शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आनंदवार्ता! प्रत्येक घराला मिळेल पाणी, शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी ‘जलजीवन मिशन’ गतिमान

By विजय सरवदे | Updated: October 24, 2022 12:58 IST

या योजनेंतर्गत १,२८० गावांमध्ये १,२८८ पाणीपुरवठ्याच्या योजना प्रस्तावित आहेत.

औरंगाबाद : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणीद्वारे प्रति दिन किमान ५५ लिटर शुद्ध पाणी देण्यासाठी जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग सरसावला आहे. सन २०२४ अखेरपर्यंत ‘जलजीवन मिशन’ योजनेंतर्गत ग्रामीण भागात सर्वांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळेल, या दिशेने पावले टाकण्यात आली असून, जिल्ह्यात १२८८ पैकी ६०५ कामांना प्रत्यक्ष सुरूवातही झाली आहे, तर ४२ कामे पूर्ण झाली आहेत. 

यासंदर्भात जि. प. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी सांगितले की, ग्रामीण भागात वाढत्या लोकसंख्येनुसार कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला, स्वयंपाक आणि घरगुती वापरासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे या जलजीवन मिशन योजनेचे ध्येय आहे. हा उपक्रम सन २०२४पर्यंत पूर्णत्वाकडे नेला जाईल. या अंतर्गत पाणीपुरवठ्याचे पुढील ३० वर्षांचे नियोजन करण्यात आले आहे. २०पेक्षा जास्त कुटुंब असलेल्या वसाहतींमध्ये देखील ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. 

या योजनेंतर्गत १,२८० गावांमध्ये १,२८८ पाणीपुरवठ्याच्या योजना प्रस्तावित आहेत. शाळा व अंगणवाडीला देखील डोळ्यासमोर ठेवून नळाद्वारे शाश्वत व शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी गावांमधील जनतेला यामध्ये सहभागी करून घेतले जात आहे. यामुळे योग्य नियोजन आणि शाश्वत पाणीपुरवठा निर्माण होण्यास मदत होत आहे. जि. प. पाणीपुरवठा विभागाकडे असलेले अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता, या योजनेसाठी १९ खासगी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, पुढील महिन्यात आणखी २० अभियंते नियुक्त केले जाणार आहेत. 

प्रतिक्रिया मुदतीत कामे पूर्ण होणारजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जलजीवन मिशन’ची कामे गतीने सुरू आहेत. राज्याने नियुक्त केलेल्या व्यापकोस एजन्सीचे अभियंते तसेच जि. प., १९ खासगी नियुक्त केलेल्या अभियंत्यांनी युद्धपातळीवर योजनेची कामे हाती घेतली आहेत. शासनाने निश्चित केलेल्या मुदतीच्या आत अर्थात सन २०२४पर्यंत या योजनेची कामे पूर्ण होतील, या दिशेने प्रयत्न करत आहोत.- अजित वाघमारे, कार्यकारी अभियंता, जि. प. पाणीपुरवठा विभाग 

जलजीवन मिशनची स्थिती एकूण गावे - १२८०पा. पु. योजना - १२८८सर्वेक्षण पूर्ण - १२८७डीपीआर तयार - १२३१तांत्रिक मंजुरी - ११७१प्रशासकीय मान्यता - ११२९टेंडर प्रक्रिया - १०२६कार्यारंभ आदेश - ६२६कामे पूर्ण - ४२

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद