शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

मराठवाड्याला गारपिटीचा फटका; २ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 12:29 IST

Hailstorm hits Marathwada: दोन दिवसांपासून विभागात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे प्रत्येक जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली

औरंगाबाद : मराठवाड्यात दोन दिवसांपासून झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा २ हजार हेक्टरहून अधिक पिकांना फटका (Hailstorm hits Marathwada) बसला आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागाकडून पंचनामे करून घेण्याबाबत विभागीय प्रशासनाने सूचना केल्या आहेत.

दोन दिवसांपासून विभागात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे प्रत्येक जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीटही झाली. जालना आणि हिंगोली जिल्ह्यातील दोन जनावरे गारपिटीमुळे दगावली आहेत.

३० सप्टेंबर रोजी सरत्या वर्षातील नियमित पावसाळा संपला. परंतु, त्यानंतरही विभागात पावसाने हजेरी लावलीच. दिवाळसणातही ढगाळ वातावरण राहिले. मध्येच काही दिवस थंडीचा जोर वाढला. त्यानंतर पुन्हा उन्हाचा पारा चढला. मागील दोन महिन्यांत उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूंचा अनुभव आला आहे. डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात विभागात अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्या अंदाजानुसार दोन दिवसांपासून विभागातील सर्व जिल्ह्यांत ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली.

दोन जिल्ह्यांत दाणादाणऔरंगाबाद जिल्ह्यात ३९९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे तर जालना जिल्ह्यातील १५४२.६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हिंगोली, जालन्यातील प्रत्येक एक दुधाळ जनावर दगावले आहे. इतर जिल्ह्यांतील नुकसानाचे पंचनामे सध्या सुरू आहेत, असे विभागीय प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :HailstormगारपीटAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाagricultureशेती