्यक्ष पोपळाईत यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)