शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

आनंदवार्ता! प्रत्येक घराला मिळेल पाणी, शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी ‘जलजीवन मिशन’ गतिमान

By विजय सरवदे | Updated: October 24, 2022 12:58 IST

या योजनेंतर्गत १,२८० गावांमध्ये १,२८८ पाणीपुरवठ्याच्या योजना प्रस्तावित आहेत.

औरंगाबाद : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणीद्वारे प्रति दिन किमान ५५ लिटर शुद्ध पाणी देण्यासाठी जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग सरसावला आहे. सन २०२४ अखेरपर्यंत ‘जलजीवन मिशन’ योजनेंतर्गत ग्रामीण भागात सर्वांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळेल, या दिशेने पावले टाकण्यात आली असून, जिल्ह्यात १२८८ पैकी ६०५ कामांना प्रत्यक्ष सुरूवातही झाली आहे, तर ४२ कामे पूर्ण झाली आहेत. 

यासंदर्भात जि. प. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी सांगितले की, ग्रामीण भागात वाढत्या लोकसंख्येनुसार कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला, स्वयंपाक आणि घरगुती वापरासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे या जलजीवन मिशन योजनेचे ध्येय आहे. हा उपक्रम सन २०२४पर्यंत पूर्णत्वाकडे नेला जाईल. या अंतर्गत पाणीपुरवठ्याचे पुढील ३० वर्षांचे नियोजन करण्यात आले आहे. २०पेक्षा जास्त कुटुंब असलेल्या वसाहतींमध्ये देखील ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. 

या योजनेंतर्गत १,२८० गावांमध्ये १,२८८ पाणीपुरवठ्याच्या योजना प्रस्तावित आहेत. शाळा व अंगणवाडीला देखील डोळ्यासमोर ठेवून नळाद्वारे शाश्वत व शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी गावांमधील जनतेला यामध्ये सहभागी करून घेतले जात आहे. यामुळे योग्य नियोजन आणि शाश्वत पाणीपुरवठा निर्माण होण्यास मदत होत आहे. जि. प. पाणीपुरवठा विभागाकडे असलेले अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता, या योजनेसाठी १९ खासगी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, पुढील महिन्यात आणखी २० अभियंते नियुक्त केले जाणार आहेत. 

प्रतिक्रिया मुदतीत कामे पूर्ण होणारजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जलजीवन मिशन’ची कामे गतीने सुरू आहेत. राज्याने नियुक्त केलेल्या व्यापकोस एजन्सीचे अभियंते तसेच जि. प., १९ खासगी नियुक्त केलेल्या अभियंत्यांनी युद्धपातळीवर योजनेची कामे हाती घेतली आहेत. शासनाने निश्चित केलेल्या मुदतीच्या आत अर्थात सन २०२४पर्यंत या योजनेची कामे पूर्ण होतील, या दिशेने प्रयत्न करत आहोत.- अजित वाघमारे, कार्यकारी अभियंता, जि. प. पाणीपुरवठा विभाग 

जलजीवन मिशनची स्थिती एकूण गावे - १२८०पा. पु. योजना - १२८८सर्वेक्षण पूर्ण - १२८७डीपीआर तयार - १२३१तांत्रिक मंजुरी - ११७१प्रशासकीय मान्यता - ११२९टेंडर प्रक्रिया - १०२६कार्यारंभ आदेश - ६२६कामे पूर्ण - ४२

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद