शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

१५१ पटासाठी एक मुख्याध्यापक

By admin | Updated: May 20, 2014 00:06 IST

हिंगोली : बालकांच्या मोफत शिक्षणाच्या कायद्यानुसार राज्यातील पहिली ते सातवीपर्यंत १५१ पट असणार्‍या शाळांना मुख्याध्यापकाचे पद मंजूर करण्यात आले आहे.

हिंगोली : बालकांच्या मोफत शिक्षणाच्या कायद्यानुसार राज्यातील पहिली ते सातवीपर्यंत १५१ पट असणार्‍या शाळांना मुख्याध्यापकाचे पद मंजूर करण्यात आले आहे. याबाबतच्या सूचना महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी दिल्या असल्याची माहिती महाराष्टÑ राज्य ग्रेड मुख्याध्यापक महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोहर पोपळाईत यांनी दिली. यापूर्वी २०० पटसंख्या असणार्‍या शाळांसाठी मुख्याध्यापकाचे पद अस्तित्वात होते. बालकांचा मोफत शिक्षणाचा कायदा २००९ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गातील १५१ विद्यार्थ्यांसाठी एक मुख्याध्यापक तर त्याच शाळेत सहावी ते आठवीच्या वर्गातील १०५ विद्यार्थ्यांसाठी एक मुख्याध्यापक पद निर्माण करण्यात आले होते. दोन्हीपैकी एका ठिकाणचे पद भरण्यात येणार होते. त्यामुळे एक ठिकाणचे पद रिक्त राहणार होते. शिवाय ग्रामीण भागातील शाळांमधील १५१ ही विद्यार्थीसंख्या कमी पडत होती. याचा फटका जिल्ह्यातील ७४ मुख्याध्यापकांना बसत होता. ही पदे अतिरिक्त ठरत होती. त्यामुळे त्यांच्यावर पदावन्नत होण्याची वेळ आली होती. ही बाब महाराष्टÑ राज्य ग्रेड मुख्याध्यापक महासंघाच्या वतीने शालेय शिक्षण विभागाकडे मांडण्यात आली. शिवाय या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. त्यानंतर राज्य शासनाने १५१ पटसंख्या असलेल्या शाळांसाठी एक मुख्याध्यापक देण्याचा निर्णय घेतला, असे जिल्हाध्यक्ष पोपळाईत यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)