शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

आनंदवार्ता! प्रत्येक घराला मिळेल पाणी, शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी ‘जलजीवन मिशन’ गतिमान

By विजय सरवदे | Updated: October 24, 2022 12:58 IST

या योजनेंतर्गत १,२८० गावांमध्ये १,२८८ पाणीपुरवठ्याच्या योजना प्रस्तावित आहेत.

औरंगाबाद : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणीद्वारे प्रति दिन किमान ५५ लिटर शुद्ध पाणी देण्यासाठी जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग सरसावला आहे. सन २०२४ अखेरपर्यंत ‘जलजीवन मिशन’ योजनेंतर्गत ग्रामीण भागात सर्वांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळेल, या दिशेने पावले टाकण्यात आली असून, जिल्ह्यात १२८८ पैकी ६०५ कामांना प्रत्यक्ष सुरूवातही झाली आहे, तर ४२ कामे पूर्ण झाली आहेत. 

यासंदर्भात जि. प. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी सांगितले की, ग्रामीण भागात वाढत्या लोकसंख्येनुसार कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला, स्वयंपाक आणि घरगुती वापरासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे या जलजीवन मिशन योजनेचे ध्येय आहे. हा उपक्रम सन २०२४पर्यंत पूर्णत्वाकडे नेला जाईल. या अंतर्गत पाणीपुरवठ्याचे पुढील ३० वर्षांचे नियोजन करण्यात आले आहे. २०पेक्षा जास्त कुटुंब असलेल्या वसाहतींमध्ये देखील ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. 

या योजनेंतर्गत १,२८० गावांमध्ये १,२८८ पाणीपुरवठ्याच्या योजना प्रस्तावित आहेत. शाळा व अंगणवाडीला देखील डोळ्यासमोर ठेवून नळाद्वारे शाश्वत व शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी गावांमधील जनतेला यामध्ये सहभागी करून घेतले जात आहे. यामुळे योग्य नियोजन आणि शाश्वत पाणीपुरवठा निर्माण होण्यास मदत होत आहे. जि. प. पाणीपुरवठा विभागाकडे असलेले अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता, या योजनेसाठी १९ खासगी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, पुढील महिन्यात आणखी २० अभियंते नियुक्त केले जाणार आहेत. 

प्रतिक्रिया मुदतीत कामे पूर्ण होणारजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जलजीवन मिशन’ची कामे गतीने सुरू आहेत. राज्याने नियुक्त केलेल्या व्यापकोस एजन्सीचे अभियंते तसेच जि. प., १९ खासगी नियुक्त केलेल्या अभियंत्यांनी युद्धपातळीवर योजनेची कामे हाती घेतली आहेत. शासनाने निश्चित केलेल्या मुदतीच्या आत अर्थात सन २०२४पर्यंत या योजनेची कामे पूर्ण होतील, या दिशेने प्रयत्न करत आहोत.- अजित वाघमारे, कार्यकारी अभियंता, जि. प. पाणीपुरवठा विभाग 

जलजीवन मिशनची स्थिती एकूण गावे - १२८०पा. पु. योजना - १२८८सर्वेक्षण पूर्ण - १२८७डीपीआर तयार - १२३१तांत्रिक मंजुरी - ११७१प्रशासकीय मान्यता - ११२९टेंडर प्रक्रिया - १०२६कार्यारंभ आदेश - ६२६कामे पूर्ण - ४२

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद