शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

गारपिटीने २० हजार हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:06 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील ७६ पैकी १७ तालुक्यांतील १८४ गावांना गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. यात २० हजार ...

औरंगाबाद : मराठवाड्यातील ७६ पैकी १७ तालुक्यांतील १८४ गावांना गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. यात २० हजार ५३८ हेक्टरवरील फळपिकांसह जिरायती क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज विभागीय महसूल प्रशासनाने वर्तविला आहे.

तीन दिवसांपासून मराठवाड्यात अवकाळी पावसाची हजेरी सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एका व्यक्तीचा मृत्यू, तर परभणीतील एक जखमी झाला आहे. तसेच औरंगाबादमधील ५ तालुक्यांतील ३२ गावे, जालन्यातील ७९ गावे, परभणीतील ९ गावे, बीडमधील सर्वाधिक ६२ गावे, उस्मानाबादमधील २ गावांत गारपिटीने नुकसान केले आहे. ५ हजार ४५० जिरायती, तर १० हजार हेक्टर बागायती क्षेत्र गारपिटीने उद्ध्वस्त केले आहे. ५ हजार ८५ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील २२१ लहान, तर ६ मोठी जनावरे दगावली आहेत. जालन्यात १२, औरंगाबादमध्ये ३, हिंगोलीत २, तर नांदेड व उस्मानाबादमध्ये प्रत्येकी २ मोठी जनावरे दगावली आहेत.