शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

मराठवाड्याला गारपिटीचा फटका; २ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 12:29 IST

Hailstorm hits Marathwada: दोन दिवसांपासून विभागात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे प्रत्येक जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली

औरंगाबाद : मराठवाड्यात दोन दिवसांपासून झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा २ हजार हेक्टरहून अधिक पिकांना फटका (Hailstorm hits Marathwada) बसला आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागाकडून पंचनामे करून घेण्याबाबत विभागीय प्रशासनाने सूचना केल्या आहेत.

दोन दिवसांपासून विभागात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे प्रत्येक जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीटही झाली. जालना आणि हिंगोली जिल्ह्यातील दोन जनावरे गारपिटीमुळे दगावली आहेत.

३० सप्टेंबर रोजी सरत्या वर्षातील नियमित पावसाळा संपला. परंतु, त्यानंतरही विभागात पावसाने हजेरी लावलीच. दिवाळसणातही ढगाळ वातावरण राहिले. मध्येच काही दिवस थंडीचा जोर वाढला. त्यानंतर पुन्हा उन्हाचा पारा चढला. मागील दोन महिन्यांत उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूंचा अनुभव आला आहे. डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात विभागात अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्या अंदाजानुसार दोन दिवसांपासून विभागातील सर्व जिल्ह्यांत ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली.

दोन जिल्ह्यांत दाणादाणऔरंगाबाद जिल्ह्यात ३९९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे तर जालना जिल्ह्यातील १५४२.६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हिंगोली, जालन्यातील प्रत्येक एक दुधाळ जनावर दगावले आहे. इतर जिल्ह्यांतील नुकसानाचे पंचनामे सध्या सुरू आहेत, असे विभागीय प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :HailstormगारपीटAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाagricultureशेती